शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:29 IST

शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तक्रारीसाठी ‘अ‍ॅप’ला पसंती : महासभेत आयुक्तांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.दीड वर्षाने महापालिकेच्या निवडणुका आहेत. आतापासून नागरिकांशी संपर्क साधला तर निवडणूक जिंकता येईल. परंतु ‘अ‍ॅप’मुळे तक्रारी मार्गी लागल्या तर नगरसेवकांचे काम राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने नगरसेवकांनी महासभेत मनपाच्या या अ‍ॅपवर नाराजी व्यक्त केली.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारी निवारणासाठी महापालिका कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागू नये, याकरिता त्यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार सात दिवसात सोडविणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अन्यथा अ‍ॅपच्या सिस्टीमच्या माध्यमातून आपोआप संबंधित अधिकाºयाला तक्रार का सुटली नाही, यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस पाठविली जाते. त्यानंतर ती तक्रार वरिष्ठ अधिकाºयाकडे आपोआप वर्ग होते. दरम्यान, अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी प्रशासन प्राधान्याने घेत त्या सोडवत आहेत. मात्र, अ‍ॅपच्या माध्यमातून सुटणाºया तक्रारींमुळे नागरिकांच्या मनातून नगरसेवकांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी रोष व्यक्त करीत प्रशासनाने हे अ‍ॅप नगरसेवकांचे अस्तित्व संपविण्यासाठी तयार केल्याचा आरोप केला. नगरसेवकांनीही दिलेल्या तक्रारी प्रशासनाकडून सोडविल्या पाहिजेत, परंतु नगरसेवकानी दिलेल्या तक्रारी विचारात घेतला जात नाही. मात्र तक्रार नागरिकांनी अ‍ॅपवर टाकली तर २४ तासात सुटत आहे. प्रशासनाची ही भूमिका योग्य नसून असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचाही आरोप सभेत नगरसेवकांनी केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका