शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

मनपाच्या ‘अ‍ॅप’मुळे नगरसेवक हैराण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 22:29 IST

शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तक्रारीसाठी ‘अ‍ॅप’ला पसंती : महासभेत आयुक्तांवर रोष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील नागरिकांच्या तक्रारींचा तात्काळ निपटारा करण्यासाठी महापालिका प्रशासनाने ‘नागपूर लाईव्ह सिटी अ‍ॅप’ तयार केले. कमी वेळात सर्वाधिक डाऊनलोड केलेल्या या अ‍ॅपच्या माध्यमातून तक्रारी सोडविण्याची ग्वाही नागरिकांना देण्यात आली आहे. त्यानुसार प्राप्त तक्रारींचे निवारण होत आहे. दुसरीकडे नगरसेवकांच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून प्राधान्य मिळत नसल्याने नगरसेवकांनी या ‘अ‍ॅप’ची धास्ती घेतली आहे.दीड वर्षाने महापालिकेच्या निवडणुका आहेत. आतापासून नागरिकांशी संपर्क साधला तर निवडणूक जिंकता येईल. परंतु ‘अ‍ॅप’मुळे तक्रारी मार्गी लागल्या तर नगरसेवकांचे काम राहणार नाही, अशी भीती निर्माण झाल्याने नगरसेवकांनी महासभेत मनपाच्या या अ‍ॅपवर नाराजी व्यक्त केली.तुकाराम मुंढे यांनी महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर त्यांनी नागरिकांना त्यांच्या तक्रारी निवारणासाठी महापालिका कार्यालयाच्या खेटा घालाव्या लागू नये, याकरिता त्यांनी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ हे मोबाईल अ‍ॅप तयार केले. अ‍ॅपच्या माध्यमातून आलेली तक्रार सात दिवसात सोडविणे हे संबंधित अधिकाऱ्यांना बंधनकारक आहे. अन्यथा अ‍ॅपच्या सिस्टीमच्या माध्यमातून आपोआप संबंधित अधिकाºयाला तक्रार का सुटली नाही, यासंदर्भातील कारणे दाखवा नोटीस पाठविली जाते. त्यानंतर ती तक्रार वरिष्ठ अधिकाºयाकडे आपोआप वर्ग होते. दरम्यान, अ‍ॅपवर आलेल्या तक्रारी प्रशासन प्राधान्याने घेत त्या सोडवत आहेत. मात्र, अ‍ॅपच्या माध्यमातून सुटणाºया तक्रारींमुळे नागरिकांच्या मनातून नगरसेवकांचे महत्त्व कमी होत असल्याची भीती नगरसेवकांमध्ये निर्माण झाली आहे. शुक्रवारी सर्वसाधारण सभेत याचे पडसाद उमटले. अनेक नगरसेवकांनी रोष व्यक्त करीत प्रशासनाने हे अ‍ॅप नगरसेवकांचे अस्तित्व संपविण्यासाठी तयार केल्याचा आरोप केला. नगरसेवकांनीही दिलेल्या तक्रारी प्रशासनाकडून सोडविल्या पाहिजेत, परंतु नगरसेवकानी दिलेल्या तक्रारी विचारात घेतला जात नाही. मात्र तक्रार नागरिकांनी अ‍ॅपवर टाकली तर २४ तासात सुटत आहे. प्रशासनाची ही भूमिका योग्य नसून असला प्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचाही आरोप सभेत नगरसेवकांनी केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका