शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

विलगीकरणातील २५०० लोकांची मनपा घेतेय काळजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 20:56 IST

शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्­हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे.

ठळक मुद्देस्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून सेवाकार्य

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड-१९ चा संसर्ग रोखण्यासाठी व वेळेत उपचार मिळावे यासाठी मनपातर्फे ‘हाय रिस्क कॉन्टॅक्ट’मधील कोरोनाग्रस्तांचा शोध घेण्यात येतो. त्यांना विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. शहरामध्ये आमदार निवास, वनामती, रविभवन, सिम्बॉयसिस, व्­हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर, प्रोझोन चिचभवन आदी ठिकाणी सुमारे २५०० लोकांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने विलगीकरणातील या नागरिकांच्या सुविधेसाठी मनपातर्फे सेवाकार्य सुरू आहे. येथील लोकांच्या आरोग्यासह त्यांची भोजन, निवास व्यवस्था व सुरक्षेबाबत मनपाद्वारे काळजी घेण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.सिम्बॉयसिस, व्हीएनआयटी वसतिगृह, पाचपावली पोलिस क्वॉर्टर या तीन ठिकाणी सुमारे १५०० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. वाठोडा येथील सिम्बॉयसिसमध्ये ४५० जणांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी मनपाची वैद्यकीय चमू आणि इतर टीम सेवा देत आहेत. क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांमध्ये बहुतांशी मुस्लिम बांधव आहेत. त्यांच्यासाठी रमजानच्या पर्वावर दररोज शहरी आणि इफ्तारीचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आयोजन करण्यात येत आहेपाचपावली क्षेत्रामध्ये पोलिस क्वॉर्टरमध्ये सुमारे ५५० जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. पोलिस क्वॉर्टरमध्ये एकूण ७ विंग असून यातील प्रत्येक विंगमध्ये २७ फ्लॅट आहेत. यापैकी एक विंग वैद्यकीय चमूसाठी निर्धारित करण्यात आली आहे. या विंगमध्ये डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, परिचारिका यांची निवास व्यवस्था करण्यात आली आहेव्हीएनआयटीच्या चार वसतिगृहामध्ये सुमारे ६०० संशयितांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. या सर्व ठिकाणी विलगीकरण करून ठेवलेल्या नागरिकांच्या आरोग्य तपासणीसह त्यांना दोन वेळचे भाजी, पोळी, वरण, भात असे जेवण, चहा, नाश्ता ही सर्व व्यवस्था मनपातर्फे करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षातील नागरिकांवर वैद्यकीय पथकाद्वारे उपचार करण्यात येत आहे.विलगीकरणातील लोकांचे कोरोना स्वॅब घेण्यात येते. स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीवर इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) किंवा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथे तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत उपचार केले जातात. तर अहवाल निगेटिव्ह आल्यास पुन्हा १४व्या दिवशी स्वॅब घेण्यात येतो. तो अहवालसुद्धा निगेटिव्ह आल्यास रुग्णाला सुटी देण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. मात्र येथील काही लोकांची सुविधा नसल्याची तक्रार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका