शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारच्या परवानगीनंतरच मनपाची सभा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2020 21:03 IST

महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सोमवारी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी कोणताही निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने परवानगी दिली तरच आयुक्त सभा घेण्याला हिरवी झेंडी देणार असल्याचे संकेत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेची सर्वसाधारण सभा २० जूनला सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. यासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांना सोमवारी पत्र दिले होते. यावर आयुक्तांनी कोणताही निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे सरकारने परवानगी दिली तरच आयुक्त सभा घेण्याला हिरवी झेंडी देणार असल्याचे संकेत आहेत.महाराष्ट्र शासनाच्या ३ जूनच्या निर्णयानुसार व फिजिकल डिस्टन्स, सॅनिटायझेशन व्यवस्था करून, २०जूनला मनपाची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली आहे. यात शासन दिशानिर्देश व शासन आदेशाचा भंग होणार नाही, अशी ग्वाही या पत्रातून दिली आहे.महाराष्ट्र शासनाच्या ३ एप्रिलच्या आदेशात स्पष्ट नमूद आहे की, महानगरपालिका, नगरपरिषदा, नगरपंचायती आणि त्यांच्या विविध समितीच्या नियतकालीन सभेसंदर्भातील निर्णय त्यांच्या स्तरावर घेण्याचे नमूद केले आहे. शासन आदेशानुसार महापालिकेतील सर्वपक्षीय गटनेत्यांशी मंगळवारी चर्चा करून २० जूनला सर्वसाधारण सभा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सभेकरिता आवश्यक ती सर्व खबरदारी, तत्सम कार्यवाही करण्यात यावी, असे महापौरांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे.यावर आयुक्त काय निर्णय घेतात याकडे नगरसेवकांचे लक्ष लागले होते. परंतु त्यांनी यावर निर्णय न देता महापौरांचे पत्र राज्य सरकारकडे अभिप्रायासाठी पाठविले आहे. यासंदर्भात माहितीसाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.होकारानंतरही अत्यावश्यक कामासाठी निधी नाहीनगरसेवकांना प्रभागातील गडरलाईन, चेंबर व नाल्या दुरुस्तीच्या कामासाठी ३-३ लाखाचा निधी देण्याला १७ दिवसापूर्वी बैठकीत आयुक्तांनी होकार दिला होता. मात्र अद्याप कोणत्याही प्रभागाला निधी उपलब्ध झाला नाही. यामुळे अत्यावश्यक कामे ठप्प असल्याचे सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी सांगितले. अशा समस्या मार्गी लागाव्यात यासाठी सभा होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाState Governmentराज्य सरकार