शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

मनपा : पाच दिवसात २०४० मालमत्ताधारकांना 'अभय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:29 IST

NMC, Tax recovery, nagpur news १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

ठळक मुद्दे२.१५ कोटीची थकबाकी जमा : चालू करातून ३.८९ कोटी वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची मालमत्ता कराची ६०० कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आव्हान मोठे आहे . थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी मनपा आयुक्तांनी १५ डिसेंबरपासून अभय योजना लागू केली आहे. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

अभय योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत रकमेसह आर्थिक वर्ष २०२०-२१ चा मालमत्ता कर १५ जानेवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेत ८० सूट मिळेल. तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची थकीत मालमत्ता कर १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी व चालू वर्षाचा कर जमा केला तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

६७ लाखांचा दंड माफ

अभय योजनेच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला ४२५ मालमत्ताधारकांनी २७ लाखांची थकबाकी जमा केली. सोबतच चालू वर्षाचा १३.७७ लाखांचा कर जमा केला. १६ डिसेंबरला ४४० थकबाकीदारांनी २९ लाख जमा केले. १७ डिसेंबरला ४६८ थकबाकीदारांनी ३१ लाख जमा केले तर शनिवारपर्यंत एकूण २०४० थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला. एकूण २.११ कोटींची थकबाकी जमा केली. ६७ लाख दंड माफ करण्यात आला.

चार दिवसात ६ कोटी वसूल

१५ ते १९ डिसेंबर या पाच दिवसात मालमत्ता कराची थकबाकी व चालू वर्षाच्या बिलाची ६ कोटींची वसुली झाली. यात २.१५ कोटींची जुनी थकबाकी असून ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला आहे. थकबाकीदारांना यातून दिलासा मिळाला आहे.

अशी आहेत मालमत्ता व कराची मागणी

मनपा हद्दीतील मालमत्ता -६,३५ ९९५

कर निर्धारण मंजूर मालमत्ता -६०७१५१

चालू आर्थिक वर्षाची मागणी -२५० कोटी

मालमत्ताकराची थकीत रक्कम -६०० कोटी

एकूण मागणी - ८५० कोटी

थकीत रकमेवरील व्याज १५७ कोटी

वसूल झालेली रक्कम -४० कोटी

यात शासकीय मालमत्ताकडील थकीत- १०९ कोटी

थकबाकीदारांचा प्रतिसाद- मेश्राम

आयुक्तांनी जाहीर केलेल्या अभय योजनेला मालमत्ताधारकांचा प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २०४० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला. या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २.१५ कोटीची थकबाकी वसूल झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर