शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

मनपा : पाच दिवसात २०४० मालमत्ताधारकांना 'अभय'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 21:29 IST

NMC, Tax recovery, nagpur news १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

ठळक मुद्दे२.१५ कोटीची थकबाकी जमा : चालू करातून ३.८९ कोटी वसूल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महापालिकेची मालमत्ता कराची ६०० कोटींची थकबाकी आहे. ती वसूल करण्याचे आव्हान मोठे आहे . थकीत कराची वसुली व्हावी, यासाठी मनपा आयुक्तांनी १५ डिसेंबरपासून अभय योजना लागू केली आहे. या योजनेला मालमत्ताधारकांचा मिळणारा प्रतिसाद लक्षात घेता मनपा तिजोरीत मोठ्या प्रमाणात महसूल जमा होण्याची आशा निर्माण झाली आहे. १५ ते १८ डिसेंबर या पाच दिवसाच्या कालावधीत २०४० मालमत्ताधारकांनी २.१५ कोटींची थकबाकी जमा केली आहे. आर्थिक वर्षाच्या चालू करातून पाच दिवसात ३.८९ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा झाले.

अभय योजनेंतर्गत ३१ मार्च २०२० पर्यंत थकीत रकमेसह आर्थिक वर्ष २०२०-२१ चा मालमत्ता कर १५ जानेवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेत ८० सूट मिळेल. तर ३१ डिसेंबर २०२० पर्यंतची थकीत मालमत्ता कर १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत भरल्यास दंडाच्या रकमेवर ५० टक्के सूट दिली जाणार आहे. निर्धारित कालावधीत थकबाकी व चालू वर्षाचा कर जमा केला तरच या योजनेचा लाभ मिळणार आहे.

६७ लाखांचा दंड माफ

अभय योजनेच्या पहिल्या दिवशी १५ डिसेंबरला ४२५ मालमत्ताधारकांनी २७ लाखांची थकबाकी जमा केली. सोबतच चालू वर्षाचा १३.७७ लाखांचा कर जमा केला. १६ डिसेंबरला ४४० थकबाकीदारांनी २९ लाख जमा केले. १७ डिसेंबरला ४६८ थकबाकीदारांनी ३१ लाख जमा केले तर शनिवारपर्यंत एकूण २०४० थकबाकीदारांनी अभय योजनेचा लाभ घेतला. एकूण २.११ कोटींची थकबाकी जमा केली. ६७ लाख दंड माफ करण्यात आला.

चार दिवसात ६ कोटी वसूल

१५ ते १९ डिसेंबर या पाच दिवसात मालमत्ता कराची थकबाकी व चालू वर्षाच्या बिलाची ६ कोटींची वसुली झाली. यात २.१५ कोटींची जुनी थकबाकी असून ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला आहे. थकबाकीदारांना यातून दिलासा मिळाला आहे.

अशी आहेत मालमत्ता व कराची मागणी

मनपा हद्दीतील मालमत्ता -६,३५ ९९५

कर निर्धारण मंजूर मालमत्ता -६०७१५१

चालू आर्थिक वर्षाची मागणी -२५० कोटी

मालमत्ताकराची थकीत रक्कम -६०० कोटी

एकूण मागणी - ८५० कोटी

थकीत रकमेवरील व्याज १५७ कोटी

वसूल झालेली रक्कम -४० कोटी

यात शासकीय मालमत्ताकडील थकीत- १०९ कोटी

थकबाकीदारांचा प्रतिसाद- मेश्राम

आयुक्तांनी जाहीर केलेल्या अभय योजनेला मालमत्ताधारकांचा प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २०४० थकबाकीदारांनी या योजनेचा लाभ घेतला. त्यांना ६७ लाखांचा दंड माफ करण्यात आला. या योजनेला प्रतिसाद वाढत आहे. पाच दिवसात २.१५ कोटीची थकबाकी वसूल झाल्याची माहिती मनपाचे उपायुक्त (मालमत्ता) मिलिंद मेश्राम यांनी दिली.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाTaxकर