शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Coronavirus: धक्कादायक! दुबईतून आलेल्या प्रवाशांची तपासणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 21:08 IST

जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ठळक मुद्देयंत्रणा ‘मिशन मोड’वर असताना विमानतळावर हलगर्जीपणा : कोरोनाचा शिरकाव रोखणार कसा?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जगभरात थैमान घालणाऱ्या ‘कोरोना’चा शिरकाव उपराजधानीतदेखील झाला असून संपूर्ण यंत्रणा ‘मिशन मोड’वर गेली आहे. विमानतळावर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करणे आवश्यक असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईहून आलेल्या काही प्रवाशांची मुंबई विमानतळावर जुजबी तपासणी झाली परंतु नागपूर विमानतळावर तर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. खुद्द प्रवाशांनादेखील ही बाब खटकली व सामाजिक भान जपत त्यांनी स्वत: आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला.नागपुरातील काही प्रवासी दुबई येथे फिरायला गेले होते. यात ‘लोकमत’चे वाचक असलेल्या एका व्यक्तीचादेखील समावेश होता. मुंबईहून शारजा विमानतळावर पोहोचल्यावर त्यांची कुठलीही तपासणी झाली नाही. त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून ‘मास्क’ व ‘सॅनिटायझर’चा उपयोग केला. दोन दिवसांअगोदर हे सर्व लोक मुंबईमागे नागपुरात परतले. मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रामुख्याने सिंगापूर, इटली, हॉंगकॉंग, चीन इत्यादी देशांतून येणाऱ्या प्रवाशांचीच सखोल तपासणी होत होती. संयुक्त अरब आमिरातीहून आलेल्या प्रवाशांची जुजबी तपासणी झाली.त्यानंतर पुढील विमान पकडून हे सर्व जण नागपूरकडे निघाले. नागपूर विमानतळावर त्यांना साधी विचारणादेखील झाली नाही. आम्ही नागपूर विमानतळावर उतरल्यावर वैद्यकीय तज्ज्ञांचे ‘युनिट’ आम्हाला तपासायलादेखील आले नाही. आम्ही सर्व जण दुबईहून आलो होतो. त्यामुळे तपासणी होईल असे वाटले होते. परंतु असे काहीही झाले नाही, असे संबंधित व्यक्तीने कुठलीही ओळख न छापण्याच्या अटीवर सांगितले.आरोग्य यंत्रणेशी स्वत:च केला संपर्कपुणे येथे दुबईहून आलेल्या प्रवाशांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचे समोर आल्याने आम्हीदेखील हादरलो होतो. नागपूर विमानतळावर आमची सखोल तपासणी न झाल्याने आम्ही स्वत:च आरोग्य यंत्रणेशी संपर्क केला. मात्र जर तुमच्यात काही लक्षणे आढळत असतील तरच नमुने द्यायला या, असे सांगण्यात आले. पुढील सात दिवस कुणाशीही संपर्क न ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या कालावधीत ताप, सर्दी, खोकला झाल्यास त्वरित संपर्क करण्यास सांगण्यात आले असल्याचे संबंधित व्यक्तीने ‘लोकमत’ला सांगितले.‘डोमेस्टिक’ प्रवाशांची तपासणी का नाही?नागपूर विमानतळावर केवळ आंतरराष्ट्रीय विमानांतून येणाºया प्रवाशांची तपासणी होत आहे. परदेशातून येणारे नागपुरातील प्रवासी अगोदर मुंबई किंवा दिल्ली येथे उतरतात व तेथून विमानाने नागपुरात येतात. एखाद्या प्रवासी मुंबई, दिल्ली विमानतळावर ‘कोरोना’ बाधित व्यक्तीच्या संपर्कात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येकाची नागपूर विमानतळावर सखोल तपासणी होणे आवश्यक आहे. प्रवासी तपासणीविना शहरात दाखल होत असल्याने कोरोना विषाणूची लागण होण्याचा धोका निर्माण झाला आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाDr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर