शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रशासनाचा आपसात ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:03 IST

संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही. शासनाचे आदेश नागपूर शहर व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे व वेगवेगळ्या दिवशी जाहीर केले जातात. परिणामी अंमलबजावणीऐवजी संभ्रम निर्माण होतो.केंद्र व राज्य सरकारने ३ मेनंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही प्रमाणात शहरांमध्ये सवलत देण्याचाही निर्णय घेतला. साहजिकच हा निर्णय सर्वच जिल्ह्यांसाठी होता. यात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल केले होते. नागपूरचाच विचार केला तर हेच आदेश नागपूर शहरासाठी मनपा आयुक्तांनी आधीच जारी करून टाकले. त्यामुळे ग्रामीण भागाचे काय? असा संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांना दुसºया दिवशी तेच आदेश पुन्हा जारी करावे लागले. शहराचाच विचार केला तर कोरोनामुक्त असलेल्या सहा झोनमध्ये दारू, रेस्टॉरंट आदी सोडून इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. काही लोकांनी दुकाने सुरूकेली परंतु पोलिसांनी येऊन त्यांना ती बंद करायला लावली. १७ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळून काहीही सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले. रेशन वाटपाबाबतही असेच चित्र होते. त्यामुळेच बराच गोंधळ उडाला होता.मुळातच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंबंधातील नियमित आढावा बैठक होत असते. त्यात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीत असतात. यात ठरलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी अधिकाºयांनी एकत्रितपणे राबवली तर त्याचा नेमका परिणाम दिसून येईल. मात्र तसे होत नाही. मनपा आयुक्त शहरासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी करतात तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र आदेश काढतात. यातून अधिकाºयांमध्ये एकजुटीचा नव्हे तर नियोजनाचाच अभाव दिसून येतो. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला संभ्रम लोकप्रतिनिधींनाही दूर करण्यास कठीण जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर