शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
3
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
4
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
5
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
6
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
7
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
8
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
10
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
11
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
12
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
13
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
14
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
15
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
16
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
17
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
18
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण
19
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
20
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)

CoronaVirus in Nagpur : नागपुरात प्रशासनाचा आपसात ताळमेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:03 IST

संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही.

ठळक मुद्देनियोजनाचा अभाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संपूर्ण जग आणि देश कोरोना विषाणूरूपी संकटाशी लढत आहे. नागपुरात आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू आहे. नागपूर हे रेड झोनमध्ये आहे. दिवसेंदिवस परिस्थिती नाजूक होत चालली आहे. अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारच्या आदेशाची अंमलबजावणी आणि शेवटच्या घटकापर्यंत लाभ पोहोचण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेने मिळून काम करणे आवश्यक असते, परंतु नागपुरात तरी असे चित्र दिसून येत नाही. शासनाचे आदेश नागपूर शहर व ग्रामीण भागासाठी वेगवेगळे व वेगवेगळ्या दिवशी जाहीर केले जातात. परिणामी अंमलबजावणीऐवजी संभ्रम निर्माण होतो.केंद्र व राज्य सरकारने ३ मेनंतर लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला तेव्हा काही प्रमाणात शहरांमध्ये सवलत देण्याचाही निर्णय घेतला. साहजिकच हा निर्णय सर्वच जिल्ह्यांसाठी होता. यात स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकारी प्रशासकीय अधिकाऱ्यांना बहाल केले होते. नागपूरचाच विचार केला तर हेच आदेश नागपूर शहरासाठी मनपा आयुक्तांनी आधीच जारी करून टाकले. त्यामुळे ग्रामीण भागाचे काय? असा संभ्रम निर्माण झाला. जिल्हाधिकाऱ्यांना दुसºया दिवशी तेच आदेश पुन्हा जारी करावे लागले. शहराचाच विचार केला तर कोरोनामुक्त असलेल्या सहा झोनमध्ये दारू, रेस्टॉरंट आदी सोडून इतर दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. काही लोकांनी दुकाने सुरूकेली परंतु पोलिसांनी येऊन त्यांना ती बंद करायला लावली. १७ मे पर्यंत जीवनावश्यक वस्तू वगळून काहीही सुरू होणार नाही, असे सांगण्यात आले. रेशन वाटपाबाबतही असेच चित्र होते. त्यामुळेच बराच गोंधळ उडाला होता.मुळातच पालकमंत्री नितीन राऊत यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासंबंधातील नियमित आढावा बैठक होत असते. त्यात राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयांबाबत चर्चा होते. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ अधिकारी बैठकीत असतात. यात ठरलेल्या निर्णयांची अंमलबाजवणी अधिकाºयांनी एकत्रितपणे राबवली तर त्याचा नेमका परिणाम दिसून येईल. मात्र तसे होत नाही. मनपा आयुक्त शहरासाठी स्वतंत्रपणे आदेश जारी करतात तर ग्रामीण भागासाठी जिल्हाधिकारी स्वतंत्र आदेश काढतात. यातून अधिकाºयांमध्ये एकजुटीचा नव्हे तर नियोजनाचाच अभाव दिसून येतो. लोकप्रतिनिधींनाही विश्वासात घेतले जात नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये असलेला संभ्रम लोकप्रतिनिधींनाही दूर करण्यास कठीण जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर