शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

CoronaVirus in Nagpur : नागपुरात चाचण्या घटल्या, रुग्णसंख्येतही घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:37 IST

सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले.

ठळक मुद्दे ४,६३३ चाचण्या : १,००२ रुग्ण पॉझिटिव्ह : मागील १५ दिवसातील सर्वात कमी नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच रॅपिड अ‍ॅन्टिजन व आरटीपीसीआर या दोन्ही चाचण्यांचा वेग वाढला होता. साधारण एका दिवसात सात ते नऊ हजार चाचण्या व्हायच्या. यामुळे रुग्णसंख्या १५०० ते २०००च्या दरम्यान दिसून यायची. परंतु सोमवारी अचानक चाचण्यांच्या संख्येत घट आली. के वळ ४६३३ चाचण्या झाल्या. परिणामी, रुग्णांचीही नोंद कमी झाली. १००२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. विशेष म्हणजे, मागील १५ दिवसांतील ही सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. मात्र, रोजच्या मृत्यूचे सत्र कायम आहे. आज ४४ रुग्णांचे बळी गेले. मृतांची एकूण संख्या १७०२ तर बाधितांची एकूण संख्या ५३,४७३ झाली आहे. या महिन्यात तीन दिवस रुग्णांची संख्या दोन हजारांवर गेल्याने चिंतेचे वातावरण होते. ८ सप्टेंबर रोजी ८,३०८ चाचण्या झाल्या, यात २,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. ११ सप्टेंबर रोजी ८,८७४ चाचण्या झाल्या, यात २,०६० रुग्णांचे निदान झाले. १३ सप्टेंबर रोजी ७,९७३ चाचण्या झाल्या, यात २,३४३ रुग्णांची नोंद झाली होती. परंतु आज शहरामध्ये २,३९७ तर ग्रामीणमध्ये के वळ ८२ अशा एकूण २,४७९ चाचण्या झाल्या. रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचण्या शहरामध्ये १,४९९ तर ग्रामीणमध्ये ६५५ अशा एकूण २,१५४ झाल्या. या चाचण्यांतून ३१० रुग्ण पॉझिटिव्ह तर आरटीपीसीआर चाचणीतून ६९२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ६७०, ग्रामीणमील ३२९ तर जिल्ह्याबाहेरील तीन रुग्ण आहेत.क्षमतेच्या तुलनेत चाचण्या कमीमेडिकलच्या प्रयोगशाळेत एका दिवसात चाचण्यांची क्षमता ७५०वर असताना आज ५६२ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. एम्सच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता २००वर असताना १६७ चाचण्या झाल्या. ९८ रुग्ण पॉझिटिव्ह आले. मेयोच्या प्रयोगशाळेत चाचण्यांची क्षमता ७००वर असताना ४८८ चाचण्या झाल्या. १४१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. माफसूच्या प्रयोगशाळेची क्षमता २०० असताना १९३ चाचण्या झाल्या. ४० रुग्ण पॉझिटिव्ह आले. नीरीच्या प्रयोगशाळेची क्षमता २५० असताना २१८ चाचण्या झाल्या. ४९ रुग्ण पॉझिटिव्ह आले.४० हजार रुग्ण बरेकोरोनाबाधित असलेले १५१८ रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०,६६७ झाली आहे. एकूण रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होण्याचे प्रमाण ७६.०५ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३२,९९६ तर ग्रामीणमधील ७६७१ रुग्ण आहेत. सध्या ११,१०४ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ४४५५बाधित रुग्ण : ५३,४७३बरे झालेले : ४०,६६७उपचार घेत असलेले रुग्ण : १११०४मृत्यू :१७०२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर