शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; कोरोना काळात निद्रानाशाच्या समस्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 07:30 IST

Nagpur News कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेली पोकळी नैराश्येस कारणीभूत ठरत आहे. नैराश्य हा एक आजार आहे आणि एकटेपणा आला की नैराश्य वाढते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र, कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच निद्रानाश हा वाढलेल्या अनावश्यक तणावामुळे होतो आणि हा तणाव सद्यस्थितीत वाढलेल्या एकलेपणामुळे वाढत आहे.

तणावाची कारणे

- लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असणे

- घरात राहायची सवय नसल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने नैराश्य वाढणे

- वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडणे

- मित्र/मैत्रिणींशी संवाद तुटल्याने किंवा संवाद साधण्यासाठी कुणीच नसल्याने

- साचेबद्ध आयुष्य झाल्याने तणाव वाढत जातो.

तणावापासून दूर कसे राहता येईल

- सर्वप्रथम जे घडत आहे किंवा होत आहे, त्याचा स्वीकार करणे

- माझा लाभ कशात आहे, याचे चिंतन करणे

- संकटाला देवाने दिलेली संधी समजून वागणे

- असा वेळ कधीच भेटणार नव्हता, तो मिळाला म्हणून जे शक्य नव्हते ते काम करणे. उदा. सिनेमे बघणे, पुस्तके वाचणे, छंदोपासना आदी.

- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता नको तर काळजी घ्या.

सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

- मला झोप का येत नाही?

- ही अनिश्चितता कधी संपेल?

- दिवस कसा काढावा, समजत नाही?

- घरात राहून कोणती कामे करू?

दुसऱ्याला मदत करा आणि इम्युनिटी वाढवा

रोगप्रतिकारक शक्तीचे गणित तुमच्या समाधानाशी निगडित आहे. एका अर्थी संकटात दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद सर्वाधिक असतो. त्यामुळे मदतीसाठी सज्ज राहा, तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. सोबतच रडगाणे न गाताच वास्तवाचा सामना करा आणि मला हे बदलवता येते, हे स्वत:लाच सांगा. योग शिकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आशेवर जगणे हे उत्तम टॉनिक आहे.

- डॉ. अविनाश जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

हल्लीच्या समस्या क्लिनिकल डिप्रेशन नव्हेत

हल्ली मानसिक स्वास्थ्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली नक्कीच आहे. मात्र, खूप गंभीर असे विषय नाहीत. सर्वाधिक रुग्ण केवळ आणि केवळ झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारी क्लिनिकल डिप्रेशनच्या नाहीत. सवय नसलेल्या गोष्टी अचानक जीवनात आल्या की या समस्या येतात. लॉकडाऊन ही अनपेक्षित घडलेली क्रिया आहे आणि त्यामुळे अशा क्षुल्लक तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस