शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
3
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
4
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
5
रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
6
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
7
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
8
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
9
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
10
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
11
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
12
२०२७ पर्यंत युनायटेड अमेरिकेचं विभाजन? ट्रम्प ठरणार USAचे शेवटचे राष्ट्राध्यक्ष! मोठे भाकित...
13
मराठी अभिनेत्रीचं "न्यूड" फोटोशूट; सौंदर्य पाहून चाहते प्रेमात, करत आहेत कौतुक
14
नवरात्री २०२५: १२५ वर्ष जुने कोकणातले पंचमुखी गायत्री मंदिर पाहिले का? मंत्रमुग्ध करणारी मूर्ती आणि इतिहास 
15
अश्विनची लवकरच क्रिकेटमध्ये नवी इनिंग; आता पाकिस्तानी क्रिकेटरसोबत एकाच संघात खेळणार!
16
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
17
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
18
15 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; Volvo कार जप्त
19
Volvo EX30: एका चार्जवर ४८० किमी धावणार; वोल्वोची बहुप्रतीक्षित इलेक्ट्रिक कार भारतात लॉन्च!
20
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार

Coronavirus in Nagpur; कोरोना काळात निद्रानाशाच्या समस्या वाढल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 07:30 IST

Nagpur News कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संक्रमणामुळे वाढलेली आरोग्याची धास्ती आणि टाळेबंदीमुळे निर्माण झालेली पोकळी नैराश्येस कारणीभूत ठरत आहे. नैराश्य हा एक आजार आहे आणि एकटेपणा आला की नैराश्य वाढते, असा सर्वसाधारण अनुभव आहे. मात्र, कोरोना काळात सर्वाधिक प्रमाण वाढले आहे ते निद्रानाशाचे. डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये निद्रानाश झालेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. स्वाभाविकच निद्रानाश हा वाढलेल्या अनावश्यक तणावामुळे होतो आणि हा तणाव सद्यस्थितीत वाढलेल्या एकलेपणामुळे वाढत आहे.

तणावाची कारणे

- लॉकडाऊनमुळे घरात बंदिस्त असणे

- घरात राहायची सवय नसल्याने आणि बाहेर पडता येत नसल्याने नैराश्य वाढणे

- वेळ कसा घालवायचा हा प्रश्न पडणे

- मित्र/मैत्रिणींशी संवाद तुटल्याने किंवा संवाद साधण्यासाठी कुणीच नसल्याने

- साचेबद्ध आयुष्य झाल्याने तणाव वाढत जातो.

तणावापासून दूर कसे राहता येईल

- सर्वप्रथम जे घडत आहे किंवा होत आहे, त्याचा स्वीकार करणे

- माझा लाभ कशात आहे, याचे चिंतन करणे

- संकटाला देवाने दिलेली संधी समजून वागणे

- असा वेळ कधीच भेटणार नव्हता, तो मिळाला म्हणून जे शक्य नव्हते ते काम करणे. उदा. सिनेमे बघणे, पुस्तके वाचणे, छंदोपासना आदी.

- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे चिंता नको तर काळजी घ्या.

सर्वाधिक विचारले जाणारे प्रश्न

- मला झोप का येत नाही?

- ही अनिश्चितता कधी संपेल?

- दिवस कसा काढावा, समजत नाही?

- घरात राहून कोणती कामे करू?

दुसऱ्याला मदत करा आणि इम्युनिटी वाढवा

रोगप्रतिकारक शक्तीचे गणित तुमच्या समाधानाशी निगडित आहे. एका अर्थी संकटात दुसऱ्याला मदत करण्याचा आनंद सर्वाधिक असतो. त्यामुळे मदतीसाठी सज्ज राहा, तुमची इम्युनिटी नक्की वाढेल. सोबतच रडगाणे न गाताच वास्तवाचा सामना करा आणि मला हे बदलवता येते, हे स्वत:लाच सांगा. योग शिकण्याची ही सर्वोत्तम संधी आहे. आशेवर जगणे हे उत्तम टॉनिक आहे.

- डॉ. अविनाश जोशी, मानसोपचारतज्ज्ञ

हल्लीच्या समस्या क्लिनिकल डिप्रेशन नव्हेत

हल्ली मानसिक स्वास्थ्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली नक्कीच आहे. मात्र, खूप गंभीर असे विषय नाहीत. सर्वाधिक रुग्ण केवळ आणि केवळ झोपेच्या तक्रारी घेऊन येत आहेत. या तक्रारी क्लिनिकल डिप्रेशनच्या नाहीत. सवय नसलेल्या गोष्टी अचानक जीवनात आल्या की या समस्या येतात. लॉकडाऊन ही अनपेक्षित घडलेली क्रिया आहे आणि त्यामुळे अशा क्षुल्लक तक्रारी घेऊन येणाऱ्यांची संख्याही वाढल्याचे डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस