शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

CoronaVirus in Nagpur : नागपुरात कोरोनाच्या मृत्यूसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2020 23:04 IST

कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली.

ठळक मुद्दे३८ मृत्यू तर १,२०५ रुग्णांची नोंद : शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ रुग्ण पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाच्या रुग्णसंख्येचा वेग कायम असताना मृत्यूच्या संख्येत घट होताना दिसून येत आहे. ही एक समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे, याच महिन्यात सर्वाधिक ६४ बळीची नोंद झाली असताना शुक्रवारी ही संख्या ३८वर आली. आज १,२०५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात शहरातील ८४८, ग्रामीणमधील ३४९ तर जिल्ह्याबाहेरील आठ रुग्णांचा समावेश आहे. एकूण रुग्णसंख्या ७४,२३१ झाली असून मृतांची संख्या २,३४०वर पोहचली आहे. नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद सप्टेंबर महिन्यात झाली. ऑगस्ट महिन्यात १५ ते ३० दरम्यान रोज मृत्यूची नोंद व्हायची परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून मृतांचा आकडा ४०वर गेला. १६ सप्टेंबर रोजी ६० वर तर १७ सप्टेंबर रोजी मृतांची संख्या ६४ वर गेली होती. या आठवड्यात ही संख्या ४० ते ५०च्या घरात होती. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील १,७११, ग्रामीणमधील ४०२ तर जिल्ह्याबाहेरील २२७ आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण ३.१५ टक्के आहे.आठवड्यात ३३० मृत्यू, ८,४४२ पॉझिटिव्हया आठवड्यात नागपूर जिल्ह्यात ३३० रुग्णांचे बळी गेले तर ८,४४२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत मृत्यू व रुग्णसंख्येत किंचीत घट आली आहे. आतापर्यंत सर्वाधिक मृत्यू मेडिकलमध्ये झाले. १,०३७ मृत्यूची नोंद आहे. मेयोमध्ये ९५४ तर एम्समध्ये तीन बळी गेले. उर्वरित ३४० रुग्णांचे मृत्यू खासगी हॉस्पिटलमध्ये झाले आहेत.३,२३१ अ‍ॅन्टिजेन चाचणीतून २,९९६ रुग्ण निगेटिव्हआज ३,२३१ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. यात २३५ रुग्ण पॉझिटिव्ह तर २,९९६ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. तर आरटीपीसीआर चाचणीत एम्सच्या प्रयोगशाळेतून १८९, मेडिकलच्या प्रयोगशाळेतून ६५, मेयोच्या प्रयोगशाळेतून १७१, माफसुच्या प्रयोगशाळेतून ५२, नीरीच्या प्रयोगशाळेतून ६९ तर खासगी लॅबमधून ४२४ रुग्ण बाधित असल्याचे निदान झाले.बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिकआज १,२०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले असले तरी १,५३६ रुग्ण बरे झाले. बाधितांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिक असल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ५६,६१६ रुग्ण बरे झाले आहेत. यात शहरातील ४५,६५३ तर ग्रामीणमधील १०,९६३ रुग्ण आहेत. रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ७६.२७ टक्के आहे. सध्या १५,२७५ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचाराखाली आहेत.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६,२६०बाधित रुग्ण : ७४,२३१बरे झालेले : ५६,६१६उपचार घेत असलेले रुग्ण : १५,२७५मृत्यू : २,३४०

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू