शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

कोरोना मृत्यूच्या आकड्यांचा घोळ ; मनपा आयुक्तांनी अहवाल मागितला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 08:00 IST

Coronavirus in Nagpur प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी चौकशी अहवाल मागितला आहे.

ठळक मुद्दे नोंदीच्या तुलनेत घाटावर अधिक अंतिम संस्कार

 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : एप्रिल महिन्यात कोरोना प्रकोपामुळे नागपूर शहरातील मृतकांची संख्या वाढली आहे. मनपा प्रशासनाकडून शहरात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी दररोज जाहीर केली जाते. परंतु प्रशासनाकडून जाहीर करण्यात येणारे आकडे आणि शहरातील दहन घाटावर करण्यात आलेले अंत्यसंस्कार याचा विचार करता, जाहीर करण्यात येणाऱ्या आकडेवारीच्या तिप्पट अंतिम संस्कार होत असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. यासंदर्भात मनपा आयुक्तांनी चौकशी अहवाल मागितला आहे. मृतकांच्या आकडेवारीची मनपा प्रशासनाकडून शहानिशा केली जात आहे.

सोमवारी जिल्ह्यात ८९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यात शहरातील ५४, ग्रामीणमधील २५, तर जिल्ह्याबाहेरील १० जणांचा समावेश होता. परंतु शहरातील १४ घाटांवर सोमवारी तब्बल ३९२ मृतदेहांवर अंतिम संस्कार करण्यात आले. यात कोविडमुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २८८ इतकी आहे, तर १०४ नॉनकोविड मृत्यूची नोंद घाटावर करण्यात आल्याचे लोकमत चमूने केलेल्या रियालिटी चेकमध्ये आढळून आले होते. दररोजचे वास्तव असेच आहे. याबाबतचे वृत्त प्रकाशित होताच मनपा प्रशासनात खळबळ उडाली. याची दखल घेत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश मनपाचे अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांना दिले आहे.

नागपूर शहरात दुसऱ्या जिल्ह्यातील रूग्णांवर उपचार सुरू असताना मृत्यू होतात. त्यांच्यावर नागपुरातच अंतिम संस्कार केले जातात. यामुळे आकडेवारीत तफावत असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. परंतु मनपा प्रशासनाकडून दररोज कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या जाहीर केली जाते. यात नागपूर शहर, ग्रामीण व जिल्ह्याबाहेरील रूग्णांचा समावेश असतो. याचा विचार करता घाटावरील आकडे व जाहीर करण्यात येणारे आकडे यात घोळ असल्याचे दिसून येते.

चौकशीचे आदेश दिले आहे

नागपूर शहरातील रूग्णालयात बाहेरील जिल्ह्यातील रूग्ण मोठ्या प्रमाणात उपचारासाठी येतात. यादरम्यान काहींचा मृत्यू झाल्यास त्यांची नोंद होत नाही. यामुळे घाटावर करण्यात येणारे अंतिम संस्कार व कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद यात तफावत असू शकते. यासंदर्भात अतिरिक्त आयुक्त संजय निपाने यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहे. अहवालानंतर वस्तुस्थिती स्पष्ट होईल.

राधाकृष्णन बी., आयुक्त महापालिका

काही अंतिम संस्कार दुसऱ्या दिवशी

सर्व मृतकांवर त्याच दिवशी अंतिम संस्कार होत नाही. काही जणांवर दुसऱ्या दिवशी अंतिम संस्कार केले जातात. यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंद व घाटावरील अंतिम संस्कार यात तफावत असू शकते.

दयाशंकर तिवारी, महापौर

आकड्यात तफावत दिसते

कोरोनामुळे होणारे मृत्यू व घाटावर करण्यात येणारे अंतिम संस्कार यात मोठी तफावत आहे. यासंदर्भात संबंधित विभागाकडून माहिती मागवून शहानिशा केली जाईल. परंतु कोरोनामुळे दररोज होणाऱ्या मृत्यूची नोंद व घाटावर होणारे अंतिम संस्कार यात मोठी तफावत दिसत आहे. वास्तव पुढे आले पाहिजे.

प्रकाश भोयर, अध्यक्ष स्थायी समिती मनपा

...

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस