शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:13 IST

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे सहा दिवसात हजार रुग्णांची नोंद बरे होण्याचे प्रमाण ६४ वरून ६० टक्क्यांवर :

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली आहे. रुग्णांची संख्या २०० वर गेल्याने व गेल्या १४ दिवसापासून मृत्यूसत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेडिकलच्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, २० जुलै रोजी जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.०५ टक्के होते, ते आता ६०.५३ टक्क्यांवर आले आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लोकांनीही प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, सोमवारी रस्त्यांवर, दुकानात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मेयोमध्ये पाच कोविड पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली. यात लष्करीबाग येथील ६३ वर्षीय महिला, कामठी येथील ४३ वर्षीय पुरुष, बैतुल मध्य प्रदेश येथील ६५वर्षीय पुरुष, शाकील ले-आऊट गोधनी येथील ४९ वर्षीय पुरुष व पाचपावली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण होते. पाचपावली येथील पुरुष रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात छत्रपतीनगर कामठी येथील ४५ वर्षीय महिला तर अजनी येथील ४८वर्षीय पुरुष रुग्ण होता. आतापर्यंतच्या मृत्यूमध्ये १५ ग्रामीणमधील, ४८ शहरातील तर २० जिल्ह्याबाहेरील आहेत.

-ग्रामीणमध्ये ५३ तर शहरात १७३ बाधितग्रामीण भागात रविवारी ५३ तर शहरात १७३ असे एकूण २२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेयोच्या तून ६८, मेडिकलमधून पाच, एम्समधून ३२, नीरीमधून १३, माफसूमधून १६, खासगी लॅबमधून २२, अ­ॅन्टीजन चाचणीतून ६९ रुग्णांचे कोविड निदान झाले. आज ६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५९ झाली आहे. सद्यस्थितीत १५२१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी मेडिकलच्या विविध विभागात आठवर रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे ८० वर डॉक्टर व परिचारिकांचे नमुने तपासण्यात आले होते. यातील दोन इन्टर्न डॉक्टर पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, २० जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०२७ होती, ६ दिवसात हजार रुग्णांची वाढ होऊन ती ४०६२ वर पोहचली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस