शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

नागपुरात कोरोनाचा कहर; २२५ पॉझिटिव्ह, ७ मृत्यू; चार हजाराचा आकडा पार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 11:13 IST

कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. मात्र, सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, तज्ज्ञाचे म्हणणे आहे.

ठळक मुद्दे सहा दिवसात हजार रुग्णांची नोंद बरे होण्याचे प्रमाण ६४ वरून ६० टक्क्यांवर :

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जुलै महिन्यात कोरोनाबाधितांची संख्या भयावह स्थितीत वाढत आहे. रविवारी कोरोनाचे २२५ नवे रुग्ण व ७ मृत्यूची नोंद झाली. ही आतापर्यंतची विक्रमी संख्या आहे. रुग्णांची संख्या ४०६२ तर मृतांची संख्या ८३ वर पोहचली आहे. रुग्णांची संख्या २०० वर गेल्याने व गेल्या १४ दिवसापासून मृत्यूसत्र सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये मेडिकलच्या दोन डॉक्टरांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, २० जुलै रोजी जिल्ह्यात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ६४.०५ टक्के होते, ते आता ६०.५३ टक्क्यांवर आले आहे.कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने शनिवार व रविवार दोन दिवस जनता कर्फ्यूचे आवाहन करण्यात आले होते. लोकांनीही प्रतिसाद दिल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. मात्र, सोमवारी रस्त्यांवर, दुकानात, सार्वजनिक ठिकाणी गर्दी झाल्यास याचा फायदा होणार नसल्याचे, वैद्यकीय तज्ज्ञाचे म्हणणे आहे. फिजिकल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर व सॅनिटायझेशन महत्त्वाचे आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास रुग्णांची संख्या दुपटीने वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे. मेयोमध्ये पाच कोविड पॉझिटिव्ह मृत्यूची नोंद झाली. यात लष्करीबाग येथील ६३ वर्षीय महिला, कामठी येथील ४३ वर्षीय पुरुष, बैतुल मध्य प्रदेश येथील ६५वर्षीय पुरुष, शाकील ले-आऊट गोधनी येथील ४९ वर्षीय पुरुष व पाचपावली येथील ४६ वर्षीय पुरुष रुग्ण होते. पाचपावली येथील पुरुष रुग्णाचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मेडिकलमध्ये दोन रुग्णांचा मृत्यू झाला. यात छत्रपतीनगर कामठी येथील ४५ वर्षीय महिला तर अजनी येथील ४८वर्षीय पुरुष रुग्ण होता. आतापर्यंतच्या मृत्यूमध्ये १५ ग्रामीणमधील, ४८ शहरातील तर २० जिल्ह्याबाहेरील आहेत.

-ग्रामीणमध्ये ५३ तर शहरात १७३ बाधितग्रामीण भागात रविवारी ५३ तर शहरात १७३ असे एकूण २२५ रुग्ण पॉझिटिव्ह आले. यात मेयोच्या तून ६८, मेडिकलमधून पाच, एम्समधून ३२, नीरीमधून १३, माफसूमधून १६, खासगी लॅबमधून २२, अ­ॅन्टीजन चाचणीतून ६९ रुग्णांचे कोविड निदान झाले. आज ६७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २४५९ झाली आहे. सद्यस्थितीत १५२१ रुग्ण उपचार घेत आहेत. शनिवारी मेडिकलच्या विविध विभागात आठवर रुग्ण पॉझिटिव्ह आले. यामुळे ८० वर डॉक्टर व परिचारिकांचे नमुने तपासण्यात आले होते. यातील दोन इन्टर्न डॉक्टर पॉझिटिव्ह आले. धक्कादायक म्हणजे, २० जुलै रोजी रुग्णांची संख्या ३०२७ होती, ६ दिवसात हजार रुग्णांची वाढ होऊन ती ४०६२ वर पोहचली.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस