शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या विळख्यात ढाबे जोमात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2020 22:55 IST

एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग जोमात आहे आणि त्यामुळे नागपुरात रेकॉर्डतोड रुग्ण निघत आहेत आणि दुसरीकडे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी झपाटलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नाला शहर आणि शहराबाहेरील ढाबे संचालक गालबोट लावत आहेत.

ठळक मुद्देना प्रशासनाचे ना पोलिसांचे लक्ष : अजूनही रंगताहेत पार्ट्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एकिकडे कोरोना विषाणूचा संसर्ग जोमात आहे आणि त्यामुळे नागपुरात रेकॉर्डतोड रुग्ण निघत आहेत आणि दुसरीकडे संसर्गावर नियंत्रण मिळविण्यासाठी झपाटलेल्या स्थानिक प्रशासनाच्या प्रयत्नाला शहर आणि शहराबाहेरील ढाबे संचालक गालबोट लावत आहेत. स्थानिक प्रशासन व पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर लढा देत असल्याचे बघून, ढाबे मालकांचे चांगलेच फावले आहे आणि त्यामुळेच चिअर्स पार्ट्या जोमात चालत आहेत.दोन महिन्यापूर्वी एक-दोनच्या संख्येत निघणाऱ्या संक्रमित रुग्णांचा आकडा म्हणता म्हणता शंभराच्या वर गेला आणि गेल्या महिनाभरात रुग्णांच्या आकडेवारीने दोन हजाराचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवारी तर एकाच दिवसात १८३ रुग्णांची भर पडली. असे असतानाही नागरिकांकडून फिजिकल डिस्टन्सिंग जपले जात नसल्याचे दिसून येते. शहराच्या आत आणि शहराबाहेर चालणाऱ्या ढाबे व सावजी भोजनालयांमध्ये जंगी पार्ट्यांची रेलचेल असल्याचे दिसून येत आहे. यावर कुणाचेही नियंत्रण नसल्यानेच ढाबे मालक व भोजनालय मालकांचे फावते आहे. काहीच दिवसापूर्वी ‘लोकमत’ने याबाबत स्टिंग ऑपरेशन करत ढाब्यांची पोलखोल केली होती. त्यामुळे, पोलिसांनी महामार्गांवरील ढाब्यांकडे विशेषत्वाने लक्ष पुरविण्यास सुरुवातही केली. मात्र, पोलिसांची नजर फिरताच पुन्हा ढाब्यांवरील झगमगाट उजळत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे या ढाब्यांवर येणाऱ्या ग्राहकांना सॅनिटायझरही पुरविले जात नाही आणि फिजिकल डिस्टन्सिंगचा तर पार फज्जाच उडत असल्याचे निदर्शनास येते. तब्बल दोन-अडीच महिने टाळेबंदीनंतर शासनाने नागरिकांना काही निर्देश जारी करत टाळेबंदी शिथिल करण्यास सुरुवात केली आहे. त्यात रेस्तराँ, ढाबे, भोजनालयांना केवळ पार्सल देण्याची परवानगी देऊन व्यवहार सुरू करण्यास सांगितले होते. मात्र, बोट दिले तर हात पकडण्याची मानसिकता असलेल्या या संचालकांनी थेट नेहमीप्रमाणेच ग्राहकांच्या बसण्याची, जेवण्याची व पिण्याचीही व्यवस्था केलेली आहे. अशा स्थितीत कोण, कुठून येतो हे कळत नसल्याने संसर्गाचा धोका बळावला आहे.शहरांतर्गत भोजनालयांमध्येही चालताहेत पार्ट्यामहामार्गासोबतच शहरांतर्गत भोजनालयांमध्येही रात्रीबेरात्री पार्ट्या उडत आहेत. बाहेरून दरवाजे व लाईट बंद करून आतमध्ये ग्राहकांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, याकडे ना शासनाचे ना प्रशासनाचे लक्ष आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याfoodअन्न