शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांवरही काेराेनाचे संकट; धर्मगुरूंनी स्वीकारला गृह जीवनाकडे परतण्याचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 08:50 IST

Nagpur News काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे.

ठळक मुद्दे अनेक विहारांच्या भिक्खूंसमाेर जीवनयापनाचा प्रश्न

योगेंद्र शंभरकर

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : समाजात नव्या पिढीला धर्म, संस्कार व कर्तव्याची जाणीव करून देण्यात धर्मगुरूंची भूमिका महत्त्वाची असते. याप्रमाणेच बाैद्ध भिक्खू घर, कुटुंबाचा त्याग करून समाजसेवा आणि धम्म प्रचाराच्या कार्यासाठी विहारात वास्तव्य करतात. मात्र काेराेना महामारीचे सावट धम्म प्रचाराच्या कार्यावरही पसरले आहे. लाॅकडाऊनमुळे शहरात अनेक भिक्खू संघाशी जुळलेल्या भिक्खूंचे धम्म प्रसारासाठी बाहेर जाणे बंद झाले आहे. दुसरीकडे उपासक-उपासिकांचेही विहारात येणेही बंद झाले आहे. अशा परिस्थितीत या भिक्खूंची विचारपूस करणारा कुणी नाही. त्यामुळे भिक्खूंसमाेर जीवन कंठण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या परिस्थितीमुळे अनेक भिक्खू त्यांच्या घराकडे परतले आहेत तर काही परतण्याच्या विचारात असल्याचे दिसून येत आहे.

प्रसंग १ : आराेग्य समस्यांनी वाढविली चिंता

उत्तर नागपुरातील एका माेठ्या बुद्धविहारातील ७२ वर्षीय भन्तेजी काेराेना काळात आपल्या घराकडे परतले. मिळालेल्या माहितीनुसार त्यांची प्रकृती बिघडली हाेती. या काळात त्यांची देखभाल करणारे कुणी नव्हते. याच चिंतेमुळे ते घरी परतल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रसंग दुसरा : मुलीच्या घरी गेले

याचप्रमाणे नारा रिंग राेडवरील एका विहारातील ७० वर्षीय भदन्त संघपाल यांचेही जीवनयापन करणे कठीण झाले हाेते. त्यामुळे त्यांनाही मुलीच्या घरी परत जावे लागले.

प्रसंग तिसरा : तरुण भिक्खूही परतले

स्थानिकांच्या माहितीनुसार काैशल्यानगर येथील विकारात राहून काही तरुण भदन्त धम्मप्रसार करीत हाेते. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांना घराकडे परतावे लागले.

काेराेनाने घेतला अनेक भिक्खूंचा बळी

शहरात जवळपास ८०० बुद्धविहार आहेत. यामध्ये बहुतेक वृद्ध भन्ते सेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या उपचाराचा, औषधांचा खर्च करण्याची जबाबदारी घेणाऱ्या उपासकांची संख्या नगण्य आहे. नुकतेच गिट्टीखदान व सम्यकनगर येथील विहारात राहणाऱ्या काही भिक्खूंचे काेराेनामुळे निधन झाले.

समाजाला पुढे यावे लागेल

ज्येष्ठ भदन्त नागवंश म्हणाले, समाज प्रबाेधन व धर्म प्रचारासाठी प्रत्येक समाजाचे धर्मगुरू, पुराेहित आपला गृहत्याग करून समाजसेवेसाठी कार्य करतात. बाैद्ध भिक्खूंचेही तसेच आहे. या भिक्खूंचे जीवन उपासकांच्या दानावरच अवलंबून असते. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी समाजाने पुढे येणे आवश्यक आहे. परिसरातील नागरिकांनी थाेडी का हाेईना पण यथाशक्ती मदत करण्याची गरज आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस