शहरं
Join us  
Trending Stories
1
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
2
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
3
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
4
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
5
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
6
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
7
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
8
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
9
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
10
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
11
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
12
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
13
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
14
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
15
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
16
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
17
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
18
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
19
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
20
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)

Corona virus : हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 20:50 IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

ठळक मुद्देजनतेने सक्तीची वेळ आणू नये : नागरिकांनी संशयितांची नावे कळवावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयातील जनप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी हे आवाहन केले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.राऊत म्हणाले, जनतेने राष्ट्राचा विचार करावा. लोकांच्या सहकार्याची आज गरज आहे. रुग्णांच्या घरावर पोलिसांची नजर असून त्यांना घरीच कोरोंटाईन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्ण मोकळे फिरत असल्याचे यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. कोरोनासंदर्भात विदेशी पर्यटकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.विदेशातून आलेल्या लोकांनी स्वत:हून आपली माहिती कळवावी आणि उपचार करून घ्यावेत. जनतेला सुद्धा अशा नागरिकासंदर्भात माहिती असेल तर त्यांनी त्यांची नावे प्रशासनाला द्यावी. भविष्यात गरज पडली तर ट्रान्सपोर्ट बंदचा देखील विचार करावा लागेल. राज्यात आणीबाणी आणि आपत्कालीन कायदा लागू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची काळजी सर्वांनी घ्यावी, अन्यथा प्रशासनाला सक्ती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.जनता स्वयंस्फूर्तीने प्रसार रोखण्यासाठी पुढे येत आहे. प्रशासनाच्या कामामुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे ही परिस्थिती नियंत्रणात असल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा मंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, मेयोचे डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मजूरवर्गांसाठी नियोजन करण्याचा सरकारचा विचारनितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत प्रशासनाने बंदी घातल्याने मजूरवर्गाची अडचण झाली आहे. हे आम्ही समजू शकतो. ३१ मार्चनंतर अशीच परिस्थिती कायम राहिली तर त्यांना कशी मदत करता येईल याचे नियोजन आम्ही करू. या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर स्वत: नियंत्रण ठेवून आहेत.टोल नाक्यांवर होणार तपासणीकोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात येणाऱ्या टोल नाक्यावर तसेच आंतरराज्य सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. आठवडी बाजार बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीचा दुसरा टप्पा सुरू असून याचा उद्रेक वाढू नये याची खबरदारी घेण्यात आल्याची ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Rautनितीन राऊत