शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

Corona virus : हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता : नितीन राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 20:50 IST

पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.

ठळक मुद्देजनतेने सक्तीची वेळ आणू नये : नागरिकांनी संशयितांची नावे कळवावी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधानांनी जाहीर केलेला हा कर्फ्यू नव्हे तर जनतेच्या काळजीसाठी सरकारने घेतलेली दक्षता आणि आवाहन आहे. हे देशावर आलेले संकट आहे. त्यामुळे त्याचे सर्व नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन पालकमंत्री नितीन राऊत यांनी केले.विभागीय आयुक्त कार्यालयातील जनप्रतिनिधी, विविध पक्षांचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत यांनी हे आवाहन केले. पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार, विभागीय आयुक्त विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे उपस्थित होते.राऊत म्हणाले, जनतेने राष्ट्राचा विचार करावा. लोकांच्या सहकार्याची आज गरज आहे. रुग्णांच्या घरावर पोलिसांची नजर असून त्यांना घरीच कोरोंटाईन करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. संशयित रुग्ण मोकळे फिरत असल्याचे यावेळी पत्रकारांनी मंत्र्यांच्या लक्षात आणून दिले. कोरोनासंदर्भात विदेशी पर्यटकांची यादी प्रशासनाने तयार केली आहे.विदेशातून आलेल्या लोकांनी स्वत:हून आपली माहिती कळवावी आणि उपचार करून घ्यावेत. जनतेला सुद्धा अशा नागरिकासंदर्भात माहिती असेल तर त्यांनी त्यांची नावे प्रशासनाला द्यावी. भविष्यात गरज पडली तर ट्रान्सपोर्ट बंदचा देखील विचार करावा लागेल. राज्यात आणीबाणी आणि आपत्कालीन कायदा लागू आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची काळजी सर्वांनी घ्यावी, अन्यथा प्रशासनाला सक्ती करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.जनता स्वयंस्फूर्तीने प्रसार रोखण्यासाठी पुढे येत आहे. प्रशासनाच्या कामामुळे आणि वैद्यकीय सेवेमुळे ही परिस्थिती नियंत्रणात असल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे कौतुक केले.या पत्रकार परिषदेपूर्वी झालेल्या बैठकीत कोरोनाच्या उपाययोजनांचा आढावा मंत्र्यांनी घेतला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी संजय यादव, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मिश्रा, मेयोचे डॉ. अजय केवलिया, जिल्हा शल्य चिकित्सक देवेंद्र पातुरकर यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.मजूरवर्गांसाठी नियोजन करण्याचा सरकारचा विचारनितीन राऊत म्हणाले, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ३१ मार्चपर्यंत प्रशासनाने बंदी घातल्याने मजूरवर्गाची अडचण झाली आहे. हे आम्ही समजू शकतो. ३१ मार्चनंतर अशीच परिस्थिती कायम राहिली तर त्यांना कशी मदत करता येईल याचे नियोजन आम्ही करू. या विषयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते. मुख्यमंत्री संपूर्ण परिस्थितीवर स्वत: नियंत्रण ठेवून आहेत.टोल नाक्यांवर होणार तपासणीकोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी शहरात येणाऱ्या टोल नाक्यावर तसेच आंतरराज्य सीमेवर येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. आठवडी बाजार बंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या साथीचा दुसरा टप्पा सुरू असून याचा उद्रेक वाढू नये याची खबरदारी घेण्यात आल्याची ग्वाही राऊत यांनी यावेळी दिली.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNitin Rautनितीन राऊत