शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus in Nagpur : नागपुरात २६ दिवसानी हजाराखाली आली रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:34 IST

कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे.

ठळक मुद्दे९७१ रुग्ण व ४१ मृत्यूची नोंद : आकडेवारीतील घोळामुळे रुग्णसंख्या मंदावली का?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाबाधितांची सर्वाधिक नोंद याच महिन्यात झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले तर गेल्या २६ दिवसात पहिल्यांदाच रोजच्या रुग्णाची संख्या हजाराखाली आली. शुक्रवारी ९७१ रुग्ण आढळून आले. रुग्णसंख्या मंदावली असलीतरी मृत्यूची दहशत कायम आहे. आज ४१ रुग्णांचा जीव गेला. मृतांची एकूण संख्या २३०२ झाली असून रुग्णसंख्या ७२,८९९ वर पोहचली आहे. सप्टेंबर महिन्याची सुरुवातच १४४७ रुग्णांनी झाली. त्यानंतर सलग तीन आठवडे रोजच्या रुग्णांची संख्या १५०० ते २००० हजाराच्या घरात होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीपासून रुग्णसंख्येत घट दिसून येऊ लागली. यामागे, कमी होत असलेल्या चाचण्या, नमुन्यांचा अहवालास होत असलेला उशीर, की आकडेवारीतील घोळ, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे. रुग्णसंख्या अशीच हळूहळू कमी होणार का, असा प्रश्नही सामान्यांना पडला आहे.प्रयोगशाळेत १४४० रुग्ण पॉझिटिव्हजिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयामार्फ त जिल्हाधिकारी कार्यालयाकडून उपलब्ध माहितीच्या आधारे आज ९७१ रुग्ण पॉझिटिव्ह आल्याची नोंद आहे. परंतु याच पत्रकात, शासकीय व खासगी लॅबमधून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची संख्या ही १४४० वर दाखवली आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांवरील उपचारात हयगय होत असल्याची ओरड होत असताना, रुग्णसंख्येच्या आकडेवारीतही घोळ होऊ लागल्याने प्रशासनाची कोरोनाबाबतची गंभीरता कमी झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.क्षमतेच्या तुलनेत कमी चाचण्याएकट्या मेयो, मेडिकलमधील प्रयोगशाळेचा चाचण्यांची क्षमता ७०० वर असताना ४०० चाचण्याही होत नसल्याचे चित्र आहे. इतरही प्रयोगशाळेची हीच अवस्था आहे. मनपाच्या केंद्रावर नागरिक चाचणीसाठी सकाळपासून रांग लावून असतात. सर्वच ठिकाणी गर्दी होते. परंतु प्रत्येक केंद्राचे स्वत:चे नियम व दुपारी १ नंतर नमुने घेणे बंद करीत असल्याने कमी चाचण्या होत असल्याचे वास्तव आहे. आज आरटीपीसीआरच्या १७५४ व रॅपीड अ‍ॅन्टिजनच्या ३८४१ असे दोन्ही मिळून ५५९५ चाचण्या झाल्या. मागील आठवड्यात चाचण्यांची संख्या आठ हजारांवर गेली होती.१३१८ रुग्ण बरेपॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत बरे होणाºया रुग्णांची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांपासूनचे हे चित्र आरोग्य यंत्रणेसाठी दिलासादायक आहे. आज १३१८ रुग्ण बरे झाले. बरे झालेल्या एकूण रुग्णांची संख्या ५४,८०६ झाली आहे. याचे प्रमाण ७५.१८ टक्के आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये शहरातील ४४१०५ तर ग्रामीणमधील १०७०१ आहे.कोरोनाची आजची स्थितीदैनिक संशयित : ६९४७बाधित रुग्ण :७२,८९९बरे झालेले : ५४,८०६उपचार घेत असलेले रुग्ण : १५७९१मृत्यू :२३०२

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर