शहरं
Join us  
Trending Stories
1
एकजुटीचा प्रकाश... मनसेच्या 'दीपोत्सवा'त उद्धव ठाकरेंचं ५५ शब्दांचं भाषण, काय संदेश दिला?
2
Rivaba Jadeja Minister: रिवाबा जडेजा यांना कोणतं खातं मिळालं, गुजरातचे नवे गृहमंत्री कोण? खातेवाटप जाहीर
3
चीनमध्ये राजकीय धमाका! जिनपिंग यांचे 'उत्तराधिकारी' वेइडोंगना अचानक पदावरून हटवले, कारण...
4
खरं उद्धट कोण? बिग बींसमोर बसलेला १० वर्षांचा मुलगा, की... क्रिकेटरची विचार करायला भाग पाडणारी पोस्ट
5
'उद्धव ठाकरेंकडून बाण निघून गेलाय आणि उरले फक्त खान'; भाजपने राज ठाकरेंचा व्हिडीओच दाखवला
6
Politics: "क्षण आनंदाचा, सण नात्यांचा" ठाकरे कुटुंबाकडून दिवाळीच्या खास शुभेच्छा! फोटो व्हायरल
7
Naxal-free: 'आम्ही नक्षलवादी नाही' गडचिरोलीतील चारभट्टी गाव नक्षलमुक्त होताच गावकऱ्यांना अश्रू अनावर
8
दिसायला देवकन्या, पण काम न शोभणारं; अनेक तरुणांना प्रेमाची मिठी देणारी काजल पकडली
9
७५ बसस्थानकांवर मोफत 'वाचन कट्टा'; PM मोदींच्या 'पंचाहत्तरी'निमित्त एसटीचा अनोखा उपक्रम!
10
माझं तुझ्यावर प्रेम नाहीये..; तरूणीने दिला नकार; संतापलेल्या तरूणाने मग भररस्त्यातच...
11
महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका 
12
दिवाळीत ट्राय करा या फोटोशूट पोझ, दिसाल एकदम खास, प्रत्येक पोस्टवर होईल लाईक्सची बरसात
13
लाल दहशतीचा अंत! छत्तीसगडमध्ये 210 माओवाद्यांचे आत्मसमर्पण; बस्तर नक्षलमुक्त...
14
Gujarat Cabinet Reshuffle: काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जून मोढवाडिया गुजरात सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री
15
Ajit Agarkar: शमी टीम इंडियामधून का बाहेर? रोहित- कोहली वर्ल्डकप खेळतील का? आगरकर म्हणाले.
16
विदर्भ हादरला! पतीसोबत पूजाचं बिनसलं, एक्स बॉयफ्रेंड शुभमसोबत पुन्हा प्रेमसंबंध अन् झाला भयंकर शेवट
17
'तिच्या'आवाजाला भुलला अन् दोन कोटी गमावून बसला; नाशिकच्या उद्योजकासोबत फेसबुकवर काय घडले?
18
IND vs AUS : कॅप्टन्सीवरून हटवण्यात आल्यावर रोहित शर्मा पहिल्यांदाच कोच गंभीर यांना भेटला अन्.... (VIDEO)
19
१८ कोटी घरातील माणसांच्या खात्यात वळवली; प्रशांत हिरेंसह कुटुंबीयांवर गुन्हा
20
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्त जिल्ह्यांना १३५६ कोटींची मदत; राज्य सरकारचा शासन निर्णय

कोरोना चाचणी केंद्र वाढविले पण तपासणी करणारेच कमी झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:26 IST

आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात गेल्या पंधरवड्यात दरररोज १६०० ते १७०० कोरोना संक्रमित आढळत होते. आता ही संख्या ८०० ते ९०० पर्यंत खाली आली आहे. संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. चाचण्या कमी झाल्याने संक्रमण कमी झाले असेही म्हटले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी  दिली.

‘लोकमत’शी चर्चा करताना आयुक्तांनी कोविड संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मृत्यूदर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. अधिकाधिक लोकांनी चाचणी केली तर त्यांना वेळीच उपचार मिळतील. यातून मृत्यू नियंत्रणात आणण्याला मदत होईल. तसेच मृत्यूचे आकडे आधीच्या तुलनेत कमी झाले आहेत.घरातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी तपासणी केली पाहिजे. यातून संक्रमण रोखता येईल. अन्यथा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. ६० वर्षावरील नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.एखाद्या कोविड संक्रमित व्यक्तीला काही समस्या आल्यास त्यांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. झोन स्तरावर दखल घेतली जात नसेल तर यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी सांगितले.८२० बेड खालीमेयो व मेडिकल रुग्णालयात सध्या २४० बेड खाली आहेत. खासगी रुगणालयात ५८० बेड खाली आहेत. वास्तविक नागपूर शहरात १० हजार अ­ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु यातील गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. रुग्णांनी विशिष्ट रुग्णालयासाठी आग्रह करू नये. आॅक्सिजन पातळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक सेवेची गरज असते. याची गरज भासताच रुग्णालयात दाखल व्हा, अधिक बिल आकारत असतील तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवरनागपूर शहरात कोरोबाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवर गेला आहे. आधी तो १५ दिवस होता. दोन महिन्यांनतर अशी परिस्थिती झाली आहे. तसेच मृत्यूदर ३.८ टक्के वरून कमी होऊन ३.४ पर्यंत खाली आला आहे. तो ३ च्या खाली आणावयाचा आहे. रिकव्हरी रेट ७९ टक्के झाला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.....कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीमकॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या एका संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ लोकांना ट्रेस केले जात आहे. तो वाढवून १:२० पर्यंत आणावयाचा आहे. घरोघरी सर्व्हे सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. यंत्रणा कमी पडत आहे. अशी परिस्थिती अजिबात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस