शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

कोरोना चाचणी केंद्र वाढविले पण तपासणी करणारेच कमी झाले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 10:26 IST

आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर शहरात गेल्या पंधरवड्यात दरररोज १६०० ते १७०० कोरोना संक्रमित आढळत होते. आता ही संख्या ८०० ते ९०० पर्यंत खाली आली आहे. संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी झाला आहे. चाचण्या कमी झाल्याने संक्रमण कमी झाले असेही म्हटले जात आहे. मात्र वस्तुस्थिती तशी नाही. आधी ५५ कोविड चाचणी केंद्रांवर मोफत तपासणी होत होती. त्यात आता १० मोबाईल टेस्टिंग युनिटची भर पडली आहे. शहरातील चाचण्या कमी झालेल्या नाहीत. चाचणी केंद्रावर तपासणीसाठी येणाऱ्यांची संख्या कमी झाली. तसेच आजार वाढल्यावर चाचणीसाठी येत असल्याची माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी  दिली.

‘लोकमत’शी चर्चा करताना आयुक्तांनी कोविड संक्रमण रोखण्यासाठी मनपा प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मृत्यूदर नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. यासाठी नागरिकांच्या सहकार्याचीही गरज आहे. अधिकाधिक लोकांनी चाचणी केली तर त्यांना वेळीच उपचार मिळतील. यातून मृत्यू नियंत्रणात आणण्याला मदत होईल. तसेच मृत्यूचे आकडे आधीच्या तुलनेत कमी झाले आहेत.घरातील एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित कुटुंबातील सर्व सदस्यांनी, आजूबाजूच्या लोकांनी तपासणी केली पाहिजे. यातून संक्रमण रोखता येईल. अन्यथा प्रशासनाला कठोर निर्णय घ्यावे लागतील. ६० वर्षावरील नागरिकांनी विशेष खबरदारी बाळगण्याची गरज असल्याचे राधाकृष्णन बी. यांनी सांगितले.एखाद्या कोविड संक्रमित व्यक्तीला काही समस्या आल्यास त्यांनी थेट नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. झोन स्तरावर दखल घेतली जात नसेल तर यासंदर्भात अधिकाऱ्यांकडे तक्रार करू शकता. कोणत्याही परिस्थितीत मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष्य असल्याचे आयुक्तांनी सांगितले.८२० बेड खालीमेयो व मेडिकल रुग्णालयात सध्या २४० बेड खाली आहेत. खासगी रुगणालयात ५८० बेड खाली आहेत. वास्तविक नागपूर शहरात १० हजार अ­ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. परंतु यातील गंभीर रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासते. रुग्णांनी विशिष्ट रुग्णालयासाठी आग्रह करू नये. आॅक्सिजन पातळी कायम ठेवण्यासाठी आवश्यक सेवेची गरज असते. याची गरज भासताच रुग्णालयात दाखल व्हा, अधिक बिल आकारत असतील तर अशा रुग्णालयांवर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही आयुक्तांनी दिली.दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवरनागपूर शहरात कोरोबाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा कालावधी ३८ दिवसांवर गेला आहे. आधी तो १५ दिवस होता. दोन महिन्यांनतर अशी परिस्थिती झाली आहे. तसेच मृत्यूदर ३.८ टक्के वरून कमी होऊन ३.४ पर्यंत खाली आला आहे. तो ३ च्या खाली आणावयाचा आहे. रिकव्हरी रेट ७९ टक्के झाला असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.....कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीमकॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी १० टीम तैनात करण्यात आल्या आहेत. सध्या एका संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १३ लोकांना ट्रेस केले जात आहे. तो वाढवून १:२० पर्यंत आणावयाचा आहे. घरोघरी सर्व्हे सुरू आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होत नाही. यंत्रणा कमी पडत आहे. अशी परिस्थिती अजिबात नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस