शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

नागपुरात कोरोनाचा वेग मंदावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,२२४ ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याने महामारीचा वेग मंदावल्याचे दिसून येत आहे. मागील २४ तासात २,२२४ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. एप्रिल महिन्यानंतरचा हा सर्वात कमी आकडा आहे. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,५८,६०४ झाली आहे. गुरुवारी ७७ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूंची संख्या ८,४०२ झाली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी १३ सप्टेंबर रोजी रुग्णसंख्येने उच्चांक गाठत २,३४३चा आकडा ओलांडला असताना हाहाकार उडाला होता. परंतु, यावर्षी २४ एप्रिल रोजी ७,९९९वर गेलेली रुग्णसंख्या आज दोन हजारांवर आल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.

नागपूर जिल्ह्यात सलग १४ दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. मात्र, त्यासोबतच चाचण्यांच्या संख्येतही मोठी घट होऊ लागली आहे. हे धोक्याचे संकेत तर नाहीत ना, अशी शंकाही उपस्थित केली जात आहे. १३ एप्रिल रोजी आतापर्यंतच्या सर्वाधिक २९,१२२ चाचण्या झाल्या होत्या. त्यानंतर २४ ते २५ हजार दरम्यान चाचण्या होत होत्या. परंतु, २ मेपासून ही संख्या १५ ते २० हजारांच्या घरात आली आहेत. गुरुवारी १५,७१४ चाचण्या झाल्या. यात १२,६५५ आरटीपीसीआर तर ३,०५९ रॅपिड अँटिजन चाचण्या होत्या. गुरुवारी ५,८८४ रुग्ण बरे झाले. कोरोनामुक्त होण्याचा दर वाढला असून, तो ८८ टक्क्यांवर गेला आहे. आतापर्यंत ४,१०,५८६ रुग्ण बरे झाले आहेत.

मृत्यूंची संख्या कधी कमी होणार?

रुग्णसंख्येत मोठी घट दिसून येत असताना मृत्यूंचे प्रमाण अद्यापही चिंता व्यक्त करणारे आहे. कोरोनाच्या या १४ महिन्यांच्या काळात सर्वाधिक मृत्यूंची नोंद २२ एप्रिल २०२१ रोजी झाली. यादिवशी ११० रुग्णांचा मृत्यू झाला. त्यानंतर दैनंदिन ८० ते ९० रुग्णांचे मृत्यू होत होते. मागील सात दिवसात ही संख्या ७० ते ८०वर आली असली तरी मृत्यूचे प्रमाण कधी कमी होणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक

शहरात आज १,१६३ रुग्ण व ४१ मृत्यूंची नोंद झाली तर ग्रामीण भागात १,०५० रुग्ण व २५ मृत्यूंची नोंद झाली. शहर आणि ग्रामीणमध्ये केवळ ११३ रुग्णांचा फरक असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,२३,१२५ व मृतांची संख्या ५,०६० झाली आहे. ग्रामीणमध्ये १,३४,०८४ रुग्ण व २,१२९ मृत्यूंची नोंद झाली आहे.

कोरोनाची गुरुवारची स्थिती

दैनिक चाचण्या : १५,७१४

एकूण बाधित रुग्ण : ४,५८,६०४

सक्रिय रुग्ण : ३९,६१६

बरे झालेले रुग्ण : ४,१०,५८६

एकूण मृत्यू : ८,४०२