शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 09:57 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देहळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.याचे कारण असे की सीतारामन यांनी आज ज्या ११ उपाययोजना घोषित केल्या, त्या भारतातील शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून मागणी करीत होते. सरकारने कृषी उत्पादनाचा वाढीव दर ४ टक्क्यांवर नेण्याच्या घोषणा अनेकदा केल्या पण या छोट्या मागण्यांकडे मात्र कधीच लक्ष दिले नाही. आज त्यातील काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचे श्रेय कोरोनालाच द्यायला हवे. आज ज्या आठ घोषणा झाल्या त्यात १ लाख कोटी कोल्ड चेन, कृषी उत्पादनाची साठवणूक, कृषी माल प्रसंस्करण यासाठी आहेत. याशिवाय हळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांसाठी बोटी घेण्यासाठी २० हजार कोटी, गायी, म्हशी, शेळ्या यांना लस देण्यासाठी १३,५०० कोटी, डेअरी उद्योगासाठी १५ हजार कोटी, औषधी वनस्पतीच्या संगोपनासाठी ४००० कोटी एवढेच नव्हे तर मधमाशा पालनासाठी ५०० कोटी व कांदे-बटाट्यांना योग्य भाव मिळण्यासाठी वाहतूक व साठवणुकीत अनुदानासाठी ५०० कोटी असे प्रावधान आहेत. विशेष म्हणजे या सर्व सोयी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागितल्या आहेत, हे सर्वांनाच विदित आहे. याचबरोबर कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्यासाठी जिल्हाबंदी व निर्यातबंदी साठवणूक मर्यादा हटवा, या मागण्याही आता सरकारने मान्य केल्या आहेत व त्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियमात (इसेन्शियल कमोडिटीज अ‍ॅक्ट) सुधारणा होणार आहे व एक नवीन कायदाही येणार आहे. सर्वात महत्त्वााचे म्हणजे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांपूर्वी कुठले कृषी उत्पादन किती क्षेत्रात पेरणी होणार आहे, किती उत्पादन अपेक्षित आहे, पर्जन्यमान कसे राहील व कृषी मालाचे भाव काय राहतील या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. त्यांना कुठले पीक घ्यावे हे सोपे जाणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या खूप जुन्या मागण्या अशाप्रकारे मान्य झाल्या आहेत, ही समाधानाची बाब मानायला हवी.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी