शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
2
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
3
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
4
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
5
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
6
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
7
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
8
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
9
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
10
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
11
धक्कादायक! पत्नीने प्रियकरासाठी लग्नाच्या सातव्या दिवशी पतीची हत्या केली
12
उद्धव ठाकरेंचा भाजपाला मोठा धक्का; ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बडा नेत्याच्या हाती शिवबंधन
13
IND A vs BAN A : 'सुपर ओव्हर'मध्ये भारताचा फ्लॉप शो! एकही चेंडू न खेळता बांगलादेशनं गाठली फायनल
14
“मालेगाव प्रकरणी आरोपीला फाशी द्या, राज्यात महिला मुलींची सुरक्षा रामभरोसे”: हर्षवर्धन सपकाळ
15
बिहारमध्ये भाजपाचा डाव! नितीश कुमारांना मुख्यमंत्रीपद दिलं पण, गृहमंत्रीपद स्वतः कडे ठेवले, २० वर्षांनंतर खाते सोडले
16
कर्नाटकच्या राजकारणात खळबळ! "सर्व १४० आमदार माझ्यासोबत", डी. के. शिवकुमार यांचे थेट विधान
17
तुम्हाला तुमची गाडी खूपच प्यारी आहे...! २० वर्षांहून जुन्या वाहनांच्या फिटनेस टेस्ट शुल्कात १५ पट वाढ
18
स्लीपर वंदे भारत देशभर फिरवली, ट्रायलनंतर परत पाठवली; ५ फॉल्ट समोर आले, लोकार्पण लांबणार?
19
फेस्टीव्ह संपला नाही तोच...! फ्लिपकार्ट 'ब्लॅक फ्रायडे सेल २०२५' ची तारीख ठरली, अमेझॉन थांबतेय होय...
20
'G-20 मध्ये सामील होणार नाही', डोनाल्ड ट्रम्प दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्राध्यक्षांवर नाराज, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 09:57 IST

अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देहळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड

सोपान पांढरीपांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अर्थमंत्री निर्मला सीतारामान यांनी जे तिसरे कोविड सवलत पॅकेज जाहीर केले आहे ते पाहून शेवटी कोरोनाच धावून आला शेतकऱ्यांच्या मदतीला, असे म्हणण्याची वेळ आली आहे.याचे कारण असे की सीतारामन यांनी आज ज्या ११ उपाययोजना घोषित केल्या, त्या भारतातील शेतकरी गेल्या अनेक दशकांपासून मागणी करीत होते. सरकारने कृषी उत्पादनाचा वाढीव दर ४ टक्क्यांवर नेण्याच्या घोषणा अनेकदा केल्या पण या छोट्या मागण्यांकडे मात्र कधीच लक्ष दिले नाही. आज त्यातील काही मागण्या पूर्ण झाल्या आहेत आणि त्याचे श्रेय कोरोनालाच द्यायला हवे. आज ज्या आठ घोषणा झाल्या त्यात १ लाख कोटी कोल्ड चेन, कृषी उत्पादनाची साठवणूक, कृषी माल प्रसंस्करण यासाठी आहेत. याशिवाय हळद, मखाना, तीळ, करडी अशा पिकांवर संस्करण करण्यासाठी १० हजार कोटींचा फंड, मत्स्यव्यवसाय करणाऱ्या कोळी बांधवांसाठी बोटी घेण्यासाठी २० हजार कोटी, गायी, म्हशी, शेळ्या यांना लस देण्यासाठी १३,५०० कोटी, डेअरी उद्योगासाठी १५ हजार कोटी, औषधी वनस्पतीच्या संगोपनासाठी ४००० कोटी एवढेच नव्हे तर मधमाशा पालनासाठी ५०० कोटी व कांदे-बटाट्यांना योग्य भाव मिळण्यासाठी वाहतूक व साठवणुकीत अनुदानासाठी ५०० कोटी असे प्रावधान आहेत. विशेष म्हणजे या सर्व सोयी शेतकऱ्यांनी अनेक वेळा मागितल्या आहेत, हे सर्वांनाच विदित आहे. याचबरोबर कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळण्यासाठी जिल्हाबंदी व निर्यातबंदी साठवणूक मर्यादा हटवा, या मागण्याही आता सरकारने मान्य केल्या आहेत व त्यासाठी आवश्यक वस्तू अधिनियमात (इसेन्शियल कमोडिटीज अ‍ॅक्ट) सुधारणा होणार आहे व एक नवीन कायदाही येणार आहे. सर्वात महत्त्वााचे म्हणजे खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांपूर्वी कुठले कृषी उत्पादन किती क्षेत्रात पेरणी होणार आहे, किती उत्पादन अपेक्षित आहे, पर्जन्यमान कसे राहील व कृषी मालाचे भाव काय राहतील या विषयी शेतकऱ्यांना माहिती दिली जाईल. त्यांना कुठले पीक घ्यावे हे सोपे जाणार आहे. कोरोना लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांच्या खूप जुन्या मागण्या अशाप्रकारे मान्य झाल्या आहेत, ही समाधानाची बाब मानायला हवी.

 

 

टॅग्स :Farmerशेतकरी