शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

कोरोनामुळे पगारदारवर्ग संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 11:05 IST

Nagpur News देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत.

 लोकमत न्यूज नेटवर्क 

उदय अंधारे

नागपूर : देशातील पगारदारवर्गाला नेहमीच विविध आव्हानांना तोंड द्यावे लागते. कोरोनामुळे त्यांची परिस्थिती आता अधिकच गंभीर झाली आहे. ते आर्थिक संकटात जगत आहेत.

पगारदारवर्गाचे वेतन महागाईच्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे त्यांना बचत करता येत नाही. यातच त्यांना प्राप्तिकर व व्यावसायिक करही जमा करावा लागतो. विरोधाभास म्हणजे, शेतकरी कितीही श्रीमंत असला तरी त्यांना कर द्यावा लागत नाही. शहरातील एका प्रसिद्ध चार्टर्ड अकाऊंटंटने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार, कोरोना काळामध्ये पगारदारवर्गातील चार कोटी व्यक्तींनी कर जमा केला. सरकारने त्या रकमेतून स्थलांतरित मजुरांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या. असे असताना वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पगारदारवर्गासाठी वजावटीची घोषणा केली नाही.

सार्वजनिक क्षेत्रापेक्षा खासगी क्षेत्रातील पगारदारवर्गाची संख्या मोठी आहे. ते कर भरतात, पण त्यांना निवृत्ती वेतन, बेरोजगारी साहाय्य किंवा सेवानिवृत्तीनंतर आरोग्य सेवा मिळत नाही. परंतु, त्यांना आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही कर भरणे बंधनकारक केले जाते. देशातील बॉलिवूड उद्याेग व राजकारणातील अनेक जण स्वत:ला शेतकरी घोषित करून अत्यल्प कर जमा करतात. त्यामुळे शेतीमधून वर्षाला १० लाख रुपयावर उत्पन्न मिळविणाऱ्याला कराच्या चौकटीत आणले गेले पाहिजे, असे मत सूत्रांनी व्यक्त केले.

देशातील मतदारांमध्ये पगारदारवर्गाची संख्या केवळ ७ टक्के आहे. राजकीय पक्ष त्यांचा गांभीर्याने विचार करीत नाही. त्यामुळे ही विसंगती निर्माण झाली आहे. सरकारच्या विरोधाभासी धोरणामुळे गेल्या काही वर्षांत प्रत्यक्षात कर जमा करणाऱ्यांच्या तुलनेत केवळ प्राप्तिकर अर्ज भरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढली आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, २०२०-२१ मध्ये ३ कोटी ७५ लाख नागरिकांनी प्राप्तिकर अर्ज भरले, पण प्रत्यक्ष कर जमा करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. कोरोना काळात मागणी वाढली असली तरी बाजारामध्ये वस्तू व सेवेचा पुरवठा अद्याप सुरळीत झाला नाही. कारण, या काळात अनेकांची नोकरी गेली, असे सूत्रांनी सांगितले.

५० टक्के काम कमी केले

मॉल, सुपर बाजार, थिएटर, जीम इत्यादी छोट्या प्रतिष्ठानांमध्ये काम करणाऱ्यांना नोकरी गमवावी लागली तर, कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचे वेतन २० ते ५० टक्के कमी झाले. काही ठिकाणी वेतनच थांबविण्यात आले. अनेक प्रतिष्ठानांनी त्यांचे काम ५० टक्क्यांनी कमी केले.

श्रीनिवास खांदेवाले, अर्थतज्ज्ञ

 

कर्मचाऱ्यांनी नोकरी गमावली

असंघटित क्षेत्रातील पगारदारवर्ग खूप प्रभावित झाला. अनेकांना नोकरी गमवावी लागली. अनेकांचे वेतन बंद झाले. सेवा क्षेत्रातही समान परिस्थिती आहे.

---- प्रा. विनायक देशपांडे, एमबीए विभाग, रातुम नागपूर विद्यापीठ.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस