शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

कोरोनामुळे राज्यात ९३ रेशन दुकानदारांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या महामारीत पूर्ण वर्ष गेले. यावेळी अत्यावश्यक सेवा म्हणून रेशन दुकानदारांनी मोठी जबाबदारी पार पाडली. रेशन दुकानदारांमुळेच शासनाचे मोफत धान्य गरिबांपर्यंत पोहोचू शकले. शासनानेही ही बाब मान्य केली. ही सेवा देत असतानाच राज्यभरात तब्बल ९३ रेशन दुकानदारांचा कोरोना आजाराने मृत्यू झाला. केवळ ९३ दुकानदार नव्हे; तर ९३ कुटुंब रस्त्यावर आली. त्यामुळे या मृत रेशन दुकानदारांच्या परिवारालाही पोलीस व डॉक्टर यांच्या धर्तीवर ५० लाखांचा सुरक्षा विमा लागू करावा, अशी मागणी विदर्भ रास्त भाव दुकानदार, केरोसीन विक्रेता संघटनेने केली आहे.

संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी यासंदर्भात शासनाकडे पत्रव्यवहारही केला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, कोणतीही व्यक्ती धान्यापासून वंचित राहू नये म्हणून केंद्र शासनाने रेशन दुकानदारांद्वारे वितरणाची व्यवस्था सुरू ठेवली. महामारीच्या काळात आपल्या जिवाची पर्वा न करता रेशन दुकानदारांनी धान्याचे वितरण केले. यामुळे अनेक दुकानदार कोरोना पॉझिटिव्ह झाले. राज्यातील जवळपास ९३ रेशन दुकानदारांचा कोरोनाने मृत्यू झाला. यात सर्वाधिक पुणे विभागातील ३२, मुंबईतील २६, रायगडमध्ये ८, नागपुरात ६ आणि अमरावतीतील ८ दुकानदारांचा समावेश आहे. कोरोना काळात पोलीस आणि डॉक्टर यांना काेरोना योध्दे म्हणून मृत्यूनंतर ५० लाखांचे विमा सुरक्षा कवच देण्यात आले आहे. मग हे विम्याचे कवच रेशनदुकानदारांना लागू का नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.