शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

कोरोना वाढला, सॅनिटायझरचा वापर घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 10:57 IST

Nagpur News सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते.

ठळक मुद्दे५० टक्केवर आली विक्रीसॅनिटायझर लोकांनी जवळ बाळगणे केले बंद

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फेब्रुवारी महिन्यापासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले. जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा २ हजारांवर गेला. सरकार कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करण्याच्या सूचना वारंवार करीत आले आहे. पोलीस कारवाईच्या भीतीपोटी लोकांनी मास्क घालणे सुरू केले. पण, सॅनिटायझरचा वापर लोकांनी टाळल्याचेच दिसून येते. शहरातील मेडिकल दुकानदारांकडून सॅनिटायझरच्या विक्रीचा आढावा घेतला असता, ५० ते ६० टक्केच विक्री होत असल्याचे सांगण्यात आले.

मार्च महिन्यात कोरोनाचा रुग्ण शहरात आढळला. त्यानंतर लागलेल्या लॉकडाऊनमध्ये शहरात कोरोनाच्या बाबतीत प्रचंड भीती निर्माण झाली होती. सुरुवातीच्या काळात लोकांनी नियमांचे पालन नियमित केले. सॅनिटायझरचा वापर घरोघरी व्हायला लागला होता. लोक बाहेर पडतानाही खिशात सॅनिटायझरची बाटली घेऊन पडायचे. बाहेरून कुणी आल्यावर त्याचे हात सॅनिटाईज केल्याशिवाय आत घेत नव्हते. तेव्हा सॅनिटायझरच्या किमतीही दुप्पट - तिप्पट होत्या. मेडिकल स्टोअर्स चालकांनी सॅनिटायझरच्या विक्रीतून त्या वेळी चांगलीच कमाई केली. पण, लॉकडाऊन हळूहळू मागे घेण्यात आला. कोरोनाचे रुग्णही कमी होत गेले. दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, खाजगी - सरकारी कार्यालये सुरू झाली. प्रवासी सेवा सुरळीत झाल्या आणि लोकही मोठ्या संख्येने बाहेर पडायला लागले. त्यामुळे हळूहळू कोरोनाच्या नियमांकडे दुर्लक्ष होत गेले. आतातर लोक सॅनिटायझरचा वापर अतिशय कमी करीत आहेत. खाजगी - सरकारी कार्यालये, व्यापारी प्रतिष्ठाने अथवा दुकानांतच सॅनिटायझर वापरासाठी ठेवण्यात आले आहे.

- लोकांमधील भीती कमी झाली

सुरुवातीला लोकांनी सॅनिटायझर महाग असतानाही त्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला. फार्मसीमध्ये येणारा प्रत्येक जण किमान छोटी बॉटल तरी घेऊन जात होता. आता छोट्या बॉटलचा सेल फार कमी झाला. १ ते ५ लीटरच्या सॅनिटायझरच्या कॅन काही लोक घेऊन जातात तसेच व्यापारी प्रतिष्ठाने अथवा कार्यालयांमध्येच आता सॅनिटायझरची विक्री होत आहे. लोकांमध्ये भीती कमी झाल्याचे फार्मासिस्टचे म्हणणे आहे.

- काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच

लॉकडाऊनच्या काळात आम्ही नियमांचे पालन केले. घराबाहेर पडताना सॅनिटायझरची बॉटल, मास्क वापरले. कार्यालयातही काम करताना एखाद्या वस्तूला हात लागल्यानंतर लगेत हात सॅनिटाईज करून घ्यायचो. इतकी काळजी घेतल्यानंतरही कोरोना झालाच. आता मास्क वापरतो. पण, सॅनिटायझरचा अति वापर करीत नाही.

- राजेश राऊत, नागरिक

- लुझमध्ये आता वापर कमी झाला आहे. ५ लीटरच्या कॅन लोक नेतात. लोकांनी काळजी घेणे टाळल्यामुळे विक्रीत घट झाली आहे. पूर्वी सॅनिटायझरच्या किमती वाढल्या असतानाही लोकांची मागणी जास्त होती. फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी, विक्री फार वाढलेली नाही. विशेष म्हणजे आता अनेक कंपन्यांचे सॅनिटायझर मार्केटमध्ये आहे. किमतीही कमी आहेत. मात्र, त्या प्रमाणात मागणी नाही.

- राजेंद्र कावडकर, अध्यक्ष, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस