शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
4
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
5
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
6
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
7
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
8
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
9
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
10
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
11
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
12
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
13
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
14
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
15
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
16
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
17
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
18
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
19
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
20
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...

कोरोनामुळे विटा निर्मितीचा व्यवसाय ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 10:40 IST

Nagpur News कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झाल्याने विटा निर्मितीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने भर टाकली असून कच्चा माल खराब झाला आहे.

ठळक मुद्दे पावसामुळे कच्चा माल खराबविटांचे दर वाढले, सरकारने सवलती द्याव्यात

आनंद शर्मा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवसाय ठप्प झाले असून व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. कोरोनाचा संसर्ग ग्रामीण भागात झाल्याने विटा निर्मितीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसाने भर टाकली असून कच्चा माल खराब झाला आहे. त्यामुळे निर्मिती उद्योगांवर परिणाम झाला असून विटांचे दर वाढले आहेत.

नागपूर जिल्ह्यात जवळपास १५० पेक्षा जास्त ठिकाणी विटांची निर्मिती (वीटभट्टे) करण्यात येते. यामध्ये सर्वाधिक निर्मिती रामटेक, पारशिवनी, मौदा आणि सावनेर क्षेत्रात होते. विटा निर्मितीचा सिझन जानेवारी ते मेपर्यंत असतो. यादरम्यान उत्पादनासाठी मालकांना सरकारी खजान्यात पूर्वीच लाखो रुपयांची रॉयल्टी जमा करावी लागते. यावर्षीही सर्वांनी रॉयल्टी भरली. पण मार्चपासून ग्रामीण क्षेत्रात कोरोनाचे संक्रमण वाढल्याने मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात विटांचे उत्पादन जवळपास ठप्पच राहिले. याशिवाय काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसामुळे निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल खराब झाला आणि कोळशाचे दर वाढल्याने उत्पादनावर परिणाम झाला. शिवाय डिझेलचे दर वाढल्याने विटांच्या वाहतुकीचाही खर्च वाढला. त्यामुळे दर वाढले आहेत. पूर्वी एक हजार विटांचे ६ हजार रुपयांचे दर होते. आता दर ६५०० ते ७ हजार रुपयांवर पोहोचला आहे.

सरकारकडे मदतीची मागणी

नाग विदर्भ ब्रिक्स मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष गोपाल मेहाडिया आणि सचिव संजय पालीवाल म्हणाले, कोरोना आणि पावसामुळे विटांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. लाखो रुपयांची रॉयल्टी दिल्यानंतरही उत्पादन ठप्प झाले आहे. अशा स्थितीत विटांच्या उत्पादनासाठी दिलेली तारीख वर्षभर वाढविणे, कोळशाचा सवलतीच्या दरात पुरवठा करणे आणि विटांच्या उत्पादनांसाठी लागणाऱ्या वीजदरात सवलत देण्यावर सरकारने गांभीर्याने विचार करावा.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसbusinessव्यवसाय