शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

अज्ञान व सुविधांअभावी ग्रामीण भागात कोरोनाचा स्फोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : मागील वर्षी ग्रामीण भागामध्ये शिरकावही न झालेला कोरोना या वेळी दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने पसरत ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मागील वर्षी ग्रामीण भागामध्ये शिरकावही न झालेला कोरोना या वेळी दुसऱ्या लाटेमध्ये वेगाने पसरत आहे. शहरासोबतच गावांमध्येही कोरोना संक्रमितांचा आकडा वाढत आहे. यामुळे गावखेड्यांमध्ये दहशतीचे आणि भीतीचे वातावरण आहे. शहरी भागांसारख्या सुविधा आणि जनजागृती ग्रामीण भागात नाहीत. यामुळेच ग्रामीण भागांमध्ये कोरोनाचा स्फोट झाल्यासारखी स्थिती असल्याचे मत व्यक्त होत आहे.

...

गृहविलगीकरणातून धोका

खेड्यांमध्ये गृहविलगिकरण होत असले तरी त्यातूनच अधिक धोका आहे. शौचालय एकच असल्याने त्याचा एकत्रित होणारा वापर, रुग्णाला दिले जाणारे अन्न व भांड्यांचा कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारा वापर, मास्कचा मर्यादित वापर, मास्क वापरण्याऐवजी केवळ रूमालाचा वापर, मास्क वापरामध्ये न घेतली जाणारी खबरदारी या बाबी गृहविलगीकरणामध्ये अधिक धोकादायक ठरत आहेत.

...

तपासणीमध्ये टाळाटाळ

कोरोनाची लक्षणे आढळल्यावर तपासणीमध्ये होणारी टाळटाळ हे यातील मुख्य कारण आहे. साधारण ताप समजून दुर्लक्ष केले जाते. अनेक रुग्ण अंगावर ताप काढतात. संबंधित रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असूनही लक्षात न आल्याने कुटुंबात तसेच शेजारात संसर्ग पसरतो. तपासणीनंतर विलंबाने येणारे रिपोर्ट, उपचारामध्ये येणारे अडथळे, या काळात ग्रामीण भागातील लोकांना तालुका स्तरावर उपचारासाठी पोहचण्यातील अडथळे, तालुका स्तरावर असणाऱ्या अपुऱ्या सुविधा हे सुद्धा वेगाने संसर्ग वाढण्याचे कारण आहे.

...

अपुऱ्या सुविधा

ग्रामीण भागामध्ये सुविधांचा प्रचंड अभाव आहे. सॅनिटायजरचा वापर फार कमी होतो. अनेकजण सॅनिटायजर वापरतच नाहीत. ग्रामपंचायतींकडून जंतूनाशकाची फवारणही होत नाही. बाहेरून आल्यावर स्वच्छ होण्याकडेही फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. बाहेरून वस्तू खरेदी करून आणल्यावर सॅनिटाईज न करता होणारा वापरही तेवढाच धोकादायक आहे.

...

असे आहे प्रमाण

दिनांक : जिल्ह्यात तपासण्या : ग्रामीणमधील पॉझिटिव्ह : एकूण रुग्ण

१७ एप्रिल : २९,०५३ : २४ टक्के : ६,१९४

१८ एप्रिल : २६,७९२ : २६.५ टक्के : ६,९५९

१९ एप्रिल : १७,९७८ : ३५.४ टक्के : ७,१०७

२० एप्रिल : २६,०२८ : २६.४ टक्के : ६,३४०

२१ एप्रिल : २४,१६३ : -- : ७,२६६

...