शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
3
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट
4
पाकिस्तानातील सोने-चांदीचे दर वाचून विश्वास नाही बसणार! काय आहे एका तोळ्याची किंमत?
5
भर कोर्टात बूट फेकण्याचा प्रयत्न, CJI भूषण गवई यांच्या आईची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
6
Palmistry: तळ हाताच्या शुक्र पर्वतावर 'या' चिन्हाचे असणे म्हणजे राजयोगच; तुम्हीपण तपासून बघा!
7
सुपर बॉय! २ वर्षांच्या आदित्यने कॉम्पुटरला टाकलं मागे, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद
8
IAS Misha Singh : लय भारी! वडील शेतकरी, लेक IAS अधिकारी; LLB नंतर UPSC ची तयारी, केली दमदार कामगिरी
9
मराठा समाज अन् राज्य सरकारला मोठा दिलासा; 'त्या' GR ला अंतरिम स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार
10
काही महिने थांबा, पेट्रोल कारच्या किंमतीत EV कार मिळतील; नितीन गडकरींचा मोठा दावा...
11
Thane Crime: ठाण्यात व्हॉट्सअपद्वारे 'सेक्स रॅकेट'; थेट हॉटेलमध्ये पोहोचले पोलीस, दलाल महिलेस अटक
12
"मला सोडून देण्यामागे काहीतरी रहस्य..."; सरन्यायाधीशांवर हल्ला करणाऱ्या वकिलाचे सूचक विधान
13
घनदाट जंगलात शूट झालाय 'कांतारा: चाप्टर १', कुठे आहेत हे नयनरम्य लोकेशन्स?
14
VIDEO: मोदींना विचारलं "आंबा कसा खाता?" झाला ट्रोल, आता अक्षयचा फडणवीसांना प्रश्न, "तुम्ही संत्री कशी खाता?"
15
IND vs AUS : फिटनेसच ठिकये पण फॉर्मच काय? रोहित-विराटच्या सिलेक्शनवर प्रश्नचिन्ह
16
२ तप सत्तेत, २४ वर्षांत काय-काय झाले? नरेंद्र मोदींनी सांगितली CM ते PM प्रवासाची Inside Story...
17
कफ सिरप मृत्यू प्रकरण : मृत मुलाच्या कबरीतून डॉक्टरचे 'ते' प्रिस्क्रिप्शन काढले बाहेर; आणखी एका बालकाची प्रकृती चिंताजनक
18
शिंदेंच्या हातून 'धनुष्यबाण' निसटणार?; अंतिम निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार, असीम सरोदेंचा दावा
19
छोटे व्हिडीओ पाहण्याची सवय जीवघेणी; मेंदूचं मोठं नुकसान, दारुच्या व्यसनापेक्षाही ५ पट धोका
20
"रात्री ३ वाजता उठवलं तरी मी उर्दू बोलतो...", सचिन पिळगावकरांचं नवं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?

कोरोना महामारीमुळे घटले जन्माचे प्रमाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:08 IST

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप कायम आहे. पहिली लाट संपत नाही तोच या वर्षी फेब्रुवारीपासून ...

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप कायम आहे. पहिली लाट संपत नाही तोच या वर्षी फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडाही वाढला. निव्वळ कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा या वर्षी ५००० च्या वर गेला. विशेष म्हणजे हा आकडा केवळ साडेचार महिन्यांचा म्हणजे २० मे २०२१ पर्यंतचा आहे. २०२० च्या मार्चपासून ते डिसेंबरपर्यंतच्या आकड्यांपेक्षाही तो अधिक आहे. २०१९ मध्ये सर्वसाधारण १८ हजारांच्या जवळपास मृत्यूंची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये हा आकडा २२ हजारांवर पोहोचला. यामध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे. मात्र या वर्षी चारच महिन्यांत सर्वसाधारण व कोरोना मिळून मृत्यूंचा आकडा १२ हजारांच्या वर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत जन्माचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये ५३,९०७ मुलांचा जन्म झाला होता. २०२० मध्ये त्यात ९,०७१ ची घट झाल्याचे दिसून येते. या वर्षी ४४,९७८ बालकांचा जन्म झाला. यामध्ये २३,२२८ मुले व २१,७५० मुलींचा समावेश आहे. २०१९ च्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९५१ वरून ९३६ वर घसरल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये जन्म प्रमाणात आणखी म्हणजे ३५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल २०२० मध्ये ३,२०७ जन्माच्या तुलनेत २०२१ च्या एप्रिल महिन्यात २,१५१ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते जन्मदर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत व ती कोरोनाशी संबंधित आहेत. एकतर गेल्या दीड वर्षात लग्नांचे प्रमाण कमालीचे घटले. ५० टक्केंच्या वर लग्न रद्द करण्यात आली किंवा पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनीही संसर्गाच्या भीतीपायी पाळणा लांबविला. रुग्णालयातील भीषण परिस्थितीत गैरसोयीचा विचार करता प्रेग्नेंसी टाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

लग्नाची संख्याही घटली

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून लग्नांची संख्याही घटली आहे. मार्च २०२० आलेल्या काेराेनाच्या पहिल्या लाटेनंतर जूनपर्यंत सर्व कारभार ठप्प राहिले. त्यानंतर काहीसी शिथिलता आली व रखडलेल्यांनी लग्न उरकून घेतले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा लग्न समारंभ खाेळंबले. सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात जवळपास ५००० लग्न झाल्याची नाेंद आहे. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच म्हणावा लागेल.

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ ५३९०७ १८४३१

२०२० ४४९७८ २२७४३

२०२१ ०० ००