शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
2
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
3
सोनम रघुवंशीनं किती रुपयांत केली होती पती राजाच्या जीवाची 'डील'? कुणाला किती रुपये दिले अ‍ॅडव्हॉन्स? जाणून थक्क व्हाल!
4
११ रुपयांचा शेअर पोहोचला ५७१ रुपयांवर, 'या' कंपनीने गुंतवणूकदारांना दिला '५०००%' परतावा!
5
Corona Virus : बापरे! कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने पुन्हा भरवली धडकी, XFG रोगप्रतिकारक शक्तीला देतोय चकवा
6
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
7
२४ तास उलटूनही आग शमेना, अजूनही येतायत स्फोटांचे आवाज! केरळच्या समुद्रात सुरू आहे मोठं रेस्क्यू ऑपरेशन
8
Raj Kushwaha : "माझा मुलगा २० वर्षांचा, पोलीस खोटं बोलताहेत"; सोनमचा बॉयफ्रेंड राज कुशवाहच्या आईचा दावा
9
आर्थिक अडचणींना वैतागून एमबीबीएस विद्यार्थ्याची आत्महत्या; जेजे रुग्णालयाच्या वसतिगृहातील घटना!
10
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
11
Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!
12
फक्त या कारणामुळे आशुतोष राणाने रेणुका शहाणेसोबत केलं लग्न, २४ वर्षांनंतर अभिनेत्रीचा खुलासा
13
"मला लग्नच करायचं नव्हतं...", उषा नाडकर्णींनी पहिल्यांदाच लग्नावर केलेलं भाष्य
14
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
15
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
16
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
17
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
18
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
19
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
20
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?

कोरोना महामारीमुळे घटले जन्माचे प्रमाण : भीतीपायी लांबवला पाळणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 21:41 IST

Corona epidemic reduces birth rates कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजाराने सर्वच क्षेत्रांवर परिणाम केला आहे. नैसर्गिक जन्म-मृत्यूच्या प्रक्रियेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महामारीने एकीकडे माणसांच्या मृत्यूचे आकडे फुगविले आहेत; पण त्याच वेळी जन्मदरामध्ये मात्र कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमृत्यूचा आकडा मात्र फुगला

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना महामारीने सर्वत्र थैमान घातले आहे. या जीवघेण्या आजाराने सर्वच क्षेत्रांवर परिणाम केला आहे. नैसर्गिक जन्म-मृत्यूच्या प्रक्रियेवरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महामारीने एकीकडे माणसांच्या मृत्यूचे आकडे फुगविले आहेत; पण त्याच वेळी जन्मदरामध्ये मात्र कमालीची घट झाल्याचे दिसून येत आहे. नागपूर शहराच्या आकडेवारीवरूनही हा प्रभाव दिसत आहे. २०१९ च्या तुलनेत २०२० मध्ये ९००० च्या वर बाळांचे जन्म कमी झाले तर २०२१ मध्ये हा आकडा आणखी खाली आल्याचे दिसून येत आहे.

मार्च २०२० पासून सुरू झालेला कोरोना महामारीचा प्रकोप अद्याप कायम आहे. पहिली लाट संपत नाही तोच या वर्षी फेब्रुवारीपासून दुसऱ्या लाटेने पुन्हा डोके वर काढले. गेल्या वर्षीच्या तुलनेत मृत्यूचा आकडाही वाढला. निव्वळ कोरोनामुळे झालेल्या मृत्यूचा आकडा या वर्षी ५००० च्या वर गेला. विशेष म्हणजे हा आकडा केवळ साडेचार महिन्यांचा म्हणजे २० मे २०२१ पर्यंतचा आहे. २०२० च्या मार्चपासून ते डिसेंबरपर्यंतच्या आकड्यांपेक्षाही तो अधिक आहे. २०१९ मध्ये सर्वसाधारण १८ हजारांच्या जवळपास मृत्यूंची नोंद करण्यात आली. २०२० मध्ये हा आकडा २२ हजारांवर पोहोचला. यामध्ये कोरोनाने झालेल्या मृत्यूंचाही समावेश आहे. मात्र या वर्षी चारच महिन्यांत सर्वसाधारण व कोरोना मिळून मृत्यूंचा आकडा १२ हजारांच्या वर गेल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

उल्लेखनीय म्हणजे गेल्या दोन वर्षांत जन्माचे प्रमाणही घटले आहे. २०१९ मध्ये ५३,९०७ मुलांचा जन्म झाला होता. २०२० मध्ये त्यात ९,०७१ ची घट झाल्याचे दिसून येते. या वर्षी ४४,९७८ बालकांचा जन्म झाला. यामध्ये २३,२२८ मुले व २१,७५० मुलींचा समावेश आहे. २०१९ च्या तुलनेत मुलींच्या जन्माचे प्रमाण ९५१ वरून ९३६ वर घसरल्याचे दिसून येते. २०२१ मध्ये जन्म प्रमाणात आणखी म्हणजे ३५ टक्क्यांनी घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. एप्रिल २०२० मध्ये ३,२०७ जन्माच्या तुलनेत २०२१ च्या एप्रिल महिन्यात २,१५१ बालकांच्या जन्माची नोंद करण्यात आली.

तज्ज्ञांच्या मते जन्मदर कमी होण्यामागे अनेक कारणे आहेत व ती कोरोनाशी संबंधित आहेत. एकतर गेल्या दीड वर्षात लग्नांचे प्रमाण कमालीचे घटले. ५० टक्केंच्या वर लग्न रद्द करण्यात आली किंवा पुढे ढकलण्यात आली. विशेष म्हणजे ज्यांचे लग्न झाले त्यांनीही संसर्गाच्या भीतीपायी पाळणा लांबविला. रुग्णालयातील भीषण परिस्थितीत गैरसोयीचा विचार करता प्रेग्नेंसी टाळण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे जन्माचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.

लग्नाची संख्याही घटली

दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून लग्नांची संख्याही घटली आहे. मार्च २०२० आलेल्या काेराेनाच्या पहिल्या लाटेनंतर जूनपर्यंत सर्व कारभार ठप्प राहिले. त्यानंतर काहीसी शिथिलता आली व रखडलेल्यांनी लग्न उरकून घेतले. मात्र फेब्रुवारी २०२१ पासून पुन्हा लग्न समारंभ खाेळंबले. सप्टेंबर २०२० ते फेब्रुवारी २०२१ या काळात जवळपास ५००० लग्न झाल्याची नाेंद आहे. हा आकडा दरवर्षीच्या तुलनेत २५ टक्केच म्हणावा लागेल.

वर्ष जन्म मृत्यू

२०१९ -५३९०७ -१८४३१

२०२० -४४९७८ -२२७४३

२०२१ -००    -      ००

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर