शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

कोरोनाचा असाही इफेक्ट; मृत्यूपत्र नोंदणी दुपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 09:02 IST

Nagpur News कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

ठळक मुद्देधडधाकट व्यक्तीही ठरताहेत बळी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

मृत्युपत्र एक कायदेशीर दस्तऐवज असून त्यात मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीचा गोषवारा असतो. तसेच, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित संपत्तीचा कुणाला कसा वाटा द्यायचा, या बाबी स्पष्ट केलेल्या असतात. त्यामुळे वारसांमध्ये संपत्तीवरून होणारा ताणतणाव टळतो. करिता, कोरोना काळात नागरिकांना मृत्युपत्र करून ठेवण्याची आवश्यकता भासायला लागली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यामागे वारसांचे काय होईल, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यामुळे मृत्युपत्र करून संपत्तीचे इच्छेप्रमाणे वाटप केले जात आहे.

वारसदारांमधील वाद टाळण्याचा प्रयत्न

कुटुंब प्रमुख्याच्या मृत्यूनंतर वारसदारांमध्ये संपत्तीवरून वाद होत आहेत. अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या. आपल्या कुटुंबात असे काही घडू नये यासाठी तातडीने मृत्युपत्र करून घेतले.

- केशव पाटील

मुलींचा वाटा सुरक्षित केला

बरेचदा मुलींना संपत्तीमध्ये वाटा नाकारला जातो. त्यानंतर कुटुंबात भांडणे होतात. न्यायालयात तक्रारी दाखल केल्या जातात. त्यावरून प्रत्येकाला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता मृत्युपत्र करून दोन मुलींचा वाटा सुरक्षित केला.

- कविता सातपुते़

मृत्यूच्या भीतीमुळे लवकर निर्णय

मला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तसेच, सध्या कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूची दहशत परसरली आहे. करिता, मृत्युपत्र करण्याचा लवकर निर्णय घेतला. आपल्या पश्चात वारसांमध्ये संपत्तीवरून वाद व्हायला नको. संपत्ती वाटपात सर्वांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे.

- राजकुमार वानखेडे.

काय म्हणतात वकील?

मृत्युपत्राची गरज वाटत आहे

मृत्युपत्राविषयी समाजामध्ये फारशी जागृती नाही. अनेक जण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मृत्युपत्र करण्यासाठी येतात. तसेच, बहुसंख्य व्यक्ती मृत्युपत्रच करीत नाहीत; परंतु सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता नागरिकांना मृत्युपत्राची गरज वाटायला लागली आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

- अ‍ॅड. रणजित सारडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी असोसिएशन.

कोरोनाच्या भीतीने जागे केले

नागरिकांना कोरोनाच्या भीतीने जागे केले आहे. सध्या जीवनाचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे मृत्युपत्र नोंदवून घेणाऱ्यांची संख्या काही महिन्यांपासून वाढली आहे. सामान्यत: उतरत्या वयात मृत्युपत्र केले जाते. परंतु, सध्या तरुण वयातील व्यक्तीही मृत्युपत्र करीत आहेत.

- अ‍ॅड. चंद्रशेखर राऊत, नोटरी

महिन्याला हजारावर मृत्युपत्रांची नोंदणी

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी नागपूरमध्ये महिन्याला ४०० ते ५०० मृत्युपत्रांची नोंदणी होत होती. परंतु, गेल्या काही महिन्यापासून ही संख्या वाढली आहे. सध्या महिन्याला १,००० ते १,२०० मृत्युपत्रांची नोंदणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस