शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

कोरोनाचा असाही इफेक्ट; मृत्यूपत्र नोंदणी दुपटीने वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 09:02 IST

Nagpur News कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

ठळक मुद्देधडधाकट व्यक्तीही ठरताहेत बळी

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. हा आजार धडधाकट व्यक्तींचाही बळी घेत आहे. या काळात कधी काय होईल, याचा नेम राहिला नसल्याने मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वारसदारांमध्ये संपत्ती वाटपावरून वाद होऊ नये यासाठी ही खबरदारी घेतली जात आहे.

मृत्युपत्र एक कायदेशीर दस्तऐवज असून त्यात मृत्युपत्र करणाऱ्या व्यक्तीच्या संपत्तीचा गोषवारा असतो. तसेच, त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर संबंधित संपत्तीचा कुणाला कसा वाटा द्यायचा, या बाबी स्पष्ट केलेल्या असतात. त्यामुळे वारसांमध्ये संपत्तीवरून होणारा ताणतणाव टळतो. करिता, कोरोना काळात नागरिकांना मृत्युपत्र करून ठेवण्याची आवश्यकता भासायला लागली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यास आपल्यामागे वारसांचे काय होईल, हा प्रश्न त्यांना सतावतो आहे. त्यामुळे मृत्युपत्र करून संपत्तीचे इच्छेप्रमाणे वाटप केले जात आहे.

वारसदारांमधील वाद टाळण्याचा प्रयत्न

कुटुंब प्रमुख्याच्या मृत्यूनंतर वारसदारांमध्ये संपत्तीवरून वाद होत आहेत. अशा अनेक घटना पाहायला मिळाल्या. आपल्या कुटुंबात असे काही घडू नये यासाठी तातडीने मृत्युपत्र करून घेतले.

- केशव पाटील

मुलींचा वाटा सुरक्षित केला

बरेचदा मुलींना संपत्तीमध्ये वाटा नाकारला जातो. त्यानंतर कुटुंबात भांडणे होतात. न्यायालयात तक्रारी दाखल केल्या जातात. त्यावरून प्रत्येकाला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता मृत्युपत्र करून दोन मुलींचा वाटा सुरक्षित केला.

- कविता सातपुते़

मृत्यूच्या भीतीमुळे लवकर निर्णय

मला मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. तसेच, सध्या कोरोनामुळे सर्वत्र मृत्यूची दहशत परसरली आहे. करिता, मृत्युपत्र करण्याचा लवकर निर्णय घेतला. आपल्या पश्चात वारसांमध्ये संपत्तीवरून वाद व्हायला नको. संपत्ती वाटपात सर्वांना समाधानी करण्याचा प्रयत्न केला आहे.

- राजकुमार वानखेडे.

काय म्हणतात वकील?

मृत्युपत्राची गरज वाटत आहे

मृत्युपत्राविषयी समाजामध्ये फारशी जागृती नाही. अनेक जण आयुष्याच्या अंतिम टप्प्यात मृत्युपत्र करण्यासाठी येतात. तसेच, बहुसंख्य व्यक्ती मृत्युपत्रच करीत नाहीत; परंतु सध्या कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता नागरिकांना मृत्युपत्राची गरज वाटायला लागली आहे. मृत्युपत्र करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

- अ‍ॅड. रणजित सारडे, अध्यक्ष, महाराष्ट्र नोटरी असोसिएशन.

कोरोनाच्या भीतीने जागे केले

नागरिकांना कोरोनाच्या भीतीने जागे केले आहे. सध्या जीवनाचा भरवसा राहिलेला नाही. त्यामुळे मृत्युपत्र नोंदवून घेणाऱ्यांची संख्या काही महिन्यांपासून वाढली आहे. सामान्यत: उतरत्या वयात मृत्युपत्र केले जाते. परंतु, सध्या तरुण वयातील व्यक्तीही मृत्युपत्र करीत आहेत.

- अ‍ॅड. चंद्रशेखर राऊत, नोटरी

महिन्याला हजारावर मृत्युपत्रांची नोंदणी

वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनापूर्वी नागपूरमध्ये महिन्याला ४०० ते ५०० मृत्युपत्रांची नोंदणी होत होती. परंतु, गेल्या काही महिन्यापासून ही संख्या वाढली आहे. सध्या महिन्याला १,००० ते १,२०० मृत्युपत्रांची नोंदणी होत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस