शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

कोरोनामुळे विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कारवाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे २९ इमारती धोकादायक : इमारतींवर लवकरच कारवाई होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण होत असल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्राप्त झाला आहे, हे विशेष.अधिकारी म्हणाले, एमआयएलने दोन वर्षांपूर्वीच एका एजन्सीमार्फत विमानतळालगतच्या उंच इमारतींची पाहणी केली होती. कोणत्या इमारती धोकादायक आहेत, याचा अहवाल तयार करून डीजीसीएला पाठविला आहे. इमारतींवर कारवाई करण्याची प्रक्रिया मोठी आहे. या अंतर्गत इमारतींच्या मालकांना नोटीस देणे, स्वत: कारवाई करणे, मनपाच्या अधिकाºयांसोबत चर्चा करणे, डीजीसीएला अहवाल देणे आणि त्यांच्याकडून आदेश येणे आणि नंतरच कारवाई करणे ही प्रक्रिया आहे. यात वेळ लागणार आहे. नोटीस दिल्यानंतर इमारतींच्या मालकांकडून इमारत तोडण्यासाठी कारवाई सुरू आहे का, याची पाहणी सुरू करण्यात येणार होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा पाहणी करून डीजीसीएला अहवाल देण्यात येणार आहे.विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे. या गंभीर समस्येवर एमआयएल आणि मनपाच्या अधिकाºयांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. उंचीचे उल्लंघन केलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्यात येण्यावर बैठकीत ठरले. विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळालगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून एमआयएल आणि डीजीसीएला अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येणार आहे.कारवाई होणारचविमानतळालगत उभ्या असलेल्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. या इमारतींचा अहवाल डीजीसीएकडे पाठविला आहे. इमारतींचे मालक स्वत: काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. पण या सर्व इमारतींवर कारवाई निश्चितच होणार आहे.आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर