शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
2
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
3
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
4
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
5
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
6
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
7
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
8
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
9
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
10
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
11
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
12
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
13
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
15
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
16
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
17
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
18
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
19
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
20
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!

कोरोनामुळे विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कारवाईला विलंब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 20:30 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे २९ इमारती धोकादायक : इमारतींवर लवकरच कारवाई होणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळालगतच्या उंच इमारतींवर कोरोना महामारीमुळे कारवाई करण्यास विलंब होत असल्याची माहिती विमानतळाचे संचालन करणाऱ्या मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी दिली. उंच इमारतींमुळे विमानाचे लॅण्डिंग आणि उड्डाणाला धोका निर्माण होत असल्याचा अहवाल दोन वर्षांपूर्वीच प्राप्त झाला आहे, हे विशेष.अधिकारी म्हणाले, एमआयएलने दोन वर्षांपूर्वीच एका एजन्सीमार्फत विमानतळालगतच्या उंच इमारतींची पाहणी केली होती. कोणत्या इमारती धोकादायक आहेत, याचा अहवाल तयार करून डीजीसीएला पाठविला आहे. इमारतींवर कारवाई करण्याची प्रक्रिया मोठी आहे. या अंतर्गत इमारतींच्या मालकांना नोटीस देणे, स्वत: कारवाई करणे, मनपाच्या अधिकाºयांसोबत चर्चा करणे, डीजीसीएला अहवाल देणे आणि त्यांच्याकडून आदेश येणे आणि नंतरच कारवाई करणे ही प्रक्रिया आहे. यात वेळ लागणार आहे. नोटीस दिल्यानंतर इमारतींच्या मालकांकडून इमारत तोडण्यासाठी कारवाई सुरू आहे का, याची पाहणी सुरू करण्यात येणार होती. ही प्रक्रिया सुरू असतानाच मार्च महिन्यात लॉकडाऊन लागले. त्यामुळे ही प्रक्रिया थांबली. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा पाहणी करून डीजीसीएला अहवाल देण्यात येणार आहे.विमानतळ प्रशासनाने कारवाईसाठी या इमारतींच्या मालकांना अनेकदा नोटिसा बजावल्या आहेत. विमानाला धोका असलेल्या २९ इमारतींची ओळख झाली आहे. या गंभीर समस्येवर एमआयएल आणि मनपाच्या अधिकाºयांमध्ये पूर्वी बैठक झाली आहे. उंचीचे उल्लंघन केलेल्या इमारतींचे बांधकाम तोडण्यात येण्यावर बैठकीत ठरले. विमानतळ परिसराच्या ठराविक अंतरावर बांधकाम करण्यात येणाºया इमारतींसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवानगी घ्यावी लागते. हा नियम संपूर्ण देशात लागू आहे. प्राधिकरणाने विमानतळालगतच्या परिसरात इमारत बांधण्यासाठी उंची ठरवून दिली आहे. त्यानंतरही नियमांचे उल्लंघन करून उंच इमारती उभ्या राहिल्या आहेत. उंचीसाठी मालकाने प्राधिकरणाची मंजुरी घेतलेली नाही. आता त्या विमानासाठी धोकादायक ठरल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळालगतच्या उंच इमारतींचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. विमानतळ प्राधिकरणासह खासगी कंपनीतर्फेही इमारतींचे सर्वेक्षण करून एमआयएल आणि डीजीसीएला अहवाल सादर केला आहे. पण त्यानंतरही कारवाई झालेली नाही. मर्यादेपेक्षा जास्त उंच इमारतींच्या बांधकामाला प्राधिकरणाने परवानगी दिलीच नाही. अशा स्थितीत कारवाईसाठी प्राधिकरणाचे अधिकारी कुणाची वाट पाहत आहेत, हा गंभीर प्रश्न आहे. कारवाईसाठी स्थानिक प्रशासनाची मदत घेता येणार आहे.कारवाई होणारचविमानतळालगत उभ्या असलेल्या उंच इमारतींवर कारवाई करण्यात कोरोना महामारीमुळे विलंब झाला आहे. सर्वांना नोटिसा पाठविल्या आहेत. या इमारतींचा अहवाल डीजीसीएकडे पाठविला आहे. इमारतींचे मालक स्वत: काय कारवाई करतात, याकडे लक्ष आहे. पण या सर्व इमारतींवर कारवाई निश्चितच होणार आहे.आबीद रूही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर