शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
4
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
5
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
8
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
9
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
10
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
11
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
12
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
13
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
14
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
15
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
16
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
17
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
18
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
19
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
20
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

वाढत्या तापमानासह कमी होतोय कोरोना; नीरीचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:30 IST

तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देशारीरिक अंतराचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतराचे पालन करणे अत्यावश्यक आहे.नीरीने तापमान व आर्द्रतेचा कोरोना संक्रमणाशी असलेल्या संबंधावर संशोधन केले. त्यात मुंबई, चेन्नई, श्रीनगरसह केरळ येथील काही शहरांचा समावेश करण्यात आला. तापमान वाढल्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याचे या संशोधनातून आढळून आले. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दी केल्यास तापमानाचा फायदा मिळत नाही. आर्द्रतेचा मात्र कोरोनासोबत थेट संबंध दिसून आला नाही. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ डॉ. हेमंत भेरवानी, डॉ. अंकित गुप्ता व डॉ. अवनिश अंशुल यांनी हे संशोधन केले. जाणकारांच्या माहितीनुसार थंड वातावरणामध्ये कोरोना व्हायरस जमिनीवर ७२ तासापर्यंत सक्रिय राहू शकतो. ३५ डिग्री व त्यापेक्षा जास्त तापमानामध्ये कोरोना संक्रमण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.शारीरिक अंतराशिवाय फायदा नाहीभारताला वाढत्या तापमानाचा व वातावरणाचा फायदा मिळत असला तरी, केवळ त्या आधारावर कोरोना संकटाला सहजतेने घेता येणार नाही. शारीरिक अंतराचे पालन केले तरच वाढत्या तापमानाचा फायदा मिळेल. गर्दी करून राहिल्यास तापमानाचा काहीच फायदा मिळणार नाही.- डॉ. राकेशकुमार, संचालक, नीरी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस