शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

वाढत्या तापमानासह कमी होतोय कोरोना; नीरीचे संशोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 21:30 IST

तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढळून आले आहे.

ठळक मुद्देशारीरिक अंतराचे पालन आवश्यक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तापमान वाढत जाईल तसतसा कोरोनाचा प्रसार कमी होईल, असा अंदाज आधीपासूनच व्यक्त केला जात होता. त्यावर आता शिक्कामोर्तब झाले आहे. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थान(नीरी)ने केलेल्या संशोधनातून वाढत्या तापमानासह कोरोनाचे संक्रमण घटत असल्याचे आढळून आले आहे. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतराचे पालन करणे अत्यावश्यक आहे.नीरीने तापमान व आर्द्रतेचा कोरोना संक्रमणाशी असलेल्या संबंधावर संशोधन केले. त्यात मुंबई, चेन्नई, श्रीनगरसह केरळ येथील काही शहरांचा समावेश करण्यात आला. तापमान वाढल्यानंतर कोरोनाचे संक्रमण कमी होत असल्याचे या संशोधनातून आढळून आले. परंतु, त्यासोबत शारीरिक अंतर ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. गर्दी केल्यास तापमानाचा फायदा मिळत नाही. आर्द्रतेचा मात्र कोरोनासोबत थेट संबंध दिसून आला नाही. नीरीचे संचालक डॉ. राकेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रज्ञ डॉ. हेमंत भेरवानी, डॉ. अंकित गुप्ता व डॉ. अवनिश अंशुल यांनी हे संशोधन केले. जाणकारांच्या माहितीनुसार थंड वातावरणामध्ये कोरोना व्हायरस जमिनीवर ७२ तासापर्यंत सक्रिय राहू शकतो. ३५ डिग्री व त्यापेक्षा जास्त तापमानामध्ये कोरोना संक्रमण कमी होत असल्याचे दिसून येत आहे.शारीरिक अंतराशिवाय फायदा नाहीभारताला वाढत्या तापमानाचा व वातावरणाचा फायदा मिळत असला तरी, केवळ त्या आधारावर कोरोना संकटाला सहजतेने घेता येणार नाही. शारीरिक अंतराचे पालन केले तरच वाढत्या तापमानाचा फायदा मिळेल. गर्दी करून राहिल्यास तापमानाचा काहीच फायदा मिळणार नाही.- डॉ. राकेशकुमार, संचालक, नीरी.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस