शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

कोराना विषाणूचा घरातील कर्त्या पुरुषावरच घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 20:22 IST

Corana virus attack, Nagpur News कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे.

ठळक मुद्देधक्कादायक, ५० वरील वयोगटात ७६.१२ टक्के मृत्यू : ३१ ते ५० वयोगट सर्वाधिक बाधित

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : कोरोनाची सर्वाधिक लागण ३० ते ५० वयोगटामध्ये झाली आहे. नागपूर जिल्ह्यात गुरुवारी नोंद झालेल्या ८६३८१ रुग्णांपैकी या वयोगटातील ३४३८२ रुग्णांचा समावेश आहे. याचे प्रमाण ३९.८० टक्के आहे. तर ५० व त्यापुढील वयोगटात १८६२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याची टक्केवारी ७६.१२ टक्के आहे. कोरोना विषाणू घरातील कर्त्या पुरुषावरच घाला घालीत असल्याचे या आकडेवारीतून समोर आले आहे.जिल्ह्यात मार्चपासून कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरूवात झाली. ऑगस्ट महिन्यापासून कोरोनाच्या रुग्णसंख्येने वेग धरला. सप्टेंबर महिन्यात कोरोनाबाधित व मृत्यूच्या संख्यची विक्रमी नोंद झाली. परंतु आॅक्टोबर महिन्याच्या या आठ दिवसांत कोरोनाचा जोर कमी होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु गाफील राहू नका, पुढे हिवाळा आहे. थंडीच्या दिवसात विषाणू अधिक काळापर्यंत जिवंत राहत असल्याने अधिक काळजी घेणे व प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करणे आवश्यक आहे. उपलब्ध माहितीनुसार, ० ते १५ वयोगटात ५६९२ रुग्ण (६.५० टक्के), १६ ते ३० वयोगटात २१६०३ (२५.०१ टक्के), ५० वर्षांवरील वयोगटात २४४०३ (२८.२५ टक्क) रुग्णांची नोंद झाली आहे. ३०१ बाधितांच्या वयोगटाची माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.० ते १५ वयोगटात ७ मृत्यूनागपूर जिल्ह्यात बाधितांच्या मृतांची संख्या २४४६ वर पोहचली आहे. यात पाच दिवसांच्या चिमुकल्यांपासून ते १०२ वर्षांच्या वृद्धेच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ० ते ७ वयोगटात ७, १६ ते ३० वयोगटात ७१, ३१ ते ५० वयोगटात ५०६, बाधितांचा मृत्यू झाला आहे. ५० वर्षांवरील वयोगटातील सर्वाधिक मृत्यूला अनियंत्रित मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, कर्करोग तसेच फुफ्फुसांचे आजार कारणीभूत ठरला आहे.गाफील राहू नकाशासनाने केलेल्या विविध उपाययोजनांमुळे कोरोनाबाधितांसोबतच मृत्यूची संख्या कमी होऊ लागली आहे. परंतु गाफील राहू नका. कोरोनाचे संकट टळलेले नाही. प्रत्येकाने घराबाहेर पडताना नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. यात मास्क लावणे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे, चेहऱ्याला हात न लावणे व वारंवार हात धूत राहणे किंवा सॅनिटाईझ करणे गरजेचे आहे.डॉ. संजय जयस्वालउपसंचालक, आरोग्य विभाग, नागपूर

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर