शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

विदर्भाच्या लढ्यासाठी समन्वय समिती

By admin | Updated: January 15, 2016 03:40 IST

स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे.

नागपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मागणीसाठी पुन्हा एकदा सर्वपक्षीय विदर्भवादी नेत्यांनी एकत्र येऊन लढण्याचा संकल्प केला आहे. विदर्भाच्या लढ्याची रूपरेषा ठरविण्यात येणार असून त्यासाठी एक समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे. गुरुवारी रामदासपेठ येथील एका हॉटेलात दुपारी ही बैठक पार पडली. या बैठकीत ज्येष्ठ विदर्भवादी नेते माजी खा. दत्ता मेघे, माजी मंत्री रणजित देशमुख, महाराष्ट्राचे महाधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे, माजी मंत्री मधुकरराव किंमतकर, आ. आशिष देशमुख, आमदार समीर मेघे, आमदार पंकज भोयर, आ. चरण वाघमारे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते उमेश चौबे, अ‍ॅड. अनिल किलोर, चंद्रकांत वानखेडे, प्रा. शरद पाटील, मोहन गायकवाड, अ‍ॅड. मुकेश समर्थ, देवेंद्र पारेख, प्रकाश इटनकर,हरीश इथापे, अरुण बोंदे, प्रमोद पांडे, नितीन रोंघे, अ‍ॅड. नीरज खांदेवाले, अ‍ॅड. संदेश सिंगलकर, अमिताभ पावडे, अ‍ॅड. दीपक पाटील, धनंजय मिश्रा, जुुगल कोठारी आदींसह विदर्भातून जवळपास ७० ते ७५ लोक उपस्थित होते. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या नेतृत्वात ही बैठक झाली. या बैठकीत स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. जवळपास सर्वांनीच आपापली मते व्यक्त केली. अनेकांनी सूचनाही केल्या. स्वतंत्र विदर्भासाठी लढा पुकारण्यावर सर्वांचेच एकमत होते. आंदोलनाची पुढची दिशा ठरविणे आणि त्यासाठी सर्वपक्षीय समन्वय समिती स्थापन करणे यावर सर्वांचेच एकमत झाले. सर्वांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर समन्वय समिती स्थापन करण्याची घोषणा बैठकीत करण्यात आली. परंतु यासंदर्भात आता काही उघड करावयाचे नाही, असेही ठरविण्यात आले. लवकरच समितीची घोषणा करून आंदोलनाची दिशाही ठरविण्यात येईल. (प्रतिनिधी)