शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं विधान; देवेंद्र फडणवीसांनी ३ शब्दातच भाष्य केले
2
गाझात पारले-जीचा ६० रुपयांचा बिस्कीट पुडा २३५० ला; बापाने काळजाच्या तुकड्याला आणून दिला...
3
जी ७ शिखर संमेलनाचं भारताला निमंत्रण; कॅनडाच्या पंतप्रधानांचा नरेंद्र मोदींना फोन
4
मोठा धक्का! ओला इलेक्ट्रीकमध्ये ह्युंदाई, कियाने २५०० कोटी गुंतविलेले; वैतागून सर्व शेअर ७०० कोटींना विकले... 
5
मशीन गन, बुलेटप्रूफ जॅकेट अन्...काश्मीरला जाणाऱ्या 'वंदे भारत' एक्सप्रेसमध्ये चोख सुरक्षा व्यवस्था
6
KL राहुलची कडक बॅटिंग, पण Chris Woakes समोर यशस्वीसह करुण नायरनं टाकली नांगी
7
"मी राजसाहेबांशी साथ सोडणार नाही, पण..."; मनसे नेते वैभव खेडेकर यांचा खुलासा
8
'माझं तर डिमोशन झालं...!'; वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवण्याच्या कार्यक्रमात ओमर अब्दुल्लांनी संधी साधली, केली मोठी मागणी
9
आधी अंगावर धाऊन गेली, मग कॉलर पकडून...; लोकलमध्ये महिलेकडून दिव्यांग प्रवाशाला मारहाण
10
Pooja Bagul: धुळ्याच्या पूजाला संपविण्यासाठी मांत्रिकाला प्रेयसी प्रज्ञाने दिले होते ५००००, तर कपिलने पाच लाख
11
स्टारलिंक भारतात आल्यास खरेच मोठी क्रांती घडणार? जाणून घ्या मस्क यांची कंपनी फायद्याची की तोट्याची...
12
कधी स्वप्नातही या गोष्टीचा विचार केला नव्हता! शुबमन गिलनं व्यक्त केली मनातील भावना
13
इस्रायलवर पुन्हा हल्ला करण्याच्या तयारीत इराण? 'या' देशासोबत केली 800 बॅलिस्टिक मिसाइल्सची डील!
14
Thane: वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी, ठाणे- घोडबंदर स्लिप रोड दोन दिवस वाहतुकीसाठी बंद!
15
पाकिस्तानी हवाई दलाची ताकद वाढवण्यासाठी चीनची पडद्यामागून मोठी खेळी; भारतासाठी नवं आव्हान?
16
जे इंग्रजांनाही जमले नाही, ते पंतप्रधान मोदींनी करुन दाखवले; ओमर अब्दुल्लांकडून स्तुतीसुमने
17
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
18
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 
19
बेपत्ता झालेल्या राजा आणि सोनमची करण्यात आली होती रेकी, दुचाकीचे लोकेशन आले समोर
20
Nirjala Ekadashi 2025:निर्जला एकादशीचा उपवास, करा साबुदाण्याची खमंग- कुरकुरीत भजी!

धर्मांतरण ही हिंसाच, घरवापसीचा स्वीकार व्हावा; सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांचं विधान

By योगेश पांडे | Updated: June 5, 2025 22:07 IST

युद्धपरिस्थितीत सर्वपक्षीय नेत्यांची समंजस भूमिका लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत, पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली

योगेश पांडेनागपूर : आदिवासी भागांमध्ये धर्मांतरणाचा मुद्दा गंभीर आहे. संस्कृतीचे मूळ आदिवासी समाजातच असून त्यांनी देशाची परंपरा जपली आहे. मनापासून जर कुणी पुजेची पद्धती बदलत असेल तर त्याला कुणीच आक्षेप घेण्याचा प्रश्न नाही. मात्र विविध आमिषे दाखवून व जबरदस्ती करून दुसऱ्या धर्माचा स्वीकार करायला लावणे चुकीचेच आहे. धर्मांतरण ही हिंसाच आहे. जर अशा पद्धतीने धर्मांतरण झालेला व्यक्ती घरवापसी करत असेल तर त्याचा स्वीकार करायला हवा, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. संघाच्या कार्यकर्ता विकास वर्ग-द्वितीयच्या समारोपप्रसंगी गुरुवारी ते बोलत होते.

रेशीमबाग मैदानावर झालेल्या कार्यक्रमाला कॉंग्रेसचे माजी केंद्रीय राज्यमंत्री अरविंद नेताम, प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, महानगर संघचालक राजेश लोया, वर्गाचे सर्वाधिकारी समीरकुमार महांती प्रामुख्याने उपस्थित होते. आदिवासी हे आपल्या समाजाचाच हिस्सा आहे. धर्मांतरण व इतर समस्यांसंदर्भात आदिवासी समाजाला सोबत घेऊन आम्ही शक्य ते सहकार्य करू. शासन, प्रशासन सहाय्यक असू शकतात, मात्र संबंधित लोकांनीदेखील कामात सहभागी झाले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.

सैन्याची क्षमता व सरकारच्या दृढतेचे दर्शनपहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर सरकार व सैन्याने आवश्यक ती कारवाई केली. या प्रसंगाने सैन्याची क्षमता व वीरता जगासमोर आली. संरक्षणविषयक विविध संशोधन किती आवश्यक व कामाचे आहेत हे सिद्ध झाले. तसेच केंद्र शासनाची दृढता दिसून आली. महत्त्वाचे म्हणजे सर्व पक्षांच्या नेत्यांनी समजूतदारपणा व परस्पर सहयोगदेखील जगाने पाहिला. संपूर्ण समाजाने आपल्या एकतेचे उदाहरण प्रस्तुत केले. जर अशी भावना चिरंतर राहिली तर सुदृढ लोकशाहीचे दृष्य यातून समोर येईल,असे मत सरसंघचालकांनी व्यक्त केले.

संरक्षणासंदर्भात आत्मनिर्भरतेवरच भर हवापहलगाम हल्ल्यानंतर आपण कारवाई केली म्हणजे समस्या दूर झाली असे नाही. युद्धाचे प्रकार बदलले आहेत. दहशतवादाला खतपाणी घालत त्यामाध्यमातून लढण्यात येत आहे. सायबर वॉरपासून अगदी प्रॉक्सीवॉर सातत्याने सुरू आहे. आता घरी बसून एका क्लिकवर ड्रोन नियंत्रित करून युद्ध केले जाऊ शकते. त्यामुळे आपल्या सुरक्षेच्या बाबतीत आपल्याला आत्मनिर्भर व्हावेच लागेल. यासाठी सेना, शासन, प्रशासनासोबतच समाजानेदेखील एकत्रित यायला हवे,असे आवाहन सरसंघचालकांनी केले.

सरसंघचालकांचे इतर प्रमुख मुद्दे- देशहितासमोर इतर सर्व स्वार्थ गौण असले पाहिजेत- एकमेकांसोबत सद्भावना कायम असली पाहिजे- भावनावेगात वाहून जाऊन वाट्टेल तसे वागणे व त्याच्या प्रतिक्रियेत कायदा हातात घेऊन मनमानी करणे योग्य नाही.- समाजात हिंसा करणे, विनाकारण शिवीगाळ करणे, प्रतिक्रिया देताना काहीही बोलणे हे आपल्याला सोडावे लागेल.- समाज तोडणारे भाषण करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकू नका

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ