शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशन अपेडट; नागपुरच्या पुरात कोट्यवधींचे नुकसान, मदत केवळ ८५ लाखांची

By योगेश पांडे | Updated: December 11, 2023 15:30 IST

शासनाचीच विधानपरिषदेत माहिती : नागरिकांना कधी मिळणार न्याय ?

नागपूर : उपराजधानीत सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे अनेक वस्त्यांमध्ये कोट्यवधींचे नुकसान झाले होते. याबाबत नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचादेखील सूर होता. राज्य शासनाकडून तत्काळ मदत मिळण्याची अपेक्षा होती व त्यानुसार पंचनामेदेखील करण्यात आले. मात्र कोट्यवधींचे नुकसान झाले असताना नागरिकांना केवळ ८५ लाखांची मदत करण्यालाच मान्यता देण्यात आली आहे. राज्य शासनाकडूनच विधानपरिषदेत सोमवारी ही माहिती देण्यात आली.

अमोल मिटकरी, विक्रम काळे, सुधाकर अडबाले, अभिजीत वंजारी व इतर सदस्यांनी याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. त्याच्या लेखी उत्तरात मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट केली आहे. सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे नागपुरात अनेक घरांचे तसेच पायाभूत सुविधांचे नुकसान झाले होते. तसेच चार नागरिकांचा बळीदेखील गेला. नागपूर शहरातील नुकसानग्रस्त घरांच्या नुकसानासाठी ३० नोव्हेंबरच्या शासननिर्णयानुसार ८५.४४ लाख रुपयांचा निधी वितरीत करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मृतकांच्या कुटुंबियांना चार-चार लाखांची मदत करण्यात आल्याची माहिती अनिल पाटील यांनी दिली.प्रत्यक्षात नागपुरात आलेल्या पुरामध्ये झोपडपट्ट्या व सखल भागातील हजारो घरांचे नुकसान झालेच होते. मात्र अगदी पॉश वस्त्यांतील घरेदेखील पाण्यात बुडाली होती. अनेक घरांमधील इलेक्ट्रॉनिकचे सामान, फर्निचर यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले होते. काही घरांमधील नुकसानाचा आकडाच लाखोंमध्ये होता. अशा स्थितीत केवळ ८५ लाखांच्या निधी वितरणाचा निर्देश जारी करण्यात आला असल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंचनामे पूर्ण, उर्वरित निधी कधी ?

या नुकसानानंतर प्रशासनातर्फे पंचनामे करण्यात आले होते व त्यासाठी महानगरपालिकेचे कर्मचारी-अधिकारीदेखील कामाला लावण्यात आले होते. पंचनामे पूर्ण झाल्यावरदेखील केवळ ८५ लाखांच्या निधी वितरणाला मान्यता मिळाली आहे. उर्वरित निधीला मंजुरी कधी मिळणार असा प्रश्न निर्माण होत आहे.

टॅग्स :floodपूरnagpurनागपूर