शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नितीन गडकरींच्या ‘श्रीमंत-गरीब’ वक्तव्यावरून वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2022 22:45 IST

Nagpur News भारत विकास परिषदेच्या परिषदेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या एका कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला.

नागपूर : भारत विकास परिषदेच्या परिषदेत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या एका कथित वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला. एका वृत्तसंस्थेने केलेल्या ट्विटचा आधार घेत तृणमूल काँग्रेसचे नेते खा. डेरेक ओ ब्रायन यांनी ट्वीट केले. यानंतर गडकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा वृत्तसंस्थेने विपर्यास केल्याचा दावा केला.

देशाच्या विकासाचा हवाला देत असताना गडकरी यांनी गरिबांच्या कोणत्या समस्या दूर करायच्या आहेत यावर भाष्य केले. त्यातील भारत हा एक श्रीमंत देश असून तेथील लोक गरीब आहेत. बेरोजगारी, उपासमार, गरिबी, महागाई, अस्पृश्यता, भेदभाव या समस्या देशात आहेत, हे वाक्य उचलून वृत्तसंस्थेने ट्वीट केले. या ट्वीटला काँग्रेससह देशभरातील विरोधकांनी रिट्वीट करावे, असे आवाहन डेरेक-ओ-ब्रायन यांनी केले. त्यानंतर गडकरी यांनी यावर स्पष्टीकरण देत वृत्तसंस्थेचे ट्वीट विपर्यास असल्याचा दावा केला.

आपल्या समाज आणि देशाच्या समस्यांबद्दल मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला आहे. काही घटक व विरोधक त्यातून आनंद मिळवत आहेत. मी दिलेल्या संदर्भांमागील खरा हेतू नागरिकांनी समजून घ्यावा. जेव्हा आपण विकासाबद्दल बोलतो तेव्हा उद्दिष्टे साध्य करण्याच्या प्रक्रियेतील अडथळे असलेल्या सामाजिक समस्यांचा विचार केला पाहिजे. जलद गतीने प्रगती करण्यासाठी या सामाजिक समस्यांवर मात केली पाहिजे आणि त्यात काहीही गैर नाही. माझ्या संपूर्ण भाषणात हीच भूमिका होती, या शब्दांत गडकरी यांनी आपली भूमिका मांडली.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी