शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

नागपूर विद्यापीठात कंत्राटी पदभरती तापली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 21:26 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा, वित्त यासारखे संवेदनशील विभाग आहेत. मात्र हे विभाग आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे कारण समोर करुन प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नेमण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र अशा पद्धतीचे पाऊलच नियमांना धरुन नसल्याची भूमिका घेत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी प्रस्तावाला असहमती दर्शविली. अनेक दिवसांनंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक तापल्याचे दिसून आले.

ठळक मुद्देप्र-कुलगुरू, सहसंचालकांनी केला प्रस्तावाला विरोध : व्यवस्थापन परिषदेची प्रस्तावाला संमती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात परीक्षा, वित्त यासारखे संवेदनशील विभाग आहेत. मात्र हे विभाग आता कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या हाती जाण्याची शक्यता आहे. विद्यापीठात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा तुटवडा जाणवत असल्याचे कारण समोर करुन प्रशासनाने कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नेमण्याचे ठरविले आहे. यासंदर्भातील करारनाम्यावर सोमवारी व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत चर्चा झाली. मात्र अशा पद्धतीचे पाऊलच नियमांना धरुन नसल्याची भूमिका घेत प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले, तंत्रशिक्षण सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांनी प्रस्तावाला असहमती दर्शविली. अनेक दिवसांनंतर व्यवस्थापन परिषदेची बैठक तापल्याचे दिसून आले.नागपूर विद्यापीठात अनेक कर्मचारी सेवानिवृत्त झाले असून मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे. राज्य शासनानेदेखील पदभरती थांबविली आहे. त्यामुळे अनेक विभागांत तर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना प्रतिदिन वेतनावर परत बोलविण्यात आले आहे. मात्र असे असतानादेखील विद्यापीठाद्वारे कंत्राटी पद्धतीवर शिक्षकेत्तर कर्मचारी नेमण्याचा प्रस्ताव मागील वर्षी व्यवस्थापन परिषदेसमोर आणण्यात आला. २ कंपन्यांच्या निविदादेखील अंतिम झाल्या. सोमवारी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या कंत्राटासंबंधीतील करारनाम्यावर चर्चा झाली. विद्यापीठाच्या अधिनियमानुसार राज्य शासनाच्या परवानगीशिवाय कुठलेही कंत्राट दिले जाऊ शकत नाही. सोबतच हा विषय व्यवस्थापन परिषदेचा नाही आणि कुठलेही अधिनियम काढले नसताना कंत्राटी पद्धतीवर नियुक्ती करणे योग्य होणार नाही, अशी भूमिका प्र-कुलगुरू, डॉ.खडीकर यांनी मांडली. प्रशासनातर्फे उद्योग मंत्रालयाशी संबंधित शासननिर्णयाचा दाखला देण्यात आला. यासंदर्भात उच्च शिक्षण विभागाचा शासन निर्णयच मानण्यात येईल, असे ठाकरे यांनी सांगितले. या तिघांनीही या प्रस्तावाला मान्यता देण्यास नकार दिला. दुसरीकडे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे, कुलसचिव डॉ.पूरण मेश्राम व डॉ.मिलींद बारहाते हे प्रस्ताव मान्य करण्याच्या पक्षात होते. अखेर अध्यक्ष या नात्याने कुलगुरूंनी संबंधित प्रस्ताव मान्य करत असल्याचा निर्णय दिला. चंद्रपूर व नागपूर येथील एकूण २ कंपन्यांना हे कंत्राट देण्यात आले आहे.कुठल्या आधारावर करणार करार ? : प्र-कुलगुरुडॉ.प्रमोद येवले यांनी विद्यापीठ अधिनियमाचा दाखला देत हा व्यवस्थापन परिषदेचा मुद्दा नसल्याचे प्रतिपादन केले. सोबतच हे कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर राहणार आहेत. परीक्षा व वित्त विभाग संवेदनशील विभाग मानण्यात येतात. असा स्थितीत या विभागांमध्ये असे कर्मचारी काम करताना काही चुका झाल्या, घोटाळा झाला तर त्याला जबाबदार कोण असेल असा प्रश्नदेखील त्यांनी उपस्थित केला.शासनाला काहीच कळविले नाहीसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विद्यापीठाच्या अधिनियमातील कलम ८ मध्ये राज्य शासनाच्या परवानगीशिवाय नवीन पद निर्माण करणे किंवा एखादा निधी दुसऱ्या  कामांसाठी वापरणे यासारख्या आर्थिक व्यवहारांसाठी राज्य शासनाच्या परवानगीची आवश्यकता असते. या कंत्राटी पदभरतीसंदर्भात विद्यापीठाने शासनाला काहीही कळविलेले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.कुलगुरू म्हणतात, सर्व काही नियमानुसारयासंदर्भात कुलगुरू डॉ.काणे यांच्याशी संपर्क केला असता सर्व काही नियमांनुसारच होत असल्याचा दावा त्यांनी केला. व्यवस्थापन परिषदेच्या अधिकारातच हा निर्णय घेण्यात आला आहे. शासनाला याबाबत कळविण्याची काहीच आवश्यकता नाही. संबंधित पदभरतीच्या वेळी विद्यापीठाकडून उमेदवारांची चाचणी घेण्यात येईल. तसेच त्यांना संवेदनशील विभागांमध्ये काम देण्यात येणार नाही, असे कुलगुरूंनी स्पष्ट केले.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूर