शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

नागपूरच्या सेतू कार्यालयातील गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:52 IST

शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे५ अतिरिक्त खिडक्या सुरू : दररोज १५०० वर अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.जून महिन्यात शाळा सुरू होतात. यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेयर, अधिवास, उत्पन्नाचा दाखला आदीं प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अशावेळी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावर्षीही विविध शाळांमध्ये शिबिरे घेतली. या शिबिरांना विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. यानंतरही सेतूमध्ये होणारी गर्दी काही कमी झालेली नाही. सध्या जुलै महिना सुरु आहे. गर्दीत कमतरता आल्याचे सेतूमधील कर्मचारी सांगतात. परंतु दररोज किमान १५०० वर अर्ज येत आहेत. त्यामुळे गर्दी कायम आहे, असेच म्हणता येईल. सेतू कार्यालयात एकूण १५ खिडक्या आहेत. साधारणपणे १० खिडक्या सुरू असतात. परंतु विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता सर्व १५ खिडक्याही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आणि अधिवास या प्रमाणपत्रासाठीच सध्या जास्त अर्ज येत आहेत. काही दिवस ही गर्दी कायम राहील असे सांगितले जाते.शाळा-महाविद्यालयातील शिबिरांत साडेसात हजारावर अर्जजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून विविध प्रमाणपत्रासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले. दोन टप्प्यात हे शिबिर पार पडले. पहिल्या टप्प्यात ८ व ९ जून रोजी तिडके महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, गजानन विद्यालय, डी.डी.नगर विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय येथे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण २४०३ अर्ज प्राप्त झाले तर दुसऱ्या टप्प्यात २२ व २३ जून रोजी संताजी महाविद्यालय, रामनगर विद्यालय, जिंगल बेल विद्यालय, पंडित बच्छराज विद्यालय आणि राजेंद्र हायस्कुल येथे शिबिर पार पडले. याशिबिरात तब्बल ५३३३ विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले. असे एकूण ७७३६ विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालय अर्ज केले. याचाच अर्थ इतके विद्यार्थ्यांना सेतू कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. ते आले असते तर एका विद्यार्थ्यासोबत किमान १ ते २ जण येतात. त्यामुळे जवळपास १५ हजार लोकांची गर्दी सेतू कार्यालयात झाली असती. ती या शिबिरामुळे कमी झाल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय