शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

नागपूरच्या सेतू कार्यालयातील गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:52 IST

शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे५ अतिरिक्त खिडक्या सुरू : दररोज १५०० वर अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.जून महिन्यात शाळा सुरू होतात. यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेयर, अधिवास, उत्पन्नाचा दाखला आदीं प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अशावेळी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावर्षीही विविध शाळांमध्ये शिबिरे घेतली. या शिबिरांना विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. यानंतरही सेतूमध्ये होणारी गर्दी काही कमी झालेली नाही. सध्या जुलै महिना सुरु आहे. गर्दीत कमतरता आल्याचे सेतूमधील कर्मचारी सांगतात. परंतु दररोज किमान १५०० वर अर्ज येत आहेत. त्यामुळे गर्दी कायम आहे, असेच म्हणता येईल. सेतू कार्यालयात एकूण १५ खिडक्या आहेत. साधारणपणे १० खिडक्या सुरू असतात. परंतु विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता सर्व १५ खिडक्याही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आणि अधिवास या प्रमाणपत्रासाठीच सध्या जास्त अर्ज येत आहेत. काही दिवस ही गर्दी कायम राहील असे सांगितले जाते.शाळा-महाविद्यालयातील शिबिरांत साडेसात हजारावर अर्जजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून विविध प्रमाणपत्रासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले. दोन टप्प्यात हे शिबिर पार पडले. पहिल्या टप्प्यात ८ व ९ जून रोजी तिडके महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, गजानन विद्यालय, डी.डी.नगर विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय येथे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण २४०३ अर्ज प्राप्त झाले तर दुसऱ्या टप्प्यात २२ व २३ जून रोजी संताजी महाविद्यालय, रामनगर विद्यालय, जिंगल बेल विद्यालय, पंडित बच्छराज विद्यालय आणि राजेंद्र हायस्कुल येथे शिबिर पार पडले. याशिबिरात तब्बल ५३३३ विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले. असे एकूण ७७३६ विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालय अर्ज केले. याचाच अर्थ इतके विद्यार्थ्यांना सेतू कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. ते आले असते तर एका विद्यार्थ्यासोबत किमान १ ते २ जण येतात. त्यामुळे जवळपास १५ हजार लोकांची गर्दी सेतू कार्यालयात झाली असती. ती या शिबिरामुळे कमी झाल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय