शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: 'आप'ची १५ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर; आतापर्यंत ५१ शिलेदार मैदानात!
2
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
4
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
5
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
6
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
7
Video: पाकिस्तानच्या हॅरिस रौफने कॅच पकडण्यासाठी उडी घेतली, समोरून कार्टराईटही आला अन् मग...
8
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
9
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
10
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
11
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
12
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
13
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
14
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
15
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
16
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
17
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
18
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
19
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
20
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरच्या सेतू कार्यालयातील गर्दी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 22:52 IST

शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे५ अतिरिक्त खिडक्या सुरू : दररोज १५०० वर अर्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.जून महिन्यात शाळा सुरू होतात. यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेयर, अधिवास, उत्पन्नाचा दाखला आदीं प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अशावेळी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावर्षीही विविध शाळांमध्ये शिबिरे घेतली. या शिबिरांना विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. यानंतरही सेतूमध्ये होणारी गर्दी काही कमी झालेली नाही. सध्या जुलै महिना सुरु आहे. गर्दीत कमतरता आल्याचे सेतूमधील कर्मचारी सांगतात. परंतु दररोज किमान १५०० वर अर्ज येत आहेत. त्यामुळे गर्दी कायम आहे, असेच म्हणता येईल. सेतू कार्यालयात एकूण १५ खिडक्या आहेत. साधारणपणे १० खिडक्या सुरू असतात. परंतु विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता सर्व १५ खिडक्याही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आणि अधिवास या प्रमाणपत्रासाठीच सध्या जास्त अर्ज येत आहेत. काही दिवस ही गर्दी कायम राहील असे सांगितले जाते.शाळा-महाविद्यालयातील शिबिरांत साडेसात हजारावर अर्जजिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून विविध प्रमाणपत्रासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले. दोन टप्प्यात हे शिबिर पार पडले. पहिल्या टप्प्यात ८ व ९ जून रोजी तिडके महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, गजानन विद्यालय, डी.डी.नगर विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय येथे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण २४०३ अर्ज प्राप्त झाले तर दुसऱ्या टप्प्यात २२ व २३ जून रोजी संताजी महाविद्यालय, रामनगर विद्यालय, जिंगल बेल विद्यालय, पंडित बच्छराज विद्यालय आणि राजेंद्र हायस्कुल येथे शिबिर पार पडले. याशिबिरात तब्बल ५३३३ विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले. असे एकूण ७७३६ विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालय अर्ज केले. याचाच अर्थ इतके विद्यार्थ्यांना सेतू कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. ते आले असते तर एका विद्यार्थ्यासोबत किमान १ ते २ जण येतात. त्यामुळे जवळपास १५ हजार लोकांची गर्दी सेतू कार्यालयात झाली असती. ती या शिबिरामुळे कमी झाल्याचे सांगितले जाते.

 

टॅग्स :Nagpur Collector Officeनागपूर जिल्हाधिकारी कार्यालय