शहरं
Join us  
Trending Stories
1
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
2
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला
3
पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज...
4
Maharashtra Rain Update: पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा
5
GST कपातीचा फायदा मिळत नाहीये? टोल-फ्री नंबर किंवा व्हॉट्सअॅपवर करू शकता थेट तक्रार
6
Mumbai Crime: हाताच्या नसा कापल्या गेल्या अन्... पोलिसाच्या मृत्युचे कोडे उलगडले; पत्नी, मुलाला अटक
7
३.७ कोटी देऊन बॉयफ्रेंडच्या पत्नीसोबत केली तडजोड, पण नंतर घडलं असं काही, पैसेही गेले आणि... 
8
Gold Silver Price 24 September: नवरात्रीत सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण, आता खरेदी करावं की आणखी स्वस्त होण्याची वाट पाहावी?
9
जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशाच्या राष्ट्रपतीनं UN महासभेत म्हटलं, "ॐ  शांति ओम..." 
10
कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा
11
भलीमोठी स्क्रीन, अल्ट्रा एचडी डिस्प्ले; सोनी कंपनीच्या टीव्हीवर थेट ५० हजारांची सूट!
12
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: ५ मिनिटांत होणारे गणेश स्तोत्र म्हणा, शाश्वत कृपा-लाभ मिळवा!
13
IND vs BAN: अर्शदीप सिंगला आज संधी मिळणार? कोणाचा पत्ता कट होणार? अशी असू शकते Playing XI
14
Video: बँकाँकमध्ये भूमिगत रेल्वे स्टेशनचे काम सुरु होते; अचानक रस्त्यावर भगदाड पडले, सगळे...
15
नवरात्र विनायक चतुर्थी २०२५: व्रत पूजन कसे कराल? पाहा, सोपी पद्धत, शुभ मुहूर्त अन् मान्यता
16
Asia Cup 2025: तिलक वर्मा नवा विक्रम रचण्याच्या उंबरठ्यावर; शिखर धवनला मागे टाकण्याची संधी
17
३ दिवस धन-महालक्ष्मी योग: ९ राशींना नवरात्र लकी, अपूर्व लाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, वैभव-भरभराट!
18
GPS लोकेशनमुळे तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते का? नेमकं कारण तरी काय? जाणून घ्या
19
मुख्यमंत्र्यांचं उद्योगपती अजीम प्रेमजी यांना पत्र; उधारीत का मागितला एक रस्ता?

विदर्भात संततधार सुरूच; चंद्रपूरला पुराचा विळखा, तिघे वाहून गेले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2022 10:35 IST

विदर्भात पावसाचा जाेर कायम असून गुरुवारीही काेसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले.

ठळक मुद्दे४ हजारांवर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

नागपूर : विदर्भात पावसाचा जाेर कायम असून गुरुवारीही काेसळधारेने जनजीवन विस्कळीत झाले. नागपूर शहर आणि जिल्हा, चंद्रपूर तसेच गडचिराेली जिल्ह्याला पावसाने अक्षरश: झाेडपून काढले. दरम्यान या पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा येथील दोन आणि गडचिराेली येथील एक असे तिघे जण वाहून गेले. गडचिराेलीत सुदैवाने नाल्याच्या पुरात पुलाखाली पडलेल्या दुचाकीवरील एक जण बचावला. गाेंदियात बुधवारी पुरात वाहून गेलेल्या चाैघांचेही मृतदेह गुरुवारी सापडले. पुरामुळे विदर्भातील एसटी बसफेऱ्यांवर प्रभाव पडला आहे. अनेक मार्ग बंद असल्याने माेजक्याच बसफेऱ्या सुरू आहे. गडचिराेली जिल्ह्यात रेड अलर्ट कायम असून शनिवार, १६ जुलैपर्यंत शाळा - महाविद्यालयांना सुटी देण्यात आली आहे. साेबतच खासगी आस्थापना बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. विदर्भातील बहुतांश प्रकल्प हे फुल्ल झाले असून पाण्याचा माेठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात येत आहे.

नागपूर शहरात गुरुवारी सकाळपासून पाऊस सुरू आहे. दुपारनंतर दमदार पाऊस बरसला. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर-रस्त्यांवर पाणी साचले. नागपूर विभागातील ६० मंडळामध्ये अतिवृष्टीची नाेंद करण्यात आली आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे माेठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उत्तर नागपुरातील अनेक वस्त्यात पाणी साचले होते. गुरुवारी पाणी कमी झाले. परंतु अजूनही काही ठिकाणी पाणी साचून आहे. वस्त्यांत व रस्त्यांवर जागोजागी चिखल पसरला आहे. यामुळे लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील इरई धरणाचे सात दरवाजे एक मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे इरई नदीला पूर आला आहे. रहेमतनगर, सिस्टर कॉलनी, हनुमान खिडकी, पठाणपुरा गेट, हवेली गार्डन आदी परिसरांत पुराचे पाणी शिरले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागाची स्थितीही भयावह आहे. चंद्रपुरातील पूरबाधित ६७७ जणांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गोसेखुर्द धरणाचे दरवाजे उघडल्यामुळे ब्रह्मपुरी तालुक्यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. छोट्या नाल्यातील पाणी पुलावरून वाहत असल्याने गांगलवाडी-आवळगाव-मुडझा-व्याहाड मार्ग बंद झाला असून, येथील नागरिकांचा तालुक्याशी संपर्क तुटला आहे. याशिवाय गोंडपिपरी-आष्टीसह अनेक मार्ग बंद झाले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत दीड हजारांहून अधिक घरांची पडझड झाली आहे. बल्लारपूर तालुक्यातील विसापूर-कोलगाव वर्धा नदीवर मागील एका वर्षांपासून पुलाचे बांधकाम सुरू आहे. बुधवारी अचानक वर्धा नदीचा जलस्तर वाढल्याने सहा मजूर तिथेच अडकले. गुरुवारी सकाळी आपत्ती व्यवस्थापन पथकाने त्या सहा जणांना पुरातून बाहेर काढले.

वाहून गेलेल्या गोंदिया जिल्ह्यातील चारही जणांचे मृतदेह सापडले

गोंदिया जिल्ह्यात मागील दोन दिवस झालेल्या पावसामुळे पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. तिरोडा आणि आमगाव तालुक्यातील तीन नाल्यांवरील पूल वाहून गेले होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक आठ ते दहा तास ठप्प झाली होती. मात्र, गुरुवारी (दि. १४) पर्यायी मार्गाची व्यवस्था करण्यात आल्याने या गावातील गावकऱ्यांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात पावसाचा जोर थोडा मंदावल्याने जनजीवन पूर्वपदावर आले. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास पंधरा ते वीस मिनिटे पावसाने हजेरी लावली. दोन दिवस झालेल्या पावसामुळे १५६ घरे व गोठ्यांची पडझड झाली असून, नुकसानीचे सर्वेक्षण महसूल यंत्रणेकडून सुरू आहे. दरम्यान, वाहून गेलेल्या चारही तरुणांचे मृतदेह गुरुवारी आढळले.

भंडारा जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर ओसरल्याचे दिसत आहे. गत २४ तासात ३८.२ मि.मी. पावसाची नोंद झाली असून केवळ भंडारा तालुक्यात ८९.५ मि.मी. पाऊस कोसळला असून अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीच्या ११८ टक्के पाऊस कोसळला आहे. मोहाडी तालुक्यातील विहिरगाव लगतच्या नाल्यात पडून एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाल्याचे गुरुवारी उघडकीस आले. राजेश रामसंजीव पांडेय (४५) रा.हसारा असे मृताचे नाव आहे. गोसेखुर्द प्रकल्पाचे ३३ दरवाजे आजही उघडे असून २७ दरवाजे दीड मीटरने तर सहा दरवाजे १ मीटरने उघडण्यात आले आहे. येथून ९ हजार ७५० क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे.

गडचिराेली जिल्ह्यातील एटापल्ली परिसरात पुराच्या पाण्यातून दुचाकी वाहनासह पैलतीर गाठण्याच्या प्रयत्नात दोन युवक दुचाकीसह पुलावरून खाली पडले. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला तर दुसऱ्याने पोहत काठावर येऊन आपला जीव वाचवला. अनिल मूलचंद आलाम (२८) असे मृत युवकाचे नाव असून, तो लगतच्या वासामुंडी येथील रहिवासी आहे. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. गडचिराेली जिल्ह्यात ११ ते १३ जुलैपर्यंत शाळांना सुटी देण्यात आली हाेती. त्यास मुदतवाढ देण्यात आली असून आता १६ पर्यंत शाळा - महाविद्यालये बंद राहणार आहेत. साेबतच खासगी आस्थापना न उघडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यातील तीन हजारांवर नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. गडचिराेली जिल्ह्यात अनेक घरांची पडझड झाली आहे.

एसटीच्या ३०० फेऱ्या रद्द

तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जागोजागचे नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे वाहतुकीला अडसर निर्माण झाला असून धोका लक्षात घेता, एसटी महामंडळाने नागपूर विभागाच्या विविध मार्गांवरील सुमारे २०० फेऱ्या रद्द केल्या आहेत. परिणामी ग्रामीण भागातील एसटीची वाहतूक व्यवस्था कोलमडल्यासारखी झाली आहे.

पुढचे पाच दिवस अतिवृष्टी

ओडिसा व आसपासच्या क्षेत्रात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. शिवाय उत्तर अरबी सुमद्र व गुजरातच्या किनारपट्टीवार सायक्लोनिक सर्क्युलेशन व कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून पुढचे २४ तास ते वाढणार आहे. त्यामुळे १८ जुलैपर्यंत विदर्भात टप्प्याटप्प्याने अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

टॅग्स :floodपूरchandrapur-acचंद्रपूरRainपाऊस