शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
2
एअर इंडियाने मोठा निर्णय घेतला! वॉशिंग्टन डीसीला जाणारी सर्व विमान उड्डाणे रद्द केली; १ सप्टेंबरपासून...
3
'एका व्यक्तीच्या मूर्खपणामुळे देशाचे नुकसान..; केंद्रीय मंत्री किरेन रिजिजूंचा काँग्रेसवर घणाघात
4
मुंबई: दहीहंडीचा सराव करताना दहिसरमध्ये चिमुरड्या बालगोविंदाचा मृत्यू; कुटुंबावर शोककळा
5
बँका मिनिमम बॅलन्स का ठेवतात? 'या' कारणामुळे तुमच्या खात्यातून कापले जातात पैसे!
6
'भारतात शिक्षण, आरोग्य सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलंय'; सरसंघचालक भागवतांनी व्यक्त केली चिंता
7
एअर इंडियामागची पीडा काही संपेना! आता लँडिंगनंतर दरवाजेच उघडले नाही; तासभर अडकून राहिले प्रवासी
8
भाजपाकडून विधानसभा निवडणूक लढवलेला नेता चकमकीत ठार, अनेक गुन्ह्यांत होता वाँटेड
9
देवदर्शनासाठी जाणारी पिकअप १०० ते १५० फूट दरीत; ३० महिला जखमी, तिघांचा मृत्यू, खेड तालुक्यातील घटना
10
बाजारात तेजी परतली! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, टाटा-SBI सह 'या' शेअर्सचा गुंतवणूकदारांना दिलासा
11
शाब्बास पोरी! देशसेवेचं स्वप्न पाहिलं- सत्यात उतरवलं अन् झाली IAS; हार मानलीच नाही..
12
डोनाल्ड ट्रम्प झाले 'वसुली भाई'; चिप निर्यातीचा लायसन्स देण्यासाठी आता कंपन्यांकडून मागताहेत पैसे
13
Janmashtami 2025: १० ऑगस्ट रोजी सुरू झाली आहे कृष्ण नवरात्र; त्याची सांगता कधी आणि कशी?
14
MS Dhoni: "तुला आयपीएल खेळायचं आहे", चाहत्याची कमेंट, धोनीनं काय उत्तर दिलं? पाहा
15
भटक्या कुत्र्यांना पकडा आणि..., सर्वोच्च न्यायालयाने दिले सक्त आदेश
16
“भाजपा-महायुती लुटेरे, केंद्रात-राज्यात राज्यघटनेच्या विचाराचे सरकार आणू”; काँग्रेसचा एल्गार
17
Janmashtami 2025: पती-पत्नीचे नाते राधा-कृष्णासारखे व्हावे, म्हणून जन्माष्टमीला करा 'हे' वास्तू उपाय!
18
१५० सेवा, ३ कोटी प्रवासी, ७५ हजार कोटींचे उत्पन्न; ‘वंदे भारत’ची महाराष्ट्रात काय स्थिती?
19
मध्य प्रदेशात भीषण अपघात, जीप आणि दुचाकीच्या धडकेत 5 जणांचा जागीच मृत्यू; नेमकं काय घडलं?
20
हत्तीजवळ जाऊन फोटो काढणे भोवले; तरुणाला पायाखाली चिरडले, पाहा धक्कादायक Video...

बेलतरोडीत रखडलेली विकास कामे सुरू

By admin | Updated: June 16, 2016 03:20 IST

बेसाप्रमाणेच बेलतरोडी परिसरही नवीन नागपूरच्या रूपाने विकसित आणि विस्तारित होत आहे.

मुख्य रस्त्याच्या कामाला प्रारंभ, नालेसफाई पूर्ण : इतर समस्या कायमचनागपूर : बेसाप्रमाणेच बेलतरोडी परिसरही नवीन नागपूरच्या रूपाने विकसित आणि विस्तारित होत आहे. मिहानमुळे बेलतरोडीचा परिसर बांधकाम व्यावसायिकांसाठी फायद्याचा ठरला. अनेक ले-आऊटस् पडले आणि लोकांनी या भागात मोठ्या प्रमाणात भूखंड घेऊन घरे बांधली. बिल्डर्सनी विकासाच्या नावाखाली मोठमोठ्या इमारती तयार केल्या. मात्र या भूलथापांमुळे येथे राहायला आलेल्या नागरिकांना फजितीच सहन करावी लागली. रस्ते, पाणी, स्वच्छता अशा मूलभूत सुविधांच्या अभावाने नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून हाल सहन करावे लागत आहेत.लोकमत आपल्या दारीच्या माध्यमातून विकासाच्या दाव्याचे सत्य पडताळण्याचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा अनेक समस्यांनी त्रस्त असलेल्या बेलतरोडी परिसरातील नागरिकांनी आपला आक्रोश लोकमतच्या व्यासपीठावर व्यक्त केला होता. मुख्य व अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा, डीपी, रोडवरील जीवघेण्या पुलाची समस्या, कचरा, नालेसफाई, गटरलाईन अशा एक ना अनेक समस्या लोकांनी मांडल्या. लोकमतने या सर्व समस्यांवर प्रकाश टाकला. महिनाभरानंतर या भागाची चाचपणी केली तेव्हा रखडलेली काही कामे सुरू झाल्याचे आढळले. मात्र ही कामे कासवगतीने सुरू असून इतर अनेक समस्या कायम आहेत. पावसाळा काहीच दिवसात सुरू होणार असल्याने समस्या कधी सुटणार, हा प्रश्नच आहे.लोकमतच्या व्यासपीठावर बेलतरोडी परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी अनेक समस्या मांडल्या होत्या. रिंगरोडपासून बेलतरोडीपर्यंत जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुर्दशा झाली असून, सिमेंट रोडचे काम अनेक महिन्यांपासून रखडले असल्याचे नागरिकांनी सांगितले. गिट्टी उखडलेल्या पुलावरून लोकांना दिवस-रात्र ये-जा करावी लागत होती. कैकाडीनगर भागात अर्धवट राहिलेल्या नाल्यावरील जीवघेण्या पुलाची समस्या लोकांनी मांडली. नाल्यात शिडी लावून लोकांना पुलावरून येणे-जाणे करावे लागत होते. हा पूर्ण परिसर टॅँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जलवाहिनी पोहोचलेली नसलेल्या वस्त्यांतील नागरिकांनी संताप व्यक्त केला. याशिवाय नालेसफाई, कचरा समस्या, गटरलाईन, दुर्गंधी, नाल्याला सुरक्षा भिंत अशा अनेक समस्या सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली. नागरिकांचा हा आकांत लोकमतने उजेडात आणला. या समस्या मांडल्यानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग आली काय, याची चाचपणी लोकमतच्या चमूने केली असता रखडलेल्या काही कामांना सुरुवात झाल्याचे आढळून आले. मात्र ही कामे फार थोडी आहेत.(प्रतिनिधी)