शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तिसरी ते दहावीचा सुधारित अभ्यासक्रम जाहीर; हिंदी सक्तीला लागला ब्रेक? 'हे' विषय शिकवणार
2
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
3
Rohini Khadse-Khewalkar : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
4
मुलांच्या शिक्षणाचं टेन्शन? पोस्ट ऑफिसची 'ही' योजना देणार हमखास परतावा आणि टॅक्समध्ये सूट!
5
सगळेच बीएसएनएलमध्ये पोर्ट करतील! ९०० रुपयांच्या आत आणले सहा महिन्यांचे रिचार्ज, Jio-Airtel तर...
6
श्रीमंत बनण्याचा फॅार्म्युला, फक्त बदला या ५ सवयी; महिन्याला वाचवा १० हजार, लोकंही विचारतील कशी झाली 'ही' जादू
7
Barabanki Awshaneshwar Temple Stampede : माकडांनी उड्या मारल्या, तार तुटली अन्...; अवसानेश्वर महादेव मंदिरात कशी झाली चेंगराचेंगरी?
8
"सेटवर ते मस्ती करायचे पण मी...", अशोक सराफ यांनी सांगितला 'करण अर्जुन'चा किस्सा
9
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
10
आमिर खानच्या घरी पोहचले २५ आयपीएस अधिकारी, चाहते पडले चिंतेत, म्हणाले - "रेड पडली आहे का?"
11
Share Market Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex २६० अंकांनी घसरला, 'हे' स्टॉक्स आपटले
12
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
13
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
14
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
15
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
16
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
17
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
18
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
19
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
20
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले

ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2019 20:14 IST

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.

ठळक मुद्देतक्रारकर्त्याला ९० हजार रुपये भरपाई मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.विजय बजाज असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. बजाज यांना २५ हजार ७३६ रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे व ९० हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असे आदेश मंचने मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दिले आहेत. व्याज ३ जून २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासाचे ८० हजार व तक्रार खर्चाचे १० हजार रुपयाचा समावेश आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी प्रकरणावर निर्णय दिला. आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.तक्रारीतील माहितीनुसार, बजाज यांनी स्वत:सह पत्नी, मुलगा, मुलगी व पुतण्या यांचे नागपूर येथून इंग्लंडला जाण्याकरिता आणि तेथून स्कॉटलंडमध्ये जाऊन दोन दिवस व दोन रात्र राहण्याकरीता मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला ४९ हजार ६३५ रुपये अदा केले होते. बजाज यांच्याकरिता स्कॉटलंड येथे हॉटेल आरक्षित करण्यात आले होते. त्यांना इंग्लंडपर्यंतच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही. परंतु, २८ मे २०१६ रोजी स्कॉटलंडकडे प्रस्थान केल्यानंतर हॉटेलचे आरक्षण रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर कंपनीने दुसऱ्या हॉटेलमधील केवळ एका खोलीत राहण्याची पर्यायी व्यवस्था केली. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच, त्यांना खोली रिकामी होण्यासाठी सहा तास प्रतीक्षा करावी लागली व अतिरिक्त ३८ हजार रुपयेही भरावे लागले. त्याचा सर्वांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास झाला. परिणामी, बजाज यांनी ३ सप्टेंबर २०१६ रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून ४९ हजार ६३५ रुपये परत मागितले. परंतु, कंपनीने केवळ २३ हजार ८९९ रुपयेच परत केले. करिता बजाज यांनी मंचमध्ये धाव घेतली होती.मंचने नोटीस बजावल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून त्यांची काहीच चूक नसल्याचा दावा केला व बजाज यांची तक्रार खारीज करण्याची मागणी केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.मनस्ताप सहन करावा लागलाकंपनीच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास अपरिचित ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारकर्त्याची अत्यंत गैरसोय झाली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ते आवश्यक दिलासा मिळण्यास पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे