शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
3
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
4
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीविनहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
5
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
6
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
7
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
8
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
9
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?
10
तुर्की-पाकिस्तानच्या जोडीला भारताचं खुलं आव्हान; २३ वर्षानंतर पुन्हा जुनी मैत्री अन् नवा डाव
11
"जा अन् वडिलांप्रमाणे रिक्षा चालव"; सिराजनं शेअर केलेली लांबलचक पोस्ट चर्चेत
12
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
13
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशनचा मोठा खुलासा केला, म्हणाली- "मुलगा अंगदच्या जन्मानंतर..."
14
विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी पुस्तके मिळणार
15
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
16
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
17
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
18
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
19
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
20
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:22 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देश्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज २५ जून २०१४ ते प्रत्यक्ष विमा रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.विनोद बालचंद्र कनोजी असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंपनीला चपराक बसली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, कनोजी यांच्याकडे टाटा-२०७ हे चारचाकी वाहन आहे. त्यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या वाहनाचा विमा काढला होता. विम्याची मुदत २८ नोव्हेंबर २०१३ ते २७ नोव्हेंबर २०१४ पर्यंत होती. २० जानेवारी २०१४ रोजी ते वाहन प्रवासादरम्यान जळाले. कनोजी यांनी तिरोडा पोलिसांना ताबडतोब त्या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, कनोजी यांनी नुकसान भरपाईसाठी कंपनीकडे दावा दाखल केला. तो दावा कंपनीने विविध कारणांनी नामंजूर केला. त्यामुळे कनोजी यांनी कंपनीला नोटीस पाठवली. कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, कनोजी यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी मंचने हा निर्णय दिला.कंपनीचा युक्तिवाद अमान्यतक्रारकर्त्याचे वाहन वापरलेले (सेकंड हॅन्ड) होते. वाहनाचे बहुतांश पार्टस् गहाळ झाले होते. वाहनाची बॅटरी चालकाच्या उजव्या बाजूला लावण्यात आली होती. त्यामुळे बॅटरी मोटरच्या व सेल्फ इग्निशनच्या संपर्कात आल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन गाडी जळाली. परिणामी, विमा दावा नाकारला असा युक्तिवाद कंपनीने केला होता. मंचने तो युक्तिवाद तथ्यहीन ठरवला आणि अशा मुद्यांवरून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे