शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2019 20:22 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देश्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज २५ जून २०१४ ते प्रत्यक्ष विमा रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.विनोद बालचंद्र कनोजी असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंपनीला चपराक बसली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, कनोजी यांच्याकडे टाटा-२०७ हे चारचाकी वाहन आहे. त्यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या वाहनाचा विमा काढला होता. विम्याची मुदत २८ नोव्हेंबर २०१३ ते २७ नोव्हेंबर २०१४ पर्यंत होती. २० जानेवारी २०१४ रोजी ते वाहन प्रवासादरम्यान जळाले. कनोजी यांनी तिरोडा पोलिसांना ताबडतोब त्या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, कनोजी यांनी नुकसान भरपाईसाठी कंपनीकडे दावा दाखल केला. तो दावा कंपनीने विविध कारणांनी नामंजूर केला. त्यामुळे कनोजी यांनी कंपनीला नोटीस पाठवली. कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, कनोजी यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी मंचने हा निर्णय दिला.कंपनीचा युक्तिवाद अमान्यतक्रारकर्त्याचे वाहन वापरलेले (सेकंड हॅन्ड) होते. वाहनाचे बहुतांश पार्टस् गहाळ झाले होते. वाहनाची बॅटरी चालकाच्या उजव्या बाजूला लावण्यात आली होती. त्यामुळे बॅटरी मोटरच्या व सेल्फ इग्निशनच्या संपर्कात आल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन गाडी जळाली. परिणामी, विमा दावा नाकारला असा युक्तिवाद कंपनीने केला होता. मंचने तो युक्तिवाद तथ्यहीन ठरवला आणि अशा मुद्यांवरून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे, असे मत व्यक्त केले.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे