शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ग्राहक मंचचा दणका : नागपुरातील तीन बिल्डर्सना सहा वर्षांचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 20:43 IST

अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांची अवमानना करण्याच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन बिल्डर्सना प्रत्येकी एकूण सहा वर्षे कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी कठोर शिक्षा सुनावली.

दोन प्रकरणात सुनावली शिक्षानागपूर : अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने आदेशांची अवमानना करण्याच्या दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये तीन बिल्डर्सना प्रत्येकी एकूण सहा वर्षे कारावास व २० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास अशी कठोर शिक्षा सुनावली. मंचच्या पीठासीन सदस्य स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा दणका दिला.राजेश प्रफुल्ल पटेल, चंद्रकांत जसभाई पटेल व नीलेश प्रफुल्ल पटेल (कालिंदी इन्फ्रास्ट्रक्चर) अशी बिल्डर्सची नावे असून त्यांना ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २७ मध्ये दोषी ठरविण्यात आले आहे. संबंधित आदेशांची अंमलबजावणी केल्यास या बिल्डर्सना कारावासातून मुक्त करण्यात यावे, पण दंडात सूट देऊ नये असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले. तसेच, दंडाच्या रकमेतील ३० हजार रुपये पीडित ग्राहकाला भरपाई म्हणून अदा करण्यात यावे असे सांगण्यात आले आहे.दिलीप जैन असे पीडित ग्राहकाचे नाव असून ते इतवारी येथील रहिवासी आहेत. २९ मे २०१५ रोजी मंचने जैन यांच्या दोन तक्रारी अंशत: मंजूर करून विविध आदेश दिले होते. जैन यांना मौजा महादुला येथील जमिनीवर आवश्यक सुविधांसह दोन बंगले बांधून देण्यात यावे, नोंदणीकृत विक्रीपत्र करून त्यांना बंगल्यांचा ताबा देण्यात यावा, विक्रीपत्र करणे अशक्य असल्यास जैन यांना ८ लाख रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे, त्यांना आठ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असे ते आदेश होते. या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. परंतु, त्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात आली नाही. परिणामी, जैन यांनी ३० ऑगस्ट २०१६ रोजी मंचमध्ये दोन दरखास्त अर्ज दाखल केले होते. त्यात मंचने वरील बिल्डर्सना संबंधित शिक्षा सुनावली.आदेशांची हेतूपुरस्सर अवहेलनाप्रस्तुत प्रकरणात गैरअर्जदारांची वर्तणूक अत्यंत आक्षेपार्ह असून त्यांनी मंचच्या आदेशांची हेतूपुरस्सर अवहेलना केल्याचे स्पष्ट होते. गैरअर्जदारांची एकंदरीत वर्तणूक पाहता ते कुठलीही सहानुभुती किंवा दयामाया दाखविण्यास पात्र नाही. अशा गैरअर्जदारांना जरब बसेल अशी तुरुंगवासाची शिक्षा देण्याची गरज असल्याचे मंचचे स्पष्ट मत आहे. त्यामुळे भविष्यात ग्राहकाची फसवणूक व मंचच्या आदेशाची अवहेलना टाळली जाईल असे परखड निरीक्षण मंचने या निर्णयात नोंदवले.

टॅग्स :Nagpur District Additional Consumer Forumनागपूर जिल्हा अतिरिक्त ग्राहक तक्रार निवारण मंच