शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
5
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
6
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
7
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
8
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
9
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
10
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
11
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
12
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
13
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
14
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
15
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
16
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
17
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
18
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
19
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
20
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?

मेट्रो रेल्वेसाठी इमारती पाडणार

By admin | Updated: February 21, 2016 02:37 IST

शासकीय जमिनीनंतर आता मेट्रो रेल्वेसाठी खासगी जमिनी ताब्यात घेण्यात येणार असून बांधकामात अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्यात येणार आहे.

खासगी जमीनधारकांना नोटिसा : २२ पासून सुनावणीनागपूर : शासकीय जमिनीनंतर आता मेट्रो रेल्वेसाठी खासगी जमिनी ताब्यात घेण्यात येणार असून बांधकामात अडथळा ठरणाऱ्या इमारती पाडण्यात येणार आहे. ५.३ हेक्टर जमिनीसाठी १७६ जमीनमालकांना नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत. जमीन ताब्यात घेण्यासाठी २२ फेब्रुवारीपासून सुनावणी होणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.एकूण ९८.५१ हेक्टर जमिनीचे अधिग्रहणशहरात पूर्व-पश्चिम आणि उत्तर-दक्षिण भागात उभारण्यात येणाऱ्या नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी एकूण ९८.५१ हेक्टर जमिनीची गरज आहे. त्यापैकी ७७ टक्के अर्थात ८७.४ हेक्टर जमीन कंपनीला शासनाने दिली आहे. खासगी जमीन ताब्यात घेण्यासाठी मेट्रो रेल्वेपुढे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. सुनावणीनंतर मालकाने जमीन न दिल्यास बळजबरीने हिसकावणार का, असा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे. १७६ जमीनमालकांना नोटीसानोटीसा दिलेल्या १७६ जमीनमालकांना दिलेल्या तारखेनुसार सुनावणीला हजर राहायचे आहे. ही सुनावणी २२, २३, २६, २९ फेब्रुवारी आणि २ मार्चला होणार आहे. पूर्व-पश्चिम सीए रोडवर कल्पना टाईल्स, आंबेडकर चौक येथील असीम पेन्ट्स, हिंदुस्थान इंजिनिअरिंग, नॅशनल प्रॉडक्टिव्हिटी, अमरजित सिंग इंजिनिअरिंग, अंबाझरी कॉर्नर येथील शेनॉय बिल्डिंग तर उत्तर-दक्षिण मार्गावर २० जमीनमालकांना नोटीसा देण्यात आल्या आहेत. अशी धावणार रेल्वेपूर्व-पश्चिम मार्गावर प्रजापतीनगर, वैष्णवदेवी चौक, आंबेडकर चौक, टेलिफोन एक्स्चेंज, चिताळओळी चौक, अग्रसेन चौक, दोसर चौक, नागपूर रेल्वे स्टेशन, सीताबर्डी, सीताबर्डी, शंकरनगर चौक, एलएडी चौक, धरमपेठ कॉलेज, सुभाषनगर, वासुदेवनगर, बन्सीनगर, लोकमान्यनगर अशी मेट्रो धावणार आहे. तर उत्तर-दक्षिण मार्गावर आॅटोमोटिव्ह चौकातून निघारी मेट्रो नारी रोड, इंदोरा चौक, कडबी चौक, गड्डीगोदाम चौक, कस्तुरचंद पार्क, झिरो माईल्स, सीताबर्डी, काँग्रेसनगर, रहाटे कॉलनी, अजनी चौक, छत्रपती चौक, जयप्रकाशनगर, उज्ज्वलनगर, एअरपोर्टमार्गे मिहानपर्यंत जाणार आहे. मोबदल्याचा पत्ताच नाहीनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोेरेशन लिमिटेडच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त हॉटेल रॅडिसनमध्ये आयोजित एका संवादात्मक कार्यक्रमात शेतजमीन बळजबरीने घेतल्याच्या एका शेतकऱ्याच्या प्रश्नावर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी सकारात्मक भाष्य केले नाही. प्रकल्पासाठी केंद्र सरकारच्या २०१३ च्या जमीन कायद्यानुसार आणि २०१५ च्या राज्याच्या अध्यादेशानुसार जमिनीचे हस्तांतरण करण्यात असल्याचे सांगितले. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. ज्यांच्या जमीन घेण्यात येणार आहे, त्यांना पर्यायी जागा, पैसा, टीडीआर देणार काय, यावरही दीक्षित यांनी चुप्पी साधली होती. याप्रश्नी कंपनीचे अधिकारही बोलण्यास तयार नाहीत. जिल्हाधिकारी न्याय देतील, असा आम्हाला विश्वास असल्याचे मत नाव न सांगण्याच्या अटीवर जमीनमालकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. यासंदर्भात बृजेश दीक्षित यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.(प्रतिनिधी)