शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटना सामाजिक आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र

By admin | Updated: February 15, 2016 03:25 IST

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तविल्याप्रमाणे भारताची राज्यघटना हे कोणत्याही रक्तपाताविना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र ठरले आहे,

राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांवर न्यायमूर्ती भूषण गवई यांचे व्याख्याननागपूर : राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वर्तविल्याप्रमाणे भारताची राज्यघटना हे कोणत्याही रक्तपाताविना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र ठरले आहे, असे मत उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी येथे व्यक्त केले. हायकोर्ट बार असोसिएशनच्या स्टडी सर्कलच्या वतीने ‘राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्त्वांचे महत्त्व’ या विषयावर व्याख्यान देताना ते बोलत होते. राज्यघटनेच्या भाग ४ मध्ये मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश होतो. सामाजिक, आर्थिक न्याय, उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा स्त्री व पुरुष नागरिकांना समान हक्क, समान कामाबद्दल समान वेतन, औद्योगिक आणि शेतकी, अशा सर्व प्रकारच्या कामगारांना आधारभूत गरजा पूर्ण करण्यासाठी किमान वेतन, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकातील लोकांचे शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन, जमीनदारांकडून जमिनीस मुकलेल्यांना न्याय, कृषी आणि पशुसंवर्धन, पर्यावरण संरक्षण व संवर्धन, नागरिकांचे पोषण व राहणीमान सुधारणे आदी उद्देशांचा घटनाकारांनी राज्यघटनेत समावेश केला होता. सर्वोच्च न्यायालयाचा मार्गदर्शक तत्त्वांबाबत सकारात्मक कल आहे. केशवानंद भारतीविरुद्ध केरळ राज्य या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने मार्गदर्शक तत्त्वाच्या उद्देशांमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना समाविष्ट असल्याचे निवाड्यात नमूद केले होते. न्या. कृष्णा अय्यर यांनी मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत हक्कांचे संरक्षण करणे न्यायाधीशांचे कर्तव्य असल्याचा निर्वाळा दिलेला आहे. बाबासाहेबांचे पोस्ट डेटेड चेकन्या. गवई यांनी असे सांगितले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश केला, तेव्हा काही सदस्यांनी ही तत्त्वे दिवाळखोर बँकेचे ‘पोस्ट डेटेड चेक’ आहेत, असे म्हटले होते. काहींनी निवडणूक जाहीरनामा, असा उल्लेख केला होता. याला बाबासाहेबांनी उत्तर देताना असे म्हटले होते. ही राज्यघटना कोणत्याही रक्तपाताविना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळवून देणारे शस्त्र ठरणार आहे. मी हे मान्य करतो की, हे पोस्ट डेटेड चेक आहेत, परंतु दिवाळखोर बँकेचे नाहीत. भविष्यात हे पोस्ट डेटेड चेक वटविणारी बँक समृद्ध राहील. बाबासाहेबांनी वर्तविलेली बाब खरी ठरली. स्वातंत्र्य मिळून ६५ वर्षांचा काळ लोटला आहे. भूमिहीन असलेले लाखो मजूर भूमिधारक झालेले आहेत. वहिवाटदार शेतमालक झाले आहेत. आदिवासींच्या हिसकावलेल्या जमिनी त्यांना परत मिळालेल्या आहेत. अनुसूचित जातीतील व्यक्ती राष्ट्रपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. शुद्राहून शूद्र समजल्या जाणाऱ्या महिला पंतप्रधान, राष्ट्रपती आणि आता लोकसभेच्या सभापतिपदी विराजमान आहेत. रेल्वेत चहा विकणारा पंतप्रधान झालेला आहे. मार्गदर्शक तत्त्वांमुळे झालेला हा क्रांतिकारक बदल आहे, असेही न्या. गवई म्हणाले. व्यासपीठावर हायकोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अरुण पाटील, उपाध्यक्ष अ‍ॅड. अजय मोहगावकर, स्टडी सर्कलचे अध्यक्ष अ‍ॅड. ए. एम. गोरडे उपस्थित होते. उपाध्यक्ष अ‍ॅड. अनिल ठाकरे यांनी कार्यक्रमाचे संचालन तर सदस्या अ‍ॅड. अर्चना रामटेके यांनी आभार मानले. या वेळी अ‍ॅड. आनंद परचुरे, अ‍ॅड. आनंद जयस्वाल, अ‍ॅड. श्रद्धानंद भुतडा, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा, अ‍ॅड. प्रदीप वाठोरे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)