शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नसून अधिकारांचा दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST

संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रत्येक घरात हवे संविधान : शैलेश नारनवरे यांचे आवाहनसंविधान गौरव समारोह

आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे संविधान चौक येथे संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. शैलेश नारनवरे हे ‘भारतीय संविधान आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमातून संविधान तयार केले. ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर तो या देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीयांसह प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचविण्याचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. शोषित, वंचितांसाठी आरक्षण दिलेले आहे. परंतु आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांचे अधिकार डावलले जात आहेत. तेव्हा आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे व ते समजून घ्यावे, तेव्हा या देशात खºया अर्थाने एक परिपूर्ण नागरिक तयार होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी धम्मसंदेश चमूने संविधान हे पथनाट्य सादर केले. शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवावेदेशात संविधानाची संस्कृती रुजविण्यासाठी लहान वयापासूनच संविधानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शालेय जीवनापासून संविधान शिकविण्यात यावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी व्यक्त केली.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात संविधान जलसा होईल. त्यानंतर भारतीय संविधान आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या विषयावर डॉ. पी. एस. चंगोले यांचे मार्गदर्शन होईल.

टॅग्स :nagpurनागपूर