शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नसून अधिकारांचा दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST

संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रत्येक घरात हवे संविधान : शैलेश नारनवरे यांचे आवाहनसंविधान गौरव समारोह

आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे संविधान चौक येथे संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. शैलेश नारनवरे हे ‘भारतीय संविधान आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमातून संविधान तयार केले. ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर तो या देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीयांसह प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचविण्याचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. शोषित, वंचितांसाठी आरक्षण दिलेले आहे. परंतु आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांचे अधिकार डावलले जात आहेत. तेव्हा आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे व ते समजून घ्यावे, तेव्हा या देशात खºया अर्थाने एक परिपूर्ण नागरिक तयार होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी धम्मसंदेश चमूने संविधान हे पथनाट्य सादर केले. शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवावेदेशात संविधानाची संस्कृती रुजविण्यासाठी लहान वयापासूनच संविधानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शालेय जीवनापासून संविधान शिकविण्यात यावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी व्यक्त केली.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात संविधान जलसा होईल. त्यानंतर भारतीय संविधान आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या विषयावर डॉ. पी. एस. चंगोले यांचे मार्गदर्शन होईल.

टॅग्स :nagpurनागपूर