शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक! नितीश कुमार यांनी 10 व्यांदा घेतली मुख्यमंत्रिपदाची शपथ; पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
2
सांगलीकर काळजी घ्या! ऊसाच्या शेतामध्ये बिबट्याची चार पिल्लं सापडली, एकच खळबळ
3
ऐन निवडणुकीत शिंदेसेनेच्या २ उमेदवारांनी अर्ज घेतला मागे; उपजिल्हाप्रमुखांसह भाजपात केला प्रवेश
4
"ठाकरेंवर आरोप करणारी भाजपा २० वर्ष BMC मध्ये उपमहापौरपदी होती हे सोयीस्करपणे विसरते"
5
Sonam Kapoor : सोनम कपूर दुसऱ्यांदा होणार आई, बेबी बंप फ्लॉन्ट करत केलं फोटोशूट; नवऱ्याची मजेशीर कमेंट
6
कूनोतून आली गुडन्यूज; भारतात जन्मलेल्या पहिल्या मादी चित्ता ‘मुखी’ने दिला 5 शावकांना जन्म
7
नक्षलवाद्यांसोबतच्या चकमकीत हाॅकफोर्सचे पोलीस उपनिरिक्षक आशिष शर्मा यांना वीरमरण, जानेवारीत होणार होतं लग्न
8
आरोग्य विमा होणार स्वस्त? प्रीमियमच्या मनमानी वाढीला लगाम लागणार; सरकार उचलणार 'ही' मोठी पाऊले!
9
महिन्यात दिवस कमी असो किंवा जास्त, पगार नेहमी ३० दिवसांचाच का येतो? काय आहे कॅलक्युलेट करण्याचा फॉर्म्युला
10
VIDEO: जिममध्ये वजन उचलताना अचानक तोल गेला, मुलीच्या मानेवर पडला वजनदार बार अन् मग...
11
'आजोबा वारले, तरी इंडक्शन कॉलला हजर रहा!' कॉर्पोरेट जगात 'विषारी' वर्ककल्चरचा कळस; नेटकऱ्यांचा संताप
12
टेन्शन वाढलं! देशात व्हायरल इन्फेक्शनचा वेगाने प्रसार; ICMR चा धडकी भरवणारा रिपोर्ट
13
Russia Ukraine War: युक्रेनचा रशियावर पुन्हा 'घाव'; भयंकर हवाई हल्ल्यात लहान मुलांसह २५ नागरिकांचा मृत्यू
14
शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे नेत्यांना आदेश; जिल्हाप्रमुखांपासून सगळ्यांना पोहचला संदेश
15
‘कुठे गेले दंड फुगवून आव्हाने देणाऱ्या ठाकरेंचे आणि मविआचे उमेदवार?’, भाजपाने डिवचले  
16
देशात आता केवळ ४ सरकारी बँक राहणार? विलीनीकरणासाठी केंद्राकडे प्रस्ताव; 'या' ६ बँका एक होणार?
17
Numerology: तुमचा जन्म ‘या’ ३ पैकी तारखांना झालाय? गूढ-रहस्य असते जीवन, केतु देतो अमाप पैसा!
18
वैभव सूर्यवंशीचा सुपरहिट धमाका! गोलंदाजांची धुलाई करत बनला 'नंबर १'; भारतही सेमीफायनलमध्ये
19
4-5 उचक्या अन् जीव सोडला; मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या प्रवाशाचा ट्रेनमध्ये दुर्दैवी मृत्यू
20
सैराटची पुनरावृत्ती! प्रेमविवाहामुळे नाराज झालेल्या कुटुंबाने मुलीवर गोळ्या झाडून केली हत्या
Daily Top 2Weekly Top 5

संविधान केवळ कायद्याचा ग्रंथ नसून अधिकारांचा दस्ताऐवज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 23:58 IST

संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.

ठळक मुद्देप्रत्येक घरात हवे संविधान : शैलेश नारनवरे यांचे आवाहनसंविधान गौरव समारोह

आॅनलाईन लोकमतनागपूर : संविधान हा केवळ कायद्याचा एक ग्रंथ नसून तो आपल्या अधिकारांचा दस्ताऐवज आहे. त्यामुळे आपले संविधानिक हक्क व अधिकार काय आहेत, हे समजून घेतले तर आपल्या अधिकारासाठी आपल्याला लढता येईल, तेव्हा संविधान हे प्रत्येक व्यक्तीने वाचावे,  समजून घ्यावे,  घराघरांमध्ये  ठेवावे, असे आवाहन ज्येष्ठ विधिज्ञ शैलेश नारनवरे यांनी येथे केले.सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा सार्वजनिक उपक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानतर्फे संविधान चौक येथे संविधान गौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात सोमवारी अ‍ॅड. शैलेश नारनवरे हे ‘भारतीय संविधान आणि नागरिकांचे मूलभूत अधिकार’ या विषयावर मार्गदर्शन करीत होते. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे विभागीय उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते.अ‍ॅड. शैलेश नारनवरे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय परिश्रमातून संविधान तयार केले. ते केवळ एक कायद्याचे पुस्तक नाही तर तो या देशातील शोषित, वंचित, मागासवर्गीयांसह प्रत्येक नागरिकाचे जीवनमान उंचविण्याचे एक ‘व्हिजन डॉक्युमेंट’आहे. संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार दिलेले आहेत. शोषित, वंचितांसाठी आरक्षण दिलेले आहे. परंतु आपल्या संविधानिक अधिकारांची माहिती नागरिकांना नाही. त्यामुळे त्यांचे अधिकार डावलले जात आहेत. तेव्हा आपल्या अधिकाराच्या रक्षणासाठी प्रत्येकाने संविधानाचे वाचन करावे व ते समजून घ्यावे, तेव्हा या देशात खºया अर्थाने एक परिपूर्ण नागरिक तयार होण्यास सुरुवात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तत्पूर्वी धम्मसंदेश चमूने संविधान हे पथनाट्य सादर केले. शालेय अभ्यासक्रमात संविधान शिकवावेदेशात संविधानाची संस्कृती रुजविण्यासाठी लहान वयापासूनच संविधानाची माहिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे मुलांना शालेय जीवनापासून संविधान शिकविण्यात यावे, यासाठी शालेय अभ्यासक्रमात त्याचा समावेश व्हावा, अशी अपेक्षाही अ‍ॅड. शैलेश नारनवरे यांनी व्यक्त केली.२८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता संविधान चौकात संविधान जलसा होईल. त्यानंतर भारतीय संविधान आणि इतर मागासवर्ग (ओबीसी) या विषयावर डॉ. पी. एस. चंगोले यांचे मार्गदर्शन होईल.

टॅग्स :nagpurनागपूर