शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही जगायचं की नाही, मुख्यमंत्र्यांनी सांगावं"; लक्ष्मण हाकेंचा संतप्त सवाल, हल्ल्याचा सगळा घटनाक्रम सांगितला
2
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
3
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे
4
'आज आपण संघाची सुरुवात करत आहोत', ना कुठली घोषणा, ना कुठले अतिथी; शंभर वर्षांअगोदर अशी झाली संघाची सुरवात
5
३० फेब्रुवारीला काढलं बिल, सिमेंटच्या दुकानातून कॉस्मेटिक्सची खरेदी, सरकारी भ्रष्टाचाराची हद्द  
6
३० टक्क्यांनी घसरलाय हा मल्टीबॅगर स्टॉक, अजून घसरण होणार का? काय म्हणताहेत एक्सपर्ट
7
Himanshi Tokas : लय भारी! हिमांशी टोकस ठरली जगातील नंबर १ ज्युडो खेळाडू; आजीच्या झाडूने बनवलं चॅम्पियन
8
बरेली हिंसाचार प्रकरण; मौलाना तौकीर रजाला अटक, 14 दिवसांची पोलीस कोठडी, 10 FIR दाखल
9
Laxman Hake: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या
10
"लेखनात काही चूक असल्यास..., नेमके प्रसंग आणि घटना निर्देशित कराव्यात!"; संभाजी ब्रिगेडच्या आक्षेपांवर विश्वास पाटील स्पष्टच बोलले
11
Beed Crime: "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल
12
अदानी समूह करणार 'सहारा'च्या ८८ मालमत्तांची खरेदी? भारतातला सर्वात मोठा प्रॉपर्टी करार होण्याची शक्यता
13
५ ग्रहांचे गोचर, ५ राजयोग: १० राशींचे दसरा-दिवाळी दणक्यात, धनलक्ष्मी पैसा देणार, भरपूर लाभ!
14
अमानुष! आईसमोरच ५ वर्षांच्या लेकाची निर्घृण हत्या, काळीज पिळवटून टाकणारी घटना
15
Tarot Card: टॅरो कार्डनुसार आगामी आठवडा संमिश्र घटनांचा; श्रद्धा-सबुरीने वागा, शुभ घडेल!
16
चुकीच्या आजाराचं निदान, सुई टोचली आणि कॅन्सर संपूर्ण शरीरात पसरला; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
17
सर्जरी करताना ऑपरेशन थिएटरच्या छताचं प्लास्टर कोसळलं; डॉक्टरने शेअर केला शॉकिंग Video
18
Kolhapur: अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरीसदृश्य परिस्थिती -video
19
Navaratri 2025: कुमारिका पूजेसाठी योग्य तिथी आणि 'या' वयोगटातील मुलींना निवडा!
20
Indusind बँकेत १० वर्षांपासून सुरू होता अकाऊंटिंगच्या अनियमिततेचा खेळ; माजी CFO चा गौप्यस्फोट

संविधान हे बाबासाहेबांचे स्मारकच

By admin | Updated: December 20, 2015 03:00 IST

स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात भारतावर अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय संकटे आली.

न्या. भूषण गवई : विद्यापीठाच्या संविधान सप्ताहाचा समारोपनागपूर : स्वातंत्र्याच्या ६६ वर्षात भारतावर अनेक सामाजिक, आर्थिक व राजकीय संकटे आली. मात्र अशा सर्व परिस्थितीत हा देश एकसंघ राहिला तो केवळ आणि केवळ संविधानामुळेच. त्यामुळे जोपर्यंत संविधान आहे, तोपर्यंत देशातील एकही नागरिक डॉ. बाबासाहेबांना विसरणार नाही. संविधान म्हणजे, बाबासाहेबांनी तयार केलेले जिवंत स्मारक होय, असे प्रतिपादन उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासकीय न्यायाधीश न्या. भूषण गवई यांनी केले.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. आंबेडकर विचारधारा विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती वर्षानिमित्त आयोजित संविधान सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात न्या. भूषण गवई बोलत होते. याप्रसंगी नागपूर विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पदव्युत्तर विधी विभागाचे विभागप्रमुख डॉ. दिलीप उके, नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम, डॉ. आंबेडकर विचारधारा विभागाचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप आगलावे आदी मान्यवर उपस्थित होते. न्या. गवई म्हणाले, बाबासाहेबांनी जे स्वप्न पाहिले होते, त्यानुसार परिवर्तन घडत आहे. या देशात महिलांना शुद्रांपेक्षाही कमी दर्जाचे लेखले जात होते. त्यांना आज पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळाले ते बाबासाहेब व त्यांनी दिलेल्या संविधानामुळे. संविधानात नमूद मार्गदर्शक तत्त्वे हे मूलभूत अधिकारांएवढेच महत्त्वपूर्ण आहेत. यामध्ये देशातील सर्व समस्यांचे उत्तर सापडते. सामाजिक, आर्थिक विषयांशी संबंधित लाखो खटले न्यायालयापुढे आले. मात्र मार्गदर्शक तत्त्वांमधील घटनाकारांचा आशय न्यायालयांना सुनावणीसाठी नेहमी मार्गदर्शक ठरतो. महिलांचे अधिकार, आरक्षण, वाईट प्रथा,कामगारांचे प्रश्न, किंवा दुर्गम भागातील नागरिकांच्या समस्या असो, या सर्वांच्या अधिकारांची सुरक्षा संविधानाने निश्चित केल्याचे ते म्हणाले. यावेळी डॉ. दिलीप उके म्हणाले, देशातील अस्पृश्यता व जातीभेदामुळे बाबासाहेबांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागले, त्या सर्व वाईट चालिरीती त्यांनी संविधानाच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र बाबासाहेबांना अपेक्षित सामाजिक समता अद्याप प्रस्थापित झाली नाही. सामाजिक व आर्थिक समता स्थापित होईपर्यंत बाबासाहेबांना अपेक्षित लोकशाही आणि संविधानाची उद्दिष्टे सफल होणार नाहीत, असे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ प्रमोद येवले यांनी, संविधानाच्या रूपाने देशाचा पाया मजबूत असल्याने लोकशाही कोलमडली नाही, असे सांगत प्रामाणिक अंमलबजावणीने भविष्य उज्ज्वल होईल, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुरण मेश्राम यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)