शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

देश आणि संविधान वाचविण्यासाठी संविधान प्रेमिंनी एकत्र यावे

By गणेश हुड | Updated: October 19, 2024 15:22 IST

योगेंद्र यादव यांचे आवाहन : १५० मतदार संघात राबवणार भारत जोडो अभियान

गणेश हूड / नागपूर

नागपूर  : सत्ताधाऱ्यांकडून देशातील संविधान, लोकशाही विचार संपवून हुकूमशाही लादण्याच्या प्रयत्नांना लोकसभा निवडणुकीत ब्रेक लागला. परंतु ही लढाई अर्धवट आहे. हरियाणातील निकालाने आपली जबाबदारी आणखी वाढली आहे. परंतु महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र व उत्तर प्रदेशाने  देश वाचविण्याचे काम केले. देश आणि संविधान वाचविण्यासाठी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत संविधान प्रेमिंनी एकत्र यावे, असे आवाहन स्वराज इंडियाचे संस्थापक व  राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी शनिवारी पत्रपरिषदेत केले. नागपूर ही सामाजिक न्यायाची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेकर यांची भूमी आहे. भारत जोडो अभियान देशभरातील सामाजिक संघटनांचे एक व्यासपीठ आहे. 

देशातील हुकूमशाही विरोधात व संविधान वाचविण्यासाठी राज्यातील २८८ मतदारसंघापैकी १५० मतदार संघात  भारत जोडो अभियान विधानसभा निवडणुकीत पूर्ण शक्तीनिशी महाविकास आघाडीच्या बाजुने उभे राहील. निवडणुकीतंर राज्यातील भाजप सरकार गेले तरी ही आमची लढाई पुढील २५ ते ३० वर्षे सुरू राहील. म्हणूनच ही लढाई सोपी नाही. ही लढाई आपण जिंकल्यास दुसरे प्रजासत्ताक खऱ्या अर्थाने अस्तित्वात येऊ शकेल. असा विश्वास योगेंद्र यादव यांनी व्यक्त केला. यावेळी  भारत जोडो अभियानाचे महराष्ट्र समन्वयक  संजय मंगला गोपाल, काँग्रेसचे नेते प्रफुल्ल गुडधे, सामाजिक कार्यकर्ते विलास भोंगाडे, प्रा. सुषमा भड यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्यांची गणना व्हावीईव्हीएमचा प्रश्न गंभीर आहे. इलेक्ट्रॉनिक यंत्र असल्याने हॅक होवू शकते. फेरफार होवू शकतात. जे सत्तेत असलेले लोक याचा गैरफायदा घेवू शकतात. निवडणूक आयोगाला कणा नाही. ते कोणताही निर्णय घेवू शकतात. देशभरातील विरोधीपक्षांनी व्हीव्हीपॅट मतगणनेची मागणी केली आहे. त्यानुसार मतगणना व्हावी, असे मत योगेंद्र यादव यांनी व्यक्त केले.  

जाननिहाय गणना व्हावी देशात आरक्षणाची मागणी होत आहे. जात निहाय गणनेतून कुठला समाज आर्थिक व सामाजिकदृष्या मागास आहे. हे यातून स्पष्ट होईल. त्यानुसार आरक्षण देणे शक्य होईल. सविधानातही सामाजिक न्यायाच्या भूमिकेतून आरक्षण दिले असल्याचे योगेंद्र यादव म्हणाले.

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवnagpurनागपूरPoliticsराजकारण