शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

भारताचे संविधान बौद्ध तत्त्वज्ञानावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:24 IST

भारतीय संविधानाचे मूलतत्त्व हे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मानव-मानवात समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे सामंजस्य दिसून येते.

ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद : ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय संविधानाचे मूलतत्त्व हे बौद्ध तत्त्वज्ञानावर आधारित आहेत. यामध्ये मानव-मानवात समानता, बंधुत्व, स्वातंत्र्य आणि सामाजिक न्यायाचे सामंजस्य दिसून येते. लोकशाहीची मुळे आपल्या देशात किती जुनी आणि खोलवर रुजलेली आहेत, हे संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा संविधान सभेच्या आपल्या शेवटच्या भाषणात सांगितले होते. यासंदर्भात त्यांनी तेव्हा बुद्धाच्या परंपरेचे उदाहरण दिले होते, असे मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी येथे व्यक्त केले.मध्यभारतातील अप्रतिम शिल्पकृती, सरकारचे१० कोटींचे अर्थसाहाय्यकामठी येथील दादासाहेब कुंभारे परिसरात सुमारे १० एकर परिसरात विपश्यना मेडिटेशन सेंटर उभारण्यात आले आहे. या सेंटरमध्ये ८३ फूट उंचीचा आकर्षक असा मुख्य पॅगोडा बांधण्यात आला आहे. या पॅगोडाच्या चारही बाजूला दहा फूट उंचीचे चार पॅगोडा तयार करण्यात आले आहेत. ओगावा सोसायटीतर्फे ड्रॅगन पॅलेस टेम्पल परिसरात मेडिटेशन सेंटर राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या सहकार्याने बांधण्यात आले आहे. राज्य शासनाने विपश्यना कें द्राच्या संकल्पनेची दखल घेऊन विपश्यना सेंटरसाठी १० कोटींचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिले आहे. या सेंटरमध्ये विपश्यना साधना शिबिर घेण्यात येणार आहे.मेट्रो रेल्वे कामठीपर्यंत जोडणार - गडकरीदीक्षाभूमी आणि ड्रॅगन पॅलेस हे दोन जागतिक आकर्षणाचे केंद्र आहेत. आपल्या ध्येयाने प्रेरित राहून काम करणाºया सुलेखा कुंभारे यांनी विपश्यना केंद्राद्वारे आणखी एक जागतिक दर्जाचे स्मारक बनवले आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो रेल्वेला कामठीपर्यंत जोडले जावे, अशी मागणी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे. त्यावर विचार सुरू असल्याचे केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले.बुद्धांचे शांतीचे विचार येथून जगभरात पोहोचतील- मुख्यमंत्रीराष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती कोविंद यांचा पहिलाच दौरा हा दीक्षाभूमीला भेट देण्याचा होता. दीक्षाभूमीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केल्यावर त्यांनी ड्रॅगन पॅलेसमध्ये बुद्धवंदना केली. देशाच्या सर्वोच्च पदावरील एखाद्या व्यक्तीने आपल्या कामाची सुरुवात संविधान निर्मात्याला अभिवादन करून करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विपश्यना हे कर्मकांड नाही. व्यक्तीला यातून आत्मबल मिळते. उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळते. तथागत गातम बुद्धांते शांतीचे विचार हे येथून जगभरात पोहोचतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.ध्यानसाधना व बुद्ध वंदनाराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्वप्रथम विपश्यना केंद्राचे लोकार्पण केल्यावर विपश्यना केंद्रातील बुद्ध मूर्तीला अभिवादन केले. त्यानंतर पाच मिनिटे ध्यानसाधना केली. ड्रॅगन पॅलेस टेम्पलला भेट दिली. यावेळीसुद्धा त्यांनी बुद्ध मूर्तीला अभिवादन केले. यावेळी बुद्ध वंदना घेण्यात आलीकामठी येथील ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडिटेशन सेंटरचे लोकार्पण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आले. विपश्यना परिसरातील कोनशिलेचे अनावरण केल्यानंतर कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले, ड्रॅगन पॅलेसच्या संस्थापिका सुलेखा कुंभारे उपस्थित होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले, भगवान बुद्धाची शिकवण २५०० वर्षांपासून आपल्या देशाला प्रेरणा देत आहे. सम्राट अशोकपासून तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत सर्वच जण तथागत बुद्धांपासूनच प्रेरित झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेच्या शेवटच्या भाषणात बुद्धाच्या परंपरेचे उदाहरण देताना सांगितले होते की, भारतात संसदीय परंपरा नवीन नाही. ती आधीपासूनच होती. लोकशाहीची ही प्रणाली बौद्ध भिक्खू संघाद्वारे व्यवहारात अवलंबली जात होती, असेही ते म्हणाले. यावेळी अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, गोयनका गुरुजींच्या विपश्यनेमुळे मला प्रेरणा मिळाली. येथे सुद्धा एक विपश्यना केंद्र व्हावे, असे स्वप्न पाहिले होते. त्यासाठी नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सामाजिक न्याय विभागाने मदत केली. आज माझे स्वप्न पूर्ण झाले आहे. संचालन माधवी पांडे यांनी केले. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी आभार मानले.