शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

न्यायमूर्ती लोया यांच्या मृत्यूबाबत विशेष तपास पथक गठित करावे; प्रशांत भूषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 16:47 IST

न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी केली.

ठळक मुद्देत्यांचा मृत्यू हृदय विकाराने झालेला नाहीसर्वोच्च न्यालयात याचिका दाखल करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर - न्यायमूर्ती लोया मृत्यू प्रकरणात दिल्लीतील आॅल इंडिया इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सच्या फॉरेन्सिक मेडिसिन आणि विष विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. आर के. शर्मा यांच्या मते लोया यांचा मृत्यू हृदय विकाराने झालेला नाही. सर्वोच्च न्यायालय सुद्धा या प्रकरणाला पाहिजे तसा न्याय देताना दिसत नाही त्यामुळे प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करावे, अशी मागणी ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अ‍ॅड. प्रशांत भूषण यांनी शनिवारी केली. टिळक पत्रकार भवन व नागपूर श्रमिक पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘मिट द- प्रेस’ कार्यक्रमात ते बोलत होते.न्यायमूर्ती लोया यांचा मृत्यू हृदयविकाराने झालेला नाही. सुरुवातील लोया यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मृत्यू बाबत शंका उपस्थित केली होती. नंतर दबावामुळे ते गप्प झाले. सरकारला वाटते हे प्रकरण न्यायालयात फेटाळले जावे. दबावामुळे सीबीआय या प्रकरणाचा निष्पक्षपणे तपास करू शकत नाही. त्यामुळे लोया यांचा मृत्यू कशाने झाला, याच्या तपासासाठी एसआयटी गठीत करण्याची गरज आहे. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मार्चच्या पहिल्या आठवड्यात मध्यस्ती याचिका दाखल करणार असल्याची माहिती प्रशांत भूषण यांनी दिली.आम आदमी पक्षात सुरु असलेल्या घडामोडी चांगल्या नाही. आपचे भवितव्य चांगले नाही. लोकांनी विश्वास ठेवून आम आदमी पक्षाच्या हाती दिल्लीत सत्ता दिली. परंतु मुख्यमंत्री के जरीवाल यांच्या कलाने हा पक्ष चालतो. या सरकारकडून लोकांचा भ्रमनिराश झाल्याचे त्यांनी प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.राफेल हा आजवरचा सर्वात मोठा घोटाळापंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: ला चौकीदार म्हणतात. पण त्यांच्या डोळयादेखत पंजाब नॅशनल बँके त ११,४०० कोटीचा घोटाळा क रणारा नीरव मोदी देशाबाहेर पळून गेला. एलआयसीतही असाच घोटाळा आहे. राफेल लढाऊ विमान खरेदीत २२ हजार कोटींचा घोटाळा झाला आहे. गेल्या ३० वर्षातील हा सर्वात मोठा घोटाळा आहे. बोफोर्स घोटाळा या तुलनेत काहीच नाही. सत्तेवर येण्यापूर्वी भाजप नेत्यांनी लोकपाल नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सत्तेवर येताच भाजप नेत्यांना याचा विसर पडला आहे.. ५०० कोटीहून अधिक कर्ज दिलेल्यांची यादी जाहीर करावी. अशी मागणी प्रशांत भूषण यांनी यावेळी केली.संविधान व लोकशाही धोक्यातबँकातून जनतेचा पैसा काढला जातो. पण माहिती मिळत नाही. रिझर्व बँकेच्या गव्हर्नरपदी आपल्या मर्जीतील उर्जित पटेल यांना बसविण्यात आले. देशात जातीय दंगे, सांप्रदायिकता वाढली आहे. देशात आणीबाणीच्या काळापेक्षाची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. संविधान व लोकशाहीचे अस्तित्व धोक्यात असल्याची टीका प्रशांत भूषण यांनी केली.

 

टॅग्स :Governmentसरकार