शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

हा तर जातीय चौकटीत बंदिस्त करण्याचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 1:29 AM

पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.

ठळक मुद्देश्रीपाल सबनीस यांचे प्रतिपादन : वामन निंबाळकर लिखित दोन पुस्तकांचे प्रकाशन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुरोगामी महाराष्ट्राची ओळख फुले, शाहू, आंबेडकरांमुळे आहे. परंतु मराठ्यांचे शाहू महाराज, ओबीसींचे महात्मा फुले आणि दलितांचे आंबेडकर असे गणित लावून या महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंदिस्त करण्यात येत असून मराठा आरक्षण जाहीर केल्यामुळे मराठा व ओबीसींमध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे, असे प्रतिपादन ८९ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी केले.समाज प्रबोधन प्रतिष्ठानच्या वतीने सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. वामन निंबाळकर यांच्या आठव्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या ‘वाहत्या जखमांचा प्रदेश : आकलन व समीक्षा’ आणि ‘चळवळीचे दिवस’ (अधुरं स्वकथन) या दोन पुस्तकांचे प्रकाशन दीक्षाभूमी येथील डॉ आंबेडकर महाविद्यालयाच्या कर्मवीर दादासाहेब ऊर्फ ना.ह. कुंभारे सभागृहात करण्यात आले. अध्यक्षस्थानी वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी होते. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्या अ‍ॅड. सुलेखा कुंभारे, ललिता सबनीस, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे मराठी विभाग प्रमुख डॉ. शैलेंद्र लेंडे, स्नेहलता निंबाळकर उपस्थित होत्या. डॉ. सबनीस म्हणाले, सध्याची स्थिती बिकट आहे. कर्मठ आंबेडकरी व लिबरल आंबेडकरी असे दोन गट निर्माण झाले आहेत. ते आपापल्या परीने बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची मांडणी करतात. वामन निंबाळकरांची सत्यवादी व औदार्याची आहे. ते संवेदनशील कवी होते. वाहत्या जखमांचा प्रदेश यातून त्यांना केवळ जखमा दाखवायच्या नाहीत तर त्या जखमांवर मलमपट्टी कोण करणार याचे चिंतन आहे. गिरीश गांधी म्हणाले, निंबाळकर यांच्या दलित पँथरच्या प्रवासापासूनचा मी साक्षीदार आहे. विचारवंतांनी समाजात मिसळू नये असे संकेत असताना हा विचारवंत सर्वात मिसळायचा. त्यांच्यासारख्या धडपडणाऱ्या व्यक्तीची आज गरज आहे. अ‍ॅड. सुलेखा कुंभारे म्हणाल्या, वामन निंबाळकर यांनी आपल्या लिखाणातून दलित चळवळीला पुढे नेण्याचे कार्य केले. त्यांनी समाजाकडून कोणतीही अपेक्षा केली नाही. निंबाळकर हे निसर्गाने घडविलेले कार्यकर्ते होते. प्रा. डॉ. शैलेंद्र लेंडे म्हणाले, दलित साहित्याचे कार्य सीमारेषांना ओलांडणारे असून या साहित्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर मानवतेचा मापदंड निर्माण केला. चळवळीचे दिवस हे स्वकथन एका व्यक्तीच्या प्रगतीचे कथन नसून समाजाच्या भळभळत्या वेदना मांडण्याचे काम यातून झाले आहे. प्रास्ताविक स्नेहलता निंबाळकर यांनी केले. संचालन प्रा. डॉ. वीणा राऊत यांनी केले. आभार स्नेहलता खंडागळे यांनी मानले.

 

टॅग्स :Shripal Sabnisश्रीपाल सबनीसnagpurनागपूर