शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

नागपूरकरांना दिलासा : मृत्यूदर कमी, बरे होणारे तिप्पट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 22:10 IST

शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २० दिवसावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसाचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदराचा वेग कमी असला, तरी दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांच्या वर गेले असल्याने नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळू लागला आहे

ठळक मुद्देरुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १५ वरून २० दिवसावर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरात कोरोनाबाधित रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता २० दिवसावर पोहोचला आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस हा कालावधी १२ दिवसाचा होता. त्याचप्रमाणे मृत्यूदराचा वेग कमी असला, तरी दोन टक्क्यांच्या खाली आला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांच्या वर गेले असल्याने नागपूरकरांना काहिसा दिलासा मिळू लागला आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीस शहरातील कोरोना रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १० दिवसाचा होता, तर मृत्यूदर ६.६ टक्के होता. ही स्थिती बदलण्यास जवळपास दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही जवळपास तीन पटीने वाढले आहे.दुपटीचा कालावधी वाढला१० जूनची रुग्णसंख्या गृहीत धरल्यास शहरात ८६३ होती. हा आकडा दुप्पट होण्यासाठी जवळपास २० दिवसाचा कालावधी लागला आहे. २१ मे रोजी ४०४ रुग्ण होते. ही रुग्णसंख्या दुप्पट होण्यास १५ दिवसाचा कालावधी लागला. ६ मे रोजी २२९ रुग्णसंख्या होती. ती दुप्पट होण्यासाठी १२ दिवस लागले. शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर, सुरुवातीला दुपटीचा कालावधी १० दिवसाचा होता.मृत्यूदर घसरतोयनागपुरात सुरुवातीपासून मृत्यूदर कमी आहे. मार्च महिन्यात पहिल्या रुग्णाची नोंद झाली असलीतरी या महिन्यात एकाही मृत्यूची नोंद नव्हती. २० दिवसानंतर ४ एप्रिल रोजी पहिल्या मृत्यूची नोंद झाली. एप्रिल महिन्यात तीन मृत्यू झाले. मे महिन्यात ८ तर जून महिन्यात ४ मृत्यूची नोंद आहे. पण रुग्णसंख्येत वाढ होत असतानाही आता हा दर २ टक्क्यांच्या खाली आहे.बरे होण्याचे प्रमाण लक्षणीयशहरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असली तरी दुसरीकडे उपचारानंतर घरी जाणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही वेगाने वाढत चालले आहे. बुधवारपर्यंत एकूण रुग्णांच्या तुलनेत बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ६६ टक्के एवढे होते. ३१ एप्रिलपर्यंत हे प्रमाण केवळ ३१.८५ टक्के होते. रुग्णांना घरी सोडण्याच्या धोरणामध्ये बदल करण्यात आल्याने हे प्रमाण वाढल्याचे दिसते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर