शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

राजस्थानमध्ये भाजपाचे २२ आमदार संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:49 IST

राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देअविनाश पांडे यांचा गौप्यस्फोट : वसुंधरा सरकारचा तख्तापलट अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अविनाश पांडे यांची अ.भा. काँग्रेस कार्यसमितीमध्ये नियुक्ती झाली. यानंतर ते नागपुरात आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पांडे म्हणाले, राजस्थानमध्ये गेल्या साडेचार वर्षात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी दोन्ही लोकसभा व चार विधानसभेच्या जागा काँग्रेसने मोठ्या फरकाने जिंकल्या. काँग्रेसच्या जागा तेथे २१ वरून २५ झाल्या आहेत. यावरून जनतेला कल लक्षात येतो. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर तर भाजपा भुईसपाट झालेली दिसेल, असा दावा त्यांनी केला.राज्यस्थान सरकारने केलेली एकही घोषणा पूर्ण केली नाही. जनतेची फसवणूक करण्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, झाली नाही. बँकांनी नव्याने पीककर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठीही पैसे नव्हते. त्यामुळे नाराजी पसरली आहे. १८ हजार ७०० सरकारी शाळा बंद करून त्या आता पीपीपी तत्त्वावर खासगी व्यक्तींना दिल्या जात आहे. यामुळे ३९ हजार शिक्षक ररस्त्यावर आले आहेत. अशोक गहलोक यांच्या सरकारने सुरू केलेली राजीव गांधी आरोग्य योजना बंद करून ‘भामाशाह’ योजना सुरू करून एख कार्ड दिले आहे. मात्र, त्याचा लोकांना काहीच फायदा झालेला नाही. विकासाची संपूर्ण कामे ठप्प आहेत. त्यामुळे आता राजस्थानच्या लोकांना काँग्रेसच्या काळातील दिवस आठवत आहेत.‘आघाडी’बाबत प्रदेशला अहवाल मागितला २०० जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीय स्तरावर कुणाशी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर त्याला प्रदेश काँग्रेसही सहकार्य करेल. काही जागांवर बसपाचा तर काहींवर प्रादेशिक आघाड्यांचा प्रभाव आहे. भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी आपली भावना आहे. मात्र, जमिनीस्तरावर वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल आपण ५ आॅगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला मागितला आहे. संबंधित अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल.गहलोत-पायलट संयुक्त ताकद अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थानची निवडणूक होईल. संघटन महासचिव अशोक गहलोत यांचे प्रदेश काँग्रेसला पूर्ण समर्थन आहे. गहलोत व सचिन पायलट हे ‘एक और एक ग्यारह’ आहेत. जोश व होशचे उत्तम मिश्रण असून ते पक्षाची ताकद आहेत. भाजपाच्या फसव्या प्रचाराचा कार्यकर्त्यांवर परिणाम होणार नाही. निवडणुकीनंतर आमदारांशी चर्चा करून राहुल गांधी हे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.नागपुरातून लढणार नाही नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आपल्यावर पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. ती पूर्ण ताकदीने पार पाडू. नागपुरात पक्षाकडे अनेक सक्षम चेहरे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेPoliticsराजकारण