शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

राजस्थानमध्ये भाजपाचे २२ आमदार संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 00:49 IST

राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ठळक मुद्देअविनाश पांडे यांचा गौप्यस्फोट : वसुंधरा सरकारचा तख्तापलट अटळ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राजस्थानमध्ये जनमत भाजपाच्या विरोधात आहे. तेथील वसुंधरा राजे सरकार सत्तेतून जाणार हे अटळ आहे. लवकरच भाजपामध्ये मोठी फूट पडण्याची चिन्हे आहेत. तेथील २२ आमदार काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा गौप्यस्फोट अ.भा. काँग्रेस समितीचे महासचिव व राजस्थान प्रभारी अविनाश पांडे यांनी केला. मात्र, याबाबत कुठलाही निर्णय घेताना प्रदेश काँग्रेस समितीचे म्हणणे विचारात घेतले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.अविनाश पांडे यांची अ.भा. काँग्रेस कार्यसमितीमध्ये नियुक्ती झाली. यानंतर ते नागपुरात आले असता काँग्रेस कार्यकर्त्यांनी स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना पांडे म्हणाले, राजस्थानमध्ये गेल्या साडेचार वर्षात लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या सहा जागांवर पोटनिवडणूक झाली. यापैकी दोन्ही लोकसभा व चार विधानसभेच्या जागा काँग्रेसने मोठ्या फरकाने जिंकल्या. काँग्रेसच्या जागा तेथे २१ वरून २५ झाल्या आहेत. यावरून जनतेला कल लक्षात येतो. येत्या निवडणुकीत काँग्रेस सत्तेवर तर भाजपा भुईसपाट झालेली दिसेल, असा दावा त्यांनी केला.राज्यस्थान सरकारने केलेली एकही घोषणा पूर्ण केली नाही. जनतेची फसवणूक करण्यात भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाचाही मोठा वाटा आहे. शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत होते. मात्र, झाली नाही. बँकांनी नव्याने पीककर्ज न दिल्यामुळे शेतकऱ्यांकडे बियाणे खरेदीसाठीही पैसे नव्हते. त्यामुळे नाराजी पसरली आहे. १८ हजार ७०० सरकारी शाळा बंद करून त्या आता पीपीपी तत्त्वावर खासगी व्यक्तींना दिल्या जात आहे. यामुळे ३९ हजार शिक्षक ररस्त्यावर आले आहेत. अशोक गहलोक यांच्या सरकारने सुरू केलेली राजीव गांधी आरोग्य योजना बंद करून ‘भामाशाह’ योजना सुरू करून एख कार्ड दिले आहे. मात्र, त्याचा लोकांना काहीच फायदा झालेला नाही. विकासाची संपूर्ण कामे ठप्प आहेत. त्यामुळे आता राजस्थानच्या लोकांना काँग्रेसच्या काळातील दिवस आठवत आहेत.‘आघाडी’बाबत प्रदेशला अहवाल मागितला २०० जागा स्वबळावर लढण्याची काँग्रेसची तयारी पूर्ण झाली आहे. पण राष्ट्रीय स्तरावर कुणाशी आघाडी करण्याचा निर्णय झाला तर त्याला प्रदेश काँग्रेसही सहकार्य करेल. काही जागांवर बसपाचा तर काहींवर प्रादेशिक आघाड्यांचा प्रभाव आहे. भाजपा विरोधी विचारांच्या पक्षांनी एकत्र यावे, अशी आपली भावना आहे. मात्र, जमिनीस्तरावर वस्तुस्थिती काय आहे, याचा अहवाल आपण ५ आॅगस्टपर्यंत प्रदेश काँग्रेसला मागितला आहे. संबंधित अहवाल आल्यावर याबाबत निर्णय घेतला जाईल.गहलोत-पायलट संयुक्त ताकद अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वात राजस्थानची निवडणूक होईल. संघटन महासचिव अशोक गहलोत यांचे प्रदेश काँग्रेसला पूर्ण समर्थन आहे. गहलोत व सचिन पायलट हे ‘एक और एक ग्यारह’ आहेत. जोश व होशचे उत्तम मिश्रण असून ते पक्षाची ताकद आहेत. भाजपाच्या फसव्या प्रचाराचा कार्यकर्त्यांवर परिणाम होणार नाही. निवडणुकीनंतर आमदारांशी चर्चा करून राहुल गांधी हे मुख्यमंत्रिपदाचा निर्णय घेतील, असेही पांडे यांनी स्पष्ट केले.नागपुरातून लढणार नाही नागपुरातून लोकसभेची निवडणूक लढण्यास आपण इच्छुक नाही. आपल्यावर पक्षाने राजस्थानची जबाबदारी सोपविली आहे. ती पूर्ण ताकदीने पार पाडू. नागपुरात पक्षाकडे अनेक सक्षम चेहरे आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

 

टॅग्स :Avinash Pandeyअविनाश पांडेPoliticsराजकारण